शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

निवृत्तिवेतनासाठी पोलिसांची होतेय फरफट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 00:36 IST

कोल्हापूर : राज्य सरकारच्या पोलीस सेवेत असणाऱ्या कर्मचाºयांना निवृत्तिवेतन लगेचच्या महिन्यात सुरू करण्याचे धोरण आहे. असे असले तरी कोल्हापुरातील ...

कोल्हापूर : राज्य सरकारच्या पोलीस सेवेत असणाऱ्या कर्मचाºयांना निवृत्तिवेतन लगेचच्या महिन्यात सुरू करण्याचे धोरण आहे. असे असले तरी कोल्हापुरातील पाच निवृत्त पोलिसांची मात्र गेल्या पाच महिन्यांपासून फरफट सुरू आहे. उलट १९९६ ते २०१६ या कालावधीतजादा दिल्या गेलेल्या वेतनाच्या वसुलीचा ससेमिरा मागे लावला आहे. याला पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकवर्गाचा गलथान कारभार जबाबदारअसल्याचे हे निवृत्त कर्मचारी बोलतात.घडला प्रकार असा आहे. चंद्राप्पा सत्याप्पा मुत्नाळे (रा. कामेवाडी, ता. चंदगड) हे ३१ मे २०१८ रोजी सहाय्यक फौजदार म्हणून निवृत्त झाले. वेतनपडताळणी पथक, पुणे यांनी केलेल्या सेवापडताळणीनुसार १९९६ ते २०१६ या काळात संबंधित कर्मचाºयांकडून अतिप्रदान झालेली रक्कम वसूल करण्याचे आदेश कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. त्यानंतर या कार्यालयाने राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय यांचे नावे १४ मार्च २०१७ रोजी आदेश जारीकेले.त्याप्रमाणे राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय, कोल्हापूर यांना जिल्हा विशेष शाखेकडे कार्यवाहीसाठी हे प्रकरण पाठविले. मात्र, पोलीस दलातील नेहमीच्या कार्यपद्धतीमुळे संबंधित विभागाकडून कोणतेही तपशील जारी झाले नाहीत. त्यामुळे मुत्नाळे व अन्य कर्मचाºयांनी सुधारित वेतनश्रेणीनुसार अतिप्रदान झालेली रक्कम ही ग्रॅज्युइटी व अन्य देय रकमेतून घेण्यासाठी २० मार्च २०१८ रोजी अर्ज दिला.त्यावेळी त्या विभागाकडून कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्याचवेळी विशेष पोलीस महासंचालक, आस्थापना मुंबई यांनी ५ सप्टेंबर २०१७ रोजी जारी केलेल्या परिपत्रकात उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठाकडील २०१६ च्या एका निकालानुसार अतिप्रदान रक्कम पुन्हा वसूल करता येणार नाही. त्याचा संदर्भ घेत मुत्नाळे यांनी अतिप्रदान रक्कम भरून घेऊ नये, असा अर्ज पोलीस अधीक्षक कार्यालयास दिला आहे. मात्र, याबाबत पोलीस अधीक्षक कार्यालयाकडूनकोणताही आदेश जारी झालेला नाही....तर अवमान याचिका दाखल करणारझारखंड केसचा आधार घेऊन आपण ‘अवमान’ याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्याच्या मन:स्थितीत असल्याचे चंद्राप्पा मुत्नाळे यांनी सांगितले. माझ्यासारखेच अन्य पाच ते सहा कर्मचाºयांच्या बाबतीत हा प्रकार घडला असून, तो मनोधैर्य खचविणारा आहे, असेही ते म्हणाले.निवृत्तिवेतनास उशीर झाल्यास कारवाईशासनाच्या सेवेतून निवृत्त होणाºया कर्मचाºयांना निवृत्तिवेतन व अन्य लाभ वेळेत मिळण्यासाठी संबंधित विभागांनी कोषागार कार्यालयाकडे कागदपत्रे दहा दिवसांत द्यायची आहेत. तसे न होण्यामुळे कर्मचाºयांना हे फायदे उशिरा मिळत आहेत. त्यामुळे लेखा व कोषागरे विभागाच्या संचालकांनी १२ आॅक्टोबर २०१८ रोजी नवा आदेश काढून निवृत्तिवेतन उशिरा मिळाल्यास संबंधित विभागांना जबाबदार धरून कारवाई करण्यास सांगितले आहे.