शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

शिरोळला राजकीय गणिते बदलणार

By admin | Updated: May 1, 2015 00:20 IST

ग्रामपंचायत निवडणुका : गोकुळ, जिल्हा बँक निवडणुकीचे पडसाद उमटणार

संदीप बावचे - शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुका पुढे गेल्या असल्या, तरी सत्ताधारी व विरोधी गटाकडून राजकारणाची फेर जुळणी सुरू झाली आहे. अंतिम टप्प्यातील विकासकामे पूर्ण करण्यासाठी धावाधाव सुरू आहे. आगामी होणाऱ्या व मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ३३ ग्रामपंचायतींच्या या निवडणुकीत गोकुळ व जिल्हा मध्यवर्ती बॅँक निवडणूकीतील पडसाद तालुक्यात उमटणार आहेत. यामुळे तालुक्यातील गटातटालाही राजकीय रंग येणार आहे.शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षण निश्चित झाल्यानंतर गावागावांतील राजकीय वातावरण तापू लागले होते. मात्र, निवडणुका जुलै की आॅगस्टमध्ये होणार याबाबत संभ्रमावस्था होती. विविध राजकीय गट नेत्यांनी गावातील आपले राजकीय वर्चस्व टिकविण्यासाठी आरक्षणानुसार सक्षम उमेदवारांचा शोध घेतला होता. दरम्यान, अचानक ग्रामपंचायत निवडणुकींंचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवारांची धावपळ उडाली, शिवाय सत्ताधारी व विरोधी गटाला गटातटाच्या बांधणीसाठी फारसा वेळ नसल्यामुळे काही गावांत कॉँग्रेस-स्वाभिमानी, तर राष्ट्रवादी-स्वाभिमानी, कॉँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षातील कार्यकर्ते एकत्र येऊन आघाड्यांसाठी प्रयत्नशील झाले होते. मात्र, निवडणुका पुढे गेल्याने राजकारण बदलले जात आहे. आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये निवडणुका ग्रहित धरून पुनर्बांधणी सुरू झाली आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात या आघाडी बांधण्यासाठी एकत्र आलेले कार्यकर्ते इकडून-तिकडे अशी परिस्थिती सध्या बनली आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकाला रोखण्यासाठी डावपेच आखत आहेत. प्रबळ गटाला रोखण्यासाठी व्यूव्हरचना आखली जात आहे. काही ग्रामपंचायतीत सरपंच, उपसरपंच बदलही घडले आहेत.अंतिम टप्प्यात आलेल्या नळ पाणी योजना लवकर पूर्ण कशा होतील, यासाठी धावाधाव सुरू आहे. प्रभागातील रस्ते, गटारी, पाणीपुरवठा, आदी सोयी पुरविण्याकडे सध्या सत्ताधारी गटाने लक्ष केंद्रित केले आहे. प्रभाग आरक्षण निश्चित असल्याने अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. इच्छुकांकडून आतापासूनच प्रचार मोहीम राबविली जात आहे. विधानसभेनंतर तालुक्यातील राजकीय गणिते बदलत चालली आहेत. गावागावांतील सहकारी सेवा संस्थांच्याही निवडणुकीत बऱ्याच उलथापालथी झाल्या आहेत. गोकुळ व केडीसीसी बॅँक निवडणुकीतील पडसादही येणाऱ्या ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत निश्चितच जाणवणार आहेत. तालुक्यातील कोथळी, जैनापूर, दानोळी, उदगांव, कोंडिग्रे, चिपरी, तमदलगे, जांभळी, धरणगुत्ती, नांदणी, निमशिरगांव, अर्जुनवाड, कुटवाड, घालवाड, शिरटी, हसूर, कवठेगुलंद, गौरवाड, आलास, शेडशाळ, नृसिंहवाडी, गणेशवाडी, बुबनाळ, घोसरवाड, जुने दानवाड, टाकळीवाडी, दत्तवाड, तेरवाड, बस्तवाड, मजरेवाडी, यड्राव, शिरदवाड, शिरढोण या गावांच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची तारीख व सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले आहे.गटा-तटाचे डावपेच सुरूजातीय समीकरणावर विधानसभा निवडणूक रंगल्यानंतर शिरोळ तालुक्यात राजकारणाला वेगळाच रंग चढला आहे. खासदार राजू शेट्टी, आमदार उल्हास पाटील, ‘दत्त’चे अध्यक्ष गणपतराव पाटील, ‘शरद’चे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील, ‘कॉँग्रेस’चे तालुकाध्यक्ष अनिल यादव, आदींची भूमिका व राजकीय डावपेच कशा पद्धतीने आखले जातात यावर बरेच काही अवलंबून राहणार आहे.