शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

डॉल्बीमुक्तीसाठी पोलिसांचा पुढाकार

By admin | Updated: August 25, 2016 00:51 IST

गावात एकोप्याचा प्रयत्न : ‘एक गाव, एक गणपती’साठी जयसिंगपूर पोलिसांचे आवाहन

संदीप बावचे --जयसिंगपूर --गणेशोत्सवात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा, ध्वनी प्रदूषण कायद्याची अंमलबजावणी करावी, असा संदेश देत जयसिंगपूर पोलिसांनी आता डॉल्बीमुक्तगणेशोत्सवाबरोबरच ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. हा उपक्रम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्येही राबविला जाणार आहे. समाज एकसंघ राहावा, भेदभाव नष्ट व्हावा, गावात एकोपा राहावा, या दृष्टिकोनातून पोलिस ठाण्याने या उपक्रमाचे पाऊल उचलले आहे. समाजाचे प्रबोधन व्हावे, असा उदात्त हेतू घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याची सामाजिक चळवळ सुरू झाली. ही चळवळ अनेक वर्षांपासून अविरतपणे सुरू आहे. याच भावनेतून १२ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर ठाण्याने गणेशोत्सव कार्यकर्त्यांबरोबर ग्रामपंचायत पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्तींची बैठक आयोजित करून यावर्षीही पोलिस ठाण्याच्या हद्दीत डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाबरोबरच ‘एक गाव, एक गणपती’ बसविण्याबाबत पुढाकार घेतला आहे. जयसिंगपूरसह उदगाव, उमळवाड, कोथळी, दानोळी, कवठेसार, निमशिरगाव, तमदलगे, कोंडिग्रे, जैनापूर, चिपरी, आदी गावांत प्रबोधन केले आहे. गतवर्षीप्रमाणे कोथळी, उमळवाड, कोंडिग्रे ही गावे ‘एक गाव एक गणपती’साठी पुन्हा प्रतिसाद देतील, असा आशावाद पोलिसांनी आहे. गतवर्षी मंडळांनी सामाजिक बांधीलकी राखून गणेशोत्सव साजरा करावा, या पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंडळांनी दोन ते अडीच लाख रुपये दुष्काळी भागात निधी पाठविला होता. तसेच काही मंडळांनी जनावरांसाठी ओल्या चाऱ्याची सोय केली होती. तसेच धान्य, कपडे अशा स्वरूपातही मदत दिली होती. त्याप्रमाणे यावर्षीदेखील असा प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. डॉल्बीमुळे ध्वनी प्रदूषण होते, याची जाणीव गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांना झाली आहे. डॉल्बीवर होणारा अफाट खर्च टाळून मंडळांनी विधायक कामासाठी पाऊल उचलण्याची गरज आहे. यामध्ये काही मंडळांनी तो उपक्रम हाती घेतला आहे. याला सर्वच मंडळांनी प्रतिसाद देणे गरजेचे आहे. यंदाही जयसिंगपूरसह परिसरात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा होईल, असा आशावाद पोलिस प्रशासनाने व्यक्त केला आहे. निश्चितच प्रतिसाद देतीलविविध मंडळांनी गणरायाची स्थापना करणे आणि मिरवणुकीत ईर्ष्या निर्माण होऊन वादविवाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावात एकोपा राहावा, या दृष्टिकोनातून ‘एक गाव, एक गणपती’बरोबरच डॉल्बीमुक्त गणेशोत्सव गावांनी साजरा करावा. त्यासाठी पोलिस प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही जयसिंगपूरचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.