शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

निवृत्तिवेतनासाठी पोलिसांची होतेय फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:36 IST

कोल्हापूर : राज्य सरकारच्या पोलीस सेवेत असणाऱ्या कर्मचाºयांना निवृत्तिवेतन लगेचच्या महिन्यात सुरू करण्याचे धोरण आहे. असे असले तरी कोल्हापुरातील ...

कोल्हापूर : राज्य सरकारच्या पोलीस सेवेत असणाऱ्या कर्मचाºयांना निवृत्तिवेतन लगेचच्या महिन्यात सुरू करण्याचे धोरण आहे. असे असले तरी कोल्हापुरातील पाच निवृत्त पोलिसांची मात्र गेल्या पाच महिन्यांपासून फरफट सुरू आहे. उलट १९९६ ते २०१६ या कालावधीतजादा दिल्या गेलेल्या वेतनाच्या वसुलीचा ससेमिरा मागे लावला आहे. याला पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकवर्गाचा गलथान कारभार जबाबदारअसल्याचे हे निवृत्त कर्मचारी बोलतात.घडला प्रकार असा आहे. चंद्राप्पा सत्याप्पा मुत्नाळे (रा. कामेवाडी, ता. चंदगड) हे ३१ मे २०१८ रोजी सहाय्यक फौजदार म्हणून निवृत्त झाले. वेतनपडताळणी पथक, पुणे यांनी केलेल्या सेवापडताळणीनुसार १९९६ ते २०१६ या काळात संबंधित कर्मचाºयांकडून अतिप्रदान झालेली रक्कम वसूल करण्याचे आदेश कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. त्यानंतर या कार्यालयाने राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय यांचे नावे १४ मार्च २०१७ रोजी आदेश जारीकेले.त्याप्रमाणे राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, कोल्हापूर यांना जिल्हा विशेष शाखेकडे कार्यवाहीसाठी हे प्रकरण पाठविले. मात्र, पोलीस दलातील नेहमीच्या कार्यपद्धतीमुळे संबंधित विभागाकडून कोणतेही तपशील जारी झाले नाहीत. त्यामुळे मुत्नाळे व अन्य कर्मचाºयांनी सुधारित वेतनश्रेणीनुसार अतिप्रदान झालेली रक्कम ही ग्रॅज्युइटी व अन्य देय रकमेतून घेण्यासाठी २० मार्च २०१८ रोजी अर्ज दिला.त्यावेळी त्या विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्याचवेळी विशेष पोलीस महासंचालक, आस्थापना मुंबई यांनी ५ सप्टेंबर २०१७ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाकडील २०१६ च्या एका निकालानुसार अतिप्रदान रक्कम पुन्हा वसूल करता येणार नाही. त्याचा संदर्भ घेत मुत्नाळे यांनी अतिप्रदान रक्कम भरून घेऊ नये, असा अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयास दिला आहे. मात्र, याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडूनकोणताही आदेश जारी झालेला नाही....तर अवमान याचिका दाखल करणारझारखंड केसचा आधार घेऊन आपण ‘अवमान’ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याच्या मन:स्थितीत असल्याचे चंद्राप्पा मुत्नाळे यांनी सांगितले. माझ्यासारखेच अन्य पाच ते सहा कर्मचाºयांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून, तो मनोधैर्य खचविणारा आहे, असेही ते म्हणाले.निवृत्तिवेतनास उशीर झाल्यास कारवाईशासनाच्या सेवेतून निवृत्त होणाºया कर्मचाºयांना निवृत्तिवेतन व अन्य लाभ वेळेत मिळण्यासाठी संबंधित विभागांनी कोषागार कार्यालयाकडे कागदपत्रे दहा दिवसांत द्यायची आहेत. तसे न होण्यामुळे कर्मचाºयांना हे फायदे उशिरा मिळत आहेत. त्यामुळे लेखा व कोषागरे विभागाच्या संचालकांनी १२ आॅक्टोबर २०१८ रोजी नवा आदेश काढून निवृत्तिवेतन उशिरा मिळाल्यास संबंधित विभागांना जबाबदार धरून कारवाई करण्यास सांगितले आहे.