शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस टोलवसुली करणार नाहीत

By admin | Updated: June 10, 2014 02:10 IST

पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा

कोल्हापूर : शहरात टोलवसुली सुरू केल्यास टोलनाक्यांवर मारामारी, झगडा होणार नाही. तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याची सक्त ताकीद ‘आयआरबी’ला देण्यात येईल, असे सांगतानाच पोलीस हे टोलवसुलीचे काम करणार नाहीत, तर तेथे बाजूला थांबून केवळ कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच हस्तक्षेप करतील, असा खुलासा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाजवळ केला. उच्च, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस टोलनाक्यांना संरक्षण देणार आहेत. टोल देण्याच्या आणि घेण्याच्या प्रक्रियेशी पोलिसांचा कोणताही संबंध असणार नाही. जोपर्यंत कोणी आमच्याकडे तक्रार करणार नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जाणार नाही. जर पोलीस ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांना मदत करीत आहेत, असे दिसून आले तर पोलीस अधीक्षक म्हणून माझ्याकडे तक्रार द्या, पण टोलनाक्यांवर जाऊन कोणीही दंगा करू नये, असे आवाहनही शर्मा यांनी केले. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, टोलवसुलीची सक्ती केली जाऊ नये. जर कोणा वाहनधारकाला टोल द्यायचा नसेल, तर त्याला नाक्यावरून जाऊ द्यावे. त्याच्या विरोधात काही तक्रार असेल तर ‘आयआरबी’ने पोलीस ठाण्यात अथवा दिवाणी न्यायालयात जाऊन दाद मागावी. जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी मात्र कोणतेही ठोस आश्वासन न देता फक्त तटस्थपणाची भूमिका घेतली. आपण आलात, शांततेत मोर्चा काढला, याबद्दल आपणास धन्यवाद. आपल्या भावना शासनाला कळवितो, एवढ्या माफक शब्दात माने यांनी उत्तर दिले. आंदोलनातून सकारात्मक मार्ग निघेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)