शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
2
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
3
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
4
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
5
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
6
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
7
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
8
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
9
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
10
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
11
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
12
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
13
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
14
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
15
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
16
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
17
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
18
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
19
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
20
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू

पोलिसांकडूनच डॉल्बीला प्रोत्साहन

By admin | Updated: August 31, 2014 00:30 IST

शहरवासिय वैतागले : गणरायाच्या निरोपावेळी तरी डॉल्बी थांबणार?

एकनाथ पाटील, कोल्हापूर : गेल्या महिन्याभरापासून डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जिल्हा पोलीस दल अहोरात्र प्रयत्न करीत आहे; परंतु गणरायाच्या आगमनादिवशीच काही तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांनी डॉल्बीच्या ठेक्यावर जल्लोष करीत गणरायाचे स्वागत केले. डॉल्बीच्या दणदणाटाचा घरातील लोकांना त्रास होऊ लागल्याने एका महिलेने करवीर पोलिसांना डॉल्बी बंद करण्याची फोनवरून विनंती केली. त्यावेळी ड्यूटीवर असलेल्या ठाणे अंमलदाराने ‘मॅडम, आज त्यांचा दिवस आहे, डॉल्बी लावणारच ते..!’ असे म्हणून फोन ठेवला. डॉल्बीमुक्तीचे आवाहन करणारे पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्या उपक्रमाला त्यांचेच पोलीस कर्मचारी पायदळी तुडवीत असल्याचे विदारक चित्र काल, शहरवासीयांनी अनुभवले. गणरायाच्या स्वागतासाठी लावलेले डॉल्बी निरोपाच्या वेळी पोलीस रोखणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीनुसार सार्वजनिक तरुण मंडळांच्या बैठका घेतल्या. गणराया अवॉर्ड कार्यक्रमातही पोलिसांनी आवाहन केले. शहरात ठिकठिकाणी डॉल्बीच्या मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांबद्दल प्रबोधनपर पोस्टर्स लावली. सर्व स्तरांवर प्रबोधन करूनही काही तरुण मंडळांनी पोलिसांचे आवाहन झिडकारून डॉल्बी लावण्याचा पवित्रा घेत गणरायाच्या आगमनादिवशीचं डॉल्बीची झलक दाखवून दिली. काल रस्त्यावर उतरलेल्या तसेच घरामध्ये विश्रांती घेणाऱ्या लोकांना या डॉल्बीच्या दणदणाटाचा त्रास सहन करावा लागला. घरगुती गणपती घरी घेऊन जाण्यासाठी वृद्ध नागरिक, लहान मुले, स्त्रिया रस्त्यावर उतरल्या होत्या. जोरजोरात ध्वनिक्षेपक लावून जल्लोष सुरू केल्याने गर्भवती स्त्रियांसह अनेक वृद्ध लोकांना रक्तदाब, हृदयरोग, अर्धांगवायू यासारख्या त्रासांना तोंड द्यावे लागले. साने गुरुजी वसाहतीमध्ये काल, शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास एका तरुण मंडळाचा डॉल्बीचा ठेक्याने नागरिकांच्या घरांच्या भिंती थरथरल्या कारवाई शून्य डॉल्बीबाबत कारवाईच्या सूचना पोलीस प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केली होती. काल, शुक्रवारी गणरायाच्या आगमनादिवशी शहरात डॉल्बी वाजले. हे पोलिसांनीदेखील पाहिले; परंतु अद्याप एकावरही कारवाई झालेली नाही. राजकीय दबाब आगामी विधानसभा निवडणुकांमुळे गणेशोत्सवात तरुण मंडळांना डॉल्बी लावण्यापासून रोखू नये, त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची पोलीस दलाने काळजी घ्यावी, असा राजकीय दबाब पोलिसांवर आहे. त्यामुळे पोलिसांनी काल, शुक्रवारी डॉल्बीवर कारवाई करण्यास दोन पावले मागे घेतल्याची चर्चा आहे.