शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

गडहिंग्लजला सांडपाण्याचे कवित्व

By admin | Updated: April 17, 2015 00:15 IST

जबाबदार कोण : कायमस्वरूपी उपाययोजनेचे काय ?

राम मगदूम - गडहिंग्लज सांडपाणी बंधाऱ्यातील सांडपाणी उपसण्याच्या ठेक्याच्या मक्तेदाराने त्या कामाच्या ठेक्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे गडहिंग्लज शहरातील सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांची तक्रार झाली की, सांडपाण्याची वेळोवेळी चर्चा होते. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनेचे काय? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. गडहिंग्लज शहराची लोकवस्ती ३० हजारांच्या आसपास आहे. दररोज शहराला सुमारे ६० लाख लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यापैकी ४० लाख लिटर पाणी वाया जाते. वाया जाणाऱ्या पाण्यामुळेच सांडपाण्याचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या काही भागांतून एकत्र करण्यात आलेले सांडपाणी नदीवेशीकडे हिरण्यकेशी नदीच्या दिशेने वाहून जाते.सांडपाणी थेट नदीत मिसळू नये, यासाठी नदीघाटानजीक नगरपालिकेने बंधारा बांधला आहे. बंधाऱ्याची साठवण क्षमता सुमारे १५ लाख लिटर असून, साठणाऱ्या सांडपाण्याचा दररोज उपसा करावा लागतो. त्यासाठी सांडपाणी उपसण्याचे काम ठेका पद्धतीने दिले जाते. उपसलेले सांडपाणी आजूबाजूच्या शेतीला वापरले जाते.२०१३ मध्ये सांडपाणी उपसण्याच्या कामाची फेरनिविदा काढण्यात आली. त्यावेळी लक्ष्मण बाबूराव शिंदे यांनी हा ठेका घेतला. मात्र, आठवड्यापूर्वीच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘या’ ठेक्यावर मोठा वादंग झाला. ठेकेदार शिंदे हे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेविका दीपा बरगे यांचे बंधू असल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे. सांडपाण्याची फेरनिविदा काढण्यात आली, त्यावेळी सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने कोणतीही कल्पना न देता चार-पाच कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या होत्या. आठवड्यापूर्वी ठेक्याच्या करारपत्रावर आपल्या सह्या करून घेण्यात आल्या आहेत; मात्र त्या ठेक्याशी आपला किंवा आपल्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध नाही, असा खुलासा खुद्द शिंदेंनी केला आहे. त्यामुळे हा ठेका नेमका कुणाकडे आहे? त्यासाठी कुणाला जबाबदार धरायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रदूषण मंडळाची पालिकेला नोटीस‘मे’मध्ये होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांडपाण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सांडपाणी नदीत मिसळल्यास गडहिंग्लजच्या पूर्वभागातील २० ते २५ खेड्यांतील लोकांच्या आरोग्यालाही धोका पोहोचणार आहे. त्यामुळे नियंत्रण मंडळाने पालिकेला नोटीस बजावून याप्रश्नी तातडीने उपाय योजण्याच्या सूचना दिल्या आहेत.सांडपाण्यावर प्रक्रियेची गरज सांडपाण्याला बांध घालून ते पाणी शेतीला देण्याची जुनी पद्धत कालबाह्य ठरली आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगरपालिकेने अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र व राज्याकडून खास निधीदेखील मिळतो. मात्र, त्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.‘बोली’ची चढाओढ ‘बंद’!चित्री प्रकल्प होण्यापूर्वी सांडपाणी उपसण्याच्या ठेक्याला मागणी होती. चढाओढीच्या बोलीत लाखो रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळत होते. मात्र, ‘चित्री’ प्रकल्प झाल्यानंतर गडहिंग्लज व परिसरातील शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे शेतीसाठी सांडपाण्याचा वापर कमी झाल्यामुळे या ठेक्याच्या बोलीतील चढाओढ बंद झाली आहे.