शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
9
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
11
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
12
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
13
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
14
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
15
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
16
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
17
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
18
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

पोलिस ठाण्यांचा केला पंचनामा

By admin | Updated: July 24, 2014 23:47 IST

मनोजकुमार शर्मा : कर्मचाऱ्यांना सुनावले खडे बोल

एकनाथ पाटील - कोल्हापू,   ेभ्रष्टाचार, खून, मारहाण, घरफोड्या आदी घटनांमध्ये पोलिसांचा सहभाग वाढू लागल्याने कोल्हापूर पोलीस दलाची बदनामी होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांचा ‘पंचनामा’ पोलिस अधिक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी सुरू केला आहे. जिल्ह्यात गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असताना एकीकडे लाचखोर पोलिसांची संख्याही वाढत आहे. करवीर पोलिसांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक मटका बुकीचालकांना अटक केली. मटक्यामध्ये सक्रिय असलेल्या गल्लीपासून मुंबईपर्यंतच्या टोळीचा त्यांनी पर्दाफाश केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल क्राईम बैठकीत डॉ. शर्मा यांनी करवीर पोलीस ठाण्याला ‘आदर्श पोलीस ठाणे’ पुरस्काराने सन्मानित केले तर दुसऱ्या बाजूला हद्दीमधील दहा ते बारा मटकाचालकांना करवीर पोलिसांनी अटक केल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे प्रमुख धन्यकुमार गोडसे यांना सक्त सूचना केल्या. त्यानंतर गोडसे यांनी शाहूपुरी हद्दीमध्ये क्रिकेट बेटिंग व खुनाचा उलगडा केला. त्यानंतर कागल, करवीर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस लाच घेताना जाळ्यात सापडले तर मुरगूड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलने स्वत:च्याच पत्नीचा खून केल्याचे उघडकीस आले. गगनबावडा पंचायत समितीचे माजी सभापती बंकट थोडगे यांना करवीर पोलिसांनी केलेली मारहाण आदी घटनांमुळे पोलिसांची जिल्ह्यात बदनामी झाली. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनीही घेतलेल्या क्राईम बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांना जनतेशी योग्यप्रकारे वागण्याच्या सूचना केल्या होत्या. या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षकांनी जिल्ह्यातील २८ पोलीस ठाण्यांचा दौरा सुरू केला आहे. चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कागल, करवीर येथील पोलीस ठाण्यांचा त्यांनी ‘पंचनामा’ केला. अवैध धंद्यांवर वचक ठेवा, पोलीस ठाण्यात येणाऱ्या गोर-गरीब लोकांना न्याय द्या, चेन स्नॅचिंग, घरफोड्या थांबवा, कोल्हापूर पोलीस हे ‘नंबर वन’ आहेत याचे भान ठेवा, एखादा प्रश्न सोडविण्यामध्ये चालढकल केल्यास खपवून घेणार नाही, अशा कडक शब्दांत सर्वच पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना त्यांनी सुनावले.४कोणत्याही कामासाठी एक पैसाही कुणाकडून घेतला जाणार नाही आणि दिला जाणार नाही. प्रामाणिकपणा हीच माझ्या गेल्या सेवेची सर्वांत जमेची बाजू आहे. ४ती जपण्याचा मी प्रयत्न करत आहे, असे असताना जेव्हा तुम्ही लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडता तेव्हा माझी प्रतिमा खराब होते. ४भ्रष्टाचार थांबवा, अन्यथा घरचा रस्ता पकडा, असे खडे बोल डॉ. शर्मा यांनी करवीर पोलिसांना सुनावले.