शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

न्यायनिर्गुणेंच्या खुनास पोलीस अधिकारीही जबाबदार

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

भारत पाटणकर : बोरगावप्रकरणी २९ रोजी सांगलीत मोर्चा; विविध संघटनांचा सहभाग

सांगली : बोरगाव (ता. तासगाव) येथील दलित शेतकरी वामन न्यायनिर्गुणे खून प्रकरणात दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, न्यायनिर्गुणे कुटुंबाला आणि साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे, दबाव टाकणाऱ्यांच्या शासकीय योजना रद्द कराव्यात आदी मागण्यांसाठी दि. २९ जुलै रोजी दुपारी १२ वा. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक अत्याचार प्रतिबंध चळवळ आणि जातीमुक्ती आंदोलनाचे सहनियंत्रक डॉ. भारत पाटणकर यांनी शुक्रवारी दिली.वामन न्यायनिर्गुणे खून आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील दलित मुलींवर अत्याचार प्रकरणानंतर दलित समाजावर सवर्णांकडून वारंवार अत्याचार होत असल्याचे दिसून आले आहे. याप्रश्नी चर्चा करण्यासाठी सांगलीतील विश्रामगृहामध्ये शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांची बैठक झाली. बैठकीस प्रा. गौतमीपुत्र कांबळे, कॉ. धनाजी गुरव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस उमेश देशमुख, सेक्युलर मुव्हमेंटचे संग्राम सावंत, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष गौतम लोटे यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारिप बहुजन महासंघ, लाल निशाण, श्रमिक मुक्ती दल, सेक्युलर मुव्हमेंट, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक जनआंदोलन पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते.डॉ. पाटणकर म्हणाले की, न्यायनिर्गुणे यांनी गावातील टग्यांकडून त्रास होत असल्याची तक्रार तासगाव पोलिसांत दिली होती. त्याची दखल घेऊन दोषींवर कारवाई केली असती, तर त्यांचा बळी गेला नसता. जातीयवादातून दलित समाजातील लोकांचे बळी जाण्याचे गंभीर प्रकार वाढत आहेत. या जातीयवादी हिंसक प्रवृत्तीचे लोक सांगली जिल्ह्यापर्यंत आले असून, त्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. न्यायनिर्गुणे यांनी शेतात केलेली प्रगती न बघवल्यानेच गावातील दोन तरुणांनी त्यांचा खून केला. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. समाजात अजूनही सवर्ण समाजाची दलित समाजाकडे बघण्याची मानसिकता बदलली नसल्याचे दिसून येते. संशयित चंद्रकांत पाटील व सचिन पाटील यांनी घटनेदिवशी न्यायनिर्गुणे यांचे मेहुणे सुनील कांबळे यांना मारहाण केली होती. न्यायनिर्गुणे यांनी याचा जाब विचारताच त्यांनाही मारहाण केली होती. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. मात्र पोलिसांनी कठोर भूमिका घेतली नाही. या घटनेस जबाबदार पोलीस अधिकारी, पोलीस यांची चौकशी करून त्यांना निलंबित केले पाहिजे. शिवाय त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना घडाव्यात, ही बाब संतापजनक व खेदजनक आहे. न्यायनिर्गुणे यांच्या कुटुंबाला आणि साक्षीदारांना तात्काळ पोलीस संरक्षण दिले पाहिजे. या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव टाकणाऱ्यांच्या सर्व शासकीय योजना रद्द कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी दि. २९ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा सामाजिक अत्याचार प्रतिबंध चळवळ व जातीमुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बरखास्त कराजिल्हा दक्षता व नियंत्रण समिती (अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक) शासनाने तयार केली आहे. परंतु, या समितीकडून दलित समाजाला न्याय मिळत नाही. समितीची वेळेवर बैठक होत नसेल, तर ती समिती बरखास्त करून नव्याने तयार करावी. यामध्ये दलित समाजाविषयी काम करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी, ज्याच्यावर अत्याचार झाला असेल त्या व्यक्तीचा अथवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा समितीमध्ये समावेश करण्यात यावा. तसेच या समितीमध्ये नियुक्त सदस्यासाठी राजकीय शिफारस घेतली जाऊ नये, अशी मागणी डॉ. पाटणकर, धनाजी गुरव, अमोल वेटम यांनी केली.लोकप्रतिनिधी गप्प का?पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडाव्यात, ही बाब संतापजनक व खेदजनक आहे. जिल्ह्यातील एकाही नेत्याने या घटनेचा निषेध केला नाही. न्यायनिर्गुणे यांचा खून झालेले गाव खा. संजयकाका पाटील आणि आ. सुमनताई पाटील यांच्या मतदारसंघातील आहे. त्यांनीही बोरगावला भेट दिली नाही, याबद्दल पाटणकर व गौतमीपुत्र कांबळे यांनी खंत व्यक्त केली.