शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

कचरा उठावासाठी विष प्राशनाचा इशारा

By admin | Updated: February 6, 2016 00:03 IST

उदगाव ग्रामसभा : वाहतुकीस अडथळा करणारी अतिक्रमणे काढणार

जयसिंगपूर : ग्रामपंचायत जागेत मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचत आहेत, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ग्रामपंचायतीला वारंवार कळवूनही याबाबत कानाडोळा करीत आहे. त्वरित कचरा उठाव करा, अन्यथा सहकुटुंब विष प्राशन करण्याचा इशारा येथील एका महिलेने ग्रामसभेत दिल्याने एकच खळबळ उडाली. उदगाव (ता. शिरोळ) येथे २६ जानेवारीची तहकूब ग्रामसभा आज, शुक्रवारी सकाळी अकरा वाजता घेण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच स्वाती पाटील होत्या. प्रारंभी ग्रामविकास अधिकारी संजय बर्डे यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. यावेळी १४ व्या वित्त आयोगातील ३२ लाख रुपये ग्रामपंचायतीकडे असल्याने याच्या आराखड्याची माहिती देऊन मंजुरी घेण्यात आली. दरम्यान, सोनबा पाटील यांनी बिअरबारसाठी ग्रामपंचायतीत मंजुरी पत्र दाखल केले होते. मात्र, याला विरोधी गटातील महिला सदस्यांनी विरोध केला, तर सत्तारूढ सदस्य शिवाजी कोळी यांनी यास परवानगी द्या, अन्यथा गावातील सर्वच परवाने रद्द करा, अशी मागणी केली.स्वच्छतेवरून धोंडूबाई कदम यांनी ग्रामपंचायत सदस्यासह प्रशासनाला धारेवर धरून प्रश्नांचा भडिमार केला. प्रत्येक वेळी पाहणी करून जाता, स्वच्छता करण्याबाबत अंमलबजावणी होत नाही, असा सवाल उपस्थित करून स्वच्छता करा अन्यथा सहकुटुंब विष प्राशन करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला. यावर सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांनी तुमचा प्रश्न ताबडतोब निकालात काढण्याची ग्वाही दिली.यावेळी पाणीपुरवठा, स्वच्छता समिती, सामाजिक लेखापरीक्षण समिती गठीत करण्यात आली, तर बसस्थानकावरील अतिक्रमण व अनधिकृत डिजिटल फलके काढण्याचा दुसऱ्यांदा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच मुख्य रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमणे काढण्याचा ठराव करण्यात आला. यासह विषयपत्रिकेवरील ३२ विषयांपैकी २६ विषयांना ग्रामसभेत मंजुरी घेण्यात आली. याप्रसंगी उपसरपंच प्रकाश बंडगर, तंटामुक्तीचे अध्यक्ष सुभाष कोरे, प्रज्ञा मगदूम, सविता ठोमके, शिवाजी कोळी, राजाराम वरेकर, अभिनंदन पाटील, राजेंद्र मगदूम, भरत पाटील, शांताराम पाटील, दिलीप माने, शरद लुगडे, अमोल माने यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)