शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

पोलीस टोलवसुली करणार नाहीत

By admin | Updated: June 10, 2014 02:10 IST

पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा

कोल्हापूर : शहरात टोलवसुली सुरू केल्यास टोलनाक्यांवर मारामारी, झगडा होणार नाही. तसेच शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा पोहोचणार नाही, याबाबत खबरदारी घेण्याची सक्त ताकीद ‘आयआरबी’ला देण्यात येईल, असे सांगतानाच पोलीस हे टोलवसुलीचे काम करणार नाहीत, तर तेथे बाजूला थांबून केवळ कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तरच हस्तक्षेप करतील, असा खुलासा पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांनी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाजवळ केला. उच्च, तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलीस टोलनाक्यांना संरक्षण देणार आहेत. टोल देण्याच्या आणि घेण्याच्या प्रक्रियेशी पोलिसांचा कोणताही संबंध असणार नाही. जोपर्यंत कोणी आमच्याकडे तक्रार करणार नाही, तोपर्यंत कोणत्याही प्रकारची दखल घेतली जाणार नाही. जर पोलीस ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांना मदत करीत आहेत, असे दिसून आले तर पोलीस अधीक्षक म्हणून माझ्याकडे तक्रार द्या, पण टोलनाक्यांवर जाऊन कोणीही दंगा करू नये, असे आवाहनही शर्मा यांनी केले. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, टोलवसुलीची सक्ती केली जाऊ नये. जर कोणा वाहनधारकाला टोल द्यायचा नसेल, तर त्याला नाक्यावरून जाऊ द्यावे. त्याच्या विरोधात काही तक्रार असेल तर ‘आयआरबी’ने पोलीस ठाण्यात अथवा दिवाणी न्यायालयात जाऊन दाद मागावी. जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी मात्र कोणतेही ठोस आश्वासन न देता फक्त तटस्थपणाची भूमिका घेतली. आपण आलात, शांततेत मोर्चा काढला, याबद्दल आपणास धन्यवाद. आपल्या भावना शासनाला कळवितो, एवढ्या माफक शब्दात माने यांनी उत्तर दिले. आंदोलनातून सकारात्मक मार्ग निघेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)