शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

पोलिसांनी घेतला सुटकेचा नि:श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:28 IST

चौकट - रेस्क्यू फोर्सचे १५० जवान तैनात स्वाभिमानीच्या जलसमाधी मोर्चात कार्यकर्ते नदीत उडी घेतल्यास त्यांना वाचविण्यासाठी तालुका प्रशासनाने पंचगंगा ...

चौकट - रेस्क्यू फोर्सचे १५० जवान तैनात स्वाभिमानीच्या जलसमाधी मोर्चात कार्यकर्ते नदीत उडी घेतल्यास त्यांना वाचविण्यासाठी तालुका प्रशासनाने पंचगंगा व कृष्णा नदीपात्रात सहा यांत्रिक बोटीसह रेस्क्यू फोर्सच्या जवानांना तैनात केले होते. यामध्ये वजीर रेस्क्यू, पास रेस्क्यू व आधार रेस्क्यू फोर्सचे सुमारे दीडशे जवान नदीपात्रात तैनात होते.

गावागावातून जेवणाची सोय

मोर्चाचे हेरवाड (ता. शिरोळ) येथे दुपारच्या जेवणाचे ग्रामस्थ व स्वाभिमानी कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते. सुमारे तीन हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. त्यासाठी गावागावातून लोकांनी भाकरी, भाजी, भात आणला होता.

चौकट -

कुरुंदवाड-नृसिंहवाडी पुलावर कडक बंदोबस्त

आंदोलक जलसमाधीसाठी पुलावरून उडी मारू नये यासाठी पोलीस प्रशासनाने पंचगंगा नदीवरील दिनकरराव यादव पुलावर दोन्ही बाजूस पावला पावलावर पोलीस तैनात केले होते. शिवाय पोलिसांनी रस्सी धरून एकही आंदोलक पुलाच्या कठड्याकडे येणार नाही याची दक्षता घेतली होती. पोलिसांच्या कडक बंदोबस्तामुळे एका शेतकऱ्याने लघुशंकेचा बहाणा करून पोलिसांना चकवा देत थेट नदीत उडी मारली. पोलिसांनी त्या कार्यकर्त्याचा पाठलाग केला. मात्र, त्याला अडविण्यात यश आले नाही. त्यामुळे या घटनेची आंदोलन ठिकाणी चांगलीच चर्चा रंगली होती.

दोघा कार्यकर्त्यांची पंचगंगा नदीत उडी

मोठा पोलीस बंदोबस्त असतानाही धनंजय टारे (रा. आळते, ता. शिरोळ) व बाहुबली सारपे (रा. सरकुला, ता. पंढरपूर) अशा दोन शेतकऱ्यांनी कुरुंदवाड-नृसिंहवाडी रस्त्यावरील पंचगंगा नदीवरील दिनकरराव यादव पुलावरून नदीपात्रात उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी नदीपात्रात प्रशासनाने तैनात केलेल्या यांत्रिक बोटीवरील रेस्क्यू फोर्सच्या जवानांनी त्यांना वाचविण्यात आले. मात्र, या घटनेने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. शिवाय पोलिसांवर मोठा ताण आला होता.

चौकट - राजू शेट्टींकडून नाराजी व्यक्त

मोर्चा नृसिंहवाडीत पोहोचण्यापूर्वी दोन शेतकऱ्यांनी पंचगंगा नदीत उडी घेतल्याचे समजताच राजू शेट्टी यांनी अतिउत्साही कार्यकर्त्यांवर भर सभेतच नाराजी व्यक्त केली. स्वाभिमानीच्या आंदोलनाला शिस्त आहे. कोणताही कार्यकर्ता मनाला येईल तसे वागून चालत नाही. कार्यकर्त्यांचा जीव धोक्यात घालून मी आंदोलन करत नाही. जलसमाधीची घोषणा मी केली आहे. शासन सकारात्मक निर्णयापर्यंत आले आहे. त्याच्या प्रस्तावाचा सर्वानी निर्णय घेऊन जलसमाधी घ्यावयाचे असेल तर प्रथम मी घेईन. मात्र, येथून पुढे संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याने आगाऊपणा करावयाचे नाही, असे शेट्टी यांनी खडसावले.