शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

न्यायनिर्गुणेंच्या खुनास पोलीस अधिकारीही जबाबदार

By admin | Updated: July 25, 2015 01:13 IST

भारत पाटणकर : बोरगावप्रकरणी २९ रोजी सांगलीत मोर्चा; विविध संघटनांचा सहभाग

सांगली : बोरगाव (ता. तासगाव) येथील दलित शेतकरी वामन न्यायनिर्गुणे खून प्रकरणात दुर्लक्ष केल्याप्रकरणी दोषी पोलीस अधिकाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे, न्यायनिर्गुणे कुटुंबाला आणि साक्षीदारांना पोलीस संरक्षण द्यावे, दबाव टाकणाऱ्यांच्या शासकीय योजना रद्द कराव्यात आदी मागण्यांसाठी दि. २९ जुलै रोजी दुपारी १२ वा. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती सामाजिक अत्याचार प्रतिबंध चळवळ आणि जातीमुक्ती आंदोलनाचे सहनियंत्रक डॉ. भारत पाटणकर यांनी शुक्रवारी दिली.वामन न्यायनिर्गुणे खून आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील दलित मुलींवर अत्याचार प्रकरणानंतर दलित समाजावर सवर्णांकडून वारंवार अत्याचार होत असल्याचे दिसून आले आहे. याप्रश्नी चर्चा करण्यासाठी सांगलीतील विश्रामगृहामध्ये शुक्रवारी विविध सामाजिक संघटनांची बैठक झाली. बैठकीस प्रा. गौतमीपुत्र कांबळे, कॉ. धनाजी गुरव, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस उमेश देशमुख, सेक्युलर मुव्हमेंटचे संग्राम सावंत, भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष गौतम लोटे यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारिप बहुजन महासंघ, लाल निशाण, श्रमिक मुक्ती दल, सेक्युलर मुव्हमेंट, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, सत्यशोधक जनआंदोलन पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत डॉ. पाटणकर बोलत होते.डॉ. पाटणकर म्हणाले की, न्यायनिर्गुणे यांनी गावातील टग्यांकडून त्रास होत असल्याची तक्रार तासगाव पोलिसांत दिली होती. त्याची दखल घेऊन दोषींवर कारवाई केली असती, तर त्यांचा बळी गेला नसता. जातीयवादातून दलित समाजातील लोकांचे बळी जाण्याचे गंभीर प्रकार वाढत आहेत. या जातीयवादी हिंसक प्रवृत्तीचे लोक सांगली जिल्ह्यापर्यंत आले असून, त्यांना आळा घालण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. न्यायनिर्गुणे यांनी शेतात केलेली प्रगती न बघवल्यानेच गावातील दोन तरुणांनी त्यांचा खून केला. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे. समाजात अजूनही सवर्ण समाजाची दलित समाजाकडे बघण्याची मानसिकता बदलली नसल्याचे दिसून येते. संशयित चंद्रकांत पाटील व सचिन पाटील यांनी घटनेदिवशी न्यायनिर्गुणे यांचे मेहुणे सुनील कांबळे यांना मारहाण केली होती. न्यायनिर्गुणे यांनी याचा जाब विचारताच त्यांनाही मारहाण केली होती. हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले होते. मात्र पोलिसांनी कठोर भूमिका घेतली नाही. या घटनेस जबाबदार पोलीस अधिकारी, पोलीस यांची चौकशी करून त्यांना निलंबित केले पाहिजे. शिवाय त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना घडाव्यात, ही बाब संतापजनक व खेदजनक आहे. न्यायनिर्गुणे यांच्या कुटुंबाला आणि साक्षीदारांना तात्काळ पोलीस संरक्षण दिले पाहिजे. या प्रकरणातील साक्षीदारांवर दबाव टाकणाऱ्यांच्या सर्व शासकीय योजना रद्द कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी दि. २९ जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्य सरकारने बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेबाबत गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा सामाजिक अत्याचार प्रतिबंध चळवळ व जातीमुक्ती आंदोलनाच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती बरखास्त कराजिल्हा दक्षता व नियंत्रण समिती (अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक) शासनाने तयार केली आहे. परंतु, या समितीकडून दलित समाजाला न्याय मिळत नाही. समितीची वेळेवर बैठक होत नसेल, तर ती समिती बरखास्त करून नव्याने तयार करावी. यामध्ये दलित समाजाविषयी काम करणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी, ज्याच्यावर अत्याचार झाला असेल त्या व्यक्तीचा अथवा त्याच्या कुटुंबातील व्यक्तीचा समितीमध्ये समावेश करण्यात यावा. तसेच या समितीमध्ये नियुक्त सदस्यासाठी राजकीय शिफारस घेतली जाऊ नये, अशी मागणी डॉ. पाटणकर, धनाजी गुरव, अमोल वेटम यांनी केली.लोकप्रतिनिधी गप्प का?पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडाव्यात, ही बाब संतापजनक व खेदजनक आहे. जिल्ह्यातील एकाही नेत्याने या घटनेचा निषेध केला नाही. न्यायनिर्गुणे यांचा खून झालेले गाव खा. संजयकाका पाटील आणि आ. सुमनताई पाटील यांच्या मतदारसंघातील आहे. त्यांनीही बोरगावला भेट दिली नाही, याबद्दल पाटणकर व गौतमीपुत्र कांबळे यांनी खंत व्यक्त केली.