शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

संवेदनशील १११ गावांवर पोलिसांची विशेष नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:14 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दि. १५ जानेवारी २०२१ रोजी व दि. १८ जानेवारी रोजी निकाल होणार आहे. या ...

कोल्हापूर जिल्ह्यातील ४३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका दि. १५ जानेवारी २०२१ रोजी व दि. १८ जानेवारी रोजी निकाल होणार आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात गटा-तटांत ईर्ष्या पराकोटीला पोहोचत आहे. ग्रामपंचायत निडणुकीसाठी एकूण ६७८ इमारतीत सुमारे १८०० मतदान केंद्रे आहेत, तर सुमारे १११ गावे संवेदशील म्हणून पोलीस खात्याने घोषित केली. संवेदनशील गावांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी पोलीस खात्यामार्फत स्पेशल बंदोबस्ताची आखणी होत आहे. संवेदनशील गावात वाद निर्माण होऊ नये, शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी यासाठी पोलीस पाटलांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन, विशेष सूचना केल्या.

जिल्ह्यात विशेषत: गडहिंग्लज तालुक्यात सर्वाधिक २१ गावे संवेदनशील आहेत. आजरा तालुक्यात एकही गाव संवेदनशील नाही, तर त्याशिवाय करवीर आणि कागल तालुक्यांतील संवेदनशील गावांवरही विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्या.

संवेदनशील गावे पुढीलप्रमाणे : करवीर - गिरगाव, नंदगाव, पाटेकरवाडी, कोपार्डे, हणमंतवाडी, खुपिरे, सडोली खालसा, आरे, निगवे दुमाला, कोगे, कुडित्रे, खाटांगळे, तेरसवाडी, महे, शिये. कागल - बामणे, गोरंबे, सिद्धनेर्ली, म्हाकवे, बेलवडे खुर्द, बेलवळे बुद्रुक, साके, मौजे सांगाव.

तालुकानिहाय संवेदनशील गावांची संख्या (कंसात निवडणूक ग्रामपंचायतींची संख्या): करवीर-१५ (५४), कागल -०८ (५३), हातकणंगले -०९ (२१), गडहिंग्लज-२१ (५०), शाहूवाडी-१६ (४१), भुदरगड-१० (४५), आजरा-०० (२६), चंदगड-०५ (४१), राधानगरी - ०६ (१९), गगनबावडा-०३ (०८), शिरोळ - ०४ (३३), पन्हाळा-१४ (४२).