शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

पोलिसांनी जप्त केली सहा लाखांची रोकड

By admin | Updated: December 24, 2016 00:54 IST

सहकारनगर पोलिसांच्या गस्तीवरील पथकाने दुचाकीवरून भरधाव जात असलेल्या दोघा जणांना अडवत तब्बल साडेसहा लाखांची

कोल्हापूर : गेली २० वर्षे बंद अवस्थेत असलेले येथील ईएसआय रुग्णालय केंद्र सरकारच्या कामगार विमा महामंडळातर्फे ताब्यात घेऊन १ मे २०१७ पासून ते सुरू केले जाईल, अशी घोषणा केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या कामगार विमा महामंडळ समितीचे सदस्य खासदार चंद्रकांत खैरे यांनी शुक्रवारी केली. कोल्हापूरबरोबरच पुण्याचेही रुग्णालय सुरू केले जाईल, असे त्यांनी सांगितले. खासदार खैरे यांनी शुक्रवारी सकाळी या रुग्णालयाची पाहणी केली. सर्व विभाग आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांनाही त्यांनी भेट देऊन माहिती घेतली. पंधरा एकर जागेमध्ये १०० खाटांचे हे रुग्णालय १९९७ साली बांधण्यात आले. मात्र ते वीस वर्षे होत आली तरी सुरू झाले नाही. सध्या या ठिकाणी राज्य सरकारचे एकूण १२ कर्मचारी कार्यरत आहेत. यानंतर पत्रकारांशी बोलताना खैरे म्हणाले, कोल्हापूरसह राज्यात चार ठिकाणी ईएसआय रुग्णालये आहेत. वीस वर्षे ही इमारत पडून आहे, याचे आश्चर्य वाटते. केंद्र सरकारच्या कामगार विमा महामंडळातर्फे हे रुग्णालय ताब्यात घेतले जाईल आणि कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर आणि पुण्यातील बिबवेवाडी ही दोन्ही रुग्णालये मेपासून सुरू करण्यात येतील. ईएसआय रुग्णालय लाभार्थ्यांची वेतनमर्यादा १५ हजारांवरून २१ हजार रुपये केली आहे. प्रत्यक्षात केंद्र सरकारला ती २५ हजार करायची होती; पण अनेक कंपन्यांनी याला विरोध केला. त्यामुळे केंद्र सरकारने आता १० कर्मचारी असणाऱ्या आस्थापनांनासुद्धा ईएसआय योजना लागू करण्याचे ठरविले आहे. ही योजना शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रांनाही लागू करण्याचा विचार आहे. ज्या खासगी रुग्णालयांचे ‘ईएसआय’सोबतचे करार संपले आहेत, त्यांचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे. यावेळी कामगार विमा महामंडळाचे व्यवस्थापक दिलीप पाटील, दीपक साठे, संदीप कुमार, सामाजिक सुरक्षा अधिकारी के. डी. थोरात, समीर शेठ, उद्योग व कामगार संघटनांचे प्रतिनिधी एम. जी. जोशी, पी. बी. हरळीकर, शेखर सुतार, सुरेश पाटील, सर्जेराव यादव, मनीष परळे, आदी उपस्थित होते. ‘हे तर दुर्दैव...’ खैरे यांचा घरचा आहेरकर्मचाऱ्यांच्या वेतनातून जी ईएसआयची रक्कम जमा होते, त्यातील ८० टक्के रक्कम महामंडळ राज्य शासनांना देते. त्या निधीतून ही रुग्णालये चालवली जावीत, अशी अपेक्षा आहे. मात्र राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच कोट्यवधी रुपयांची ही इमारत इतकी वर्षे पडून आहे. त्याचा फायदा कामगारांना झाला नाही, हे दुर्दैव आहे, अशी टीका खैरे यांनी केली. खासदार खैरे यांनी राज्य शासनाला हा घरचा आहेरच दिल्याचे मानले जाते. खासदार महाडिक यांचेही प्रयत्नहे रुग्णालय सुरू व्हावे यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी २७ जुलै रोजी संसदेत प्रश्न उपस्थित केला होता. १५ एकरांवरचे १० कोटी रुपये खर्चून बांधलेले हे रुग्णालय सुरूच न झाल्याने वर्षाला तीन कोटी रुपयांचा निधी कामगारांकडून दिला जात असताना त्यांना आरोग्य सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णालय सुरू करण्याची मागणी महाडिक यांनी केली होती.तसेच आमदार अमल महाडिक यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून निवेदनही दिले होते. या पार्श्वभूमीवर खैरे यांनी भेट देऊन ही घोषणा केल्याचे पत्रक खासदार महाडिक यांच्यावतीने प्रसिद्धीस देण्यात आले आहे.