शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

पोलिस चौकी नावाला, अधिकारी नाही कामाला

By admin | Updated: January 21, 2017 21:16 IST

शामघाटातील स्थिती : चेकनाका बनला केवळ शोपीस; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

मसूर : कऱ्हाड तालुक्यातील अवैध धंद्यासाठी प्रसिद्ध असलेला शामगाव घाट हा प्रवाशांसाठी असुरक्षित बिकटवाट बनत आहे. याठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने बांधण्यात आलेली पोलिस चौकी केवळ शोपीसच बनली आहे. पोलिस चौकीत एकही पोलिस कार्यरत नसल्याने ‘पोलिस चौकी नावाला... अन् एकही पोलिस नाही कामाला...!’ अशी अवस्था बनली आहे. परिणामी घाटातून येणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षितेता प्रश्न निर्माण झाला आहे.कऱ्हाड तालुक्यातील शामगाव घाट हा सातारा-सांगली जिल्ह्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. हा घाट लांब पल्ल्याचा नागमोडी वळणाचा असल्याने या मार्गावर कधी दिवसा तर कधी रात्री-अपरात्री शस्त्रांचा धाक दाखवून चोरी व लुटमारीचे अनेक प्रकार घडतात. विविध अवैध धंद्यांची वाहतूक करण्यासाठी हा मार्ग जणू सोयीचाच बनला आहे. घाटाच्या डोंगर परिसरात पायथ्याला महादेवाचे मंदिर आहे. त्याच्या देवदर्शनाच्या नावाखाली भाविकांपेक्षा प्रेमीयुगुलांचीच गर्दी अधिक असल्याचे दिसून येते. तेव्हा हा घाट म्हणजे कऱ्हाड, मसूर, उंब्रज, ओगलेवाडी, पुसेसावळी परिसरातील प्रेमीयुगुलांचे खास पर्यटन स्थळच म्हणावे लागेल.याठिकाणी येणाऱ्या प्रेमीयुगुलांच्या असाह्यतेचा फायदा घेत त्यांना लुटण्याचे अनेक प्रकारही याठिकाणी घडले आहेत. मात्र, अब्रूच्या भीतीपोटी यांच्या तक्रारी कुठे दाखल झालेल्या नाहीत. लुटमार व चोरीच्या प्रकारामुळे या मार्गावरून रात्री-अपरात्री जाण्याचे प्रवासीही टाळतात.याच घाटात दिवेकर खून प्रकरण गाजले होते. तसेच रेव्ह पार्ट्यांवर पोलिसांनी यापूर्वी कारवाईही केली आहे. या घाटात हैद्राबादवरून येणाऱ्या ३५ लाखांचा बेकायदेशीर वाहतूक करणारा गुटखाही पोलिसांनी पकडला होता. बारामती-पुणे जिल्ह्यांतील सराईत गुन्हेगारांची टोळी याच घाटात पोलिसांनी शिताफीने पकडली होती. एका शाळकरी मुलीला पळवून नेत लुटीचा बनाव करणाऱ्या एक रिक्षा चालकाचाही पर्दाफाश याच घाटात पोलिसांनी केला होता. अशा गंभीर व विविध गुन्ह्यांमुळे हा घाट नेहमी चर्चेत राहिला आहे. हा घाट सातारा, सांगली जिल्ह्याला जोडणारा असल्याने अनेक अवैध धंद्यांंची वाहतूक सातत्याने होत असते.अशा विविध कारणांसाठी वादग्रस्त आणि चर्चेचा विषय ठरलेल्या या घाटात पोलिस चौकी (चेकनाका) व्हावा, अशी अनेक वर्षांपूर्वीची ग्रामस्थांची मागणी होती. त्याची दखल घेऊन घाटाच्या पायथ्याला पोलिसांचा चेकनाका उभारला. परंतु काही दिवसच येथे पोलिसांची ये-जा राहिली. तथापि, अलीकडच्या काळात पोलिसांचे दर्शन एकदाही झाले नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. याबाबत तत्काळ उपाययोजना आखाव्यात अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (वार्ताहर)प्रशासनाकडून उपाययोजनेची गरज...बंद अवस्थेत असलेला हा पोलिस चेकनाका अनेक वृक्षांनी वेढला आहे. रात्रीचा पेट्रोलिंंग नावाचा प्रकारही दुर्र्मीळ झाला आहे. त्यामुळे या चौकीत कोणीही पोलिस नसल्याचे सर्वश्रूत आहे. तेव्हा घाट परिसरात पोलिसांची धास्ती राहिली नाही. पोलिसांचे चुकून दर्शन झालेच तर ते या घाटात चिरीमीरी गोळा करण्यातच मश्गूल असतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सद्य:स्थितीत पोलिसाविना असलेला चेकनाका जणू शोपीसच बनला असूून, तो नावालाच उभारला आहे का?, असा सवाल ग्रामस्थ करीत आहेत. या शामगाव घाटाची वाट सर्वांसाठी दिवसेंदिवस असुरक्षित बिकटवाट म्हणून चर्चेचा विषय बनली आहे.