शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

गडहिंग्लजला सांडपाण्याचे कवित्व

By admin | Updated: April 17, 2015 00:15 IST

जबाबदार कोण : कायमस्वरूपी उपाययोजनेचे काय ?

राम मगदूम - गडहिंग्लज सांडपाणी बंधाऱ्यातील सांडपाणी उपसण्याच्या ठेक्याच्या मक्तेदाराने त्या कामाच्या ठेक्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे गडहिंग्लज शहरातील सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांची तक्रार झाली की, सांडपाण्याची वेळोवेळी चर्चा होते. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनेचे काय? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. गडहिंग्लज शहराची लोकवस्ती ३० हजारांच्या आसपास आहे. दररोज शहराला सुमारे ६० लाख लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यापैकी ४० लाख लिटर पाणी वाया जाते. वाया जाणाऱ्या पाण्यामुळेच सांडपाण्याचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या काही भागांतून एकत्र करण्यात आलेले सांडपाणी नदीवेशीकडे हिरण्यकेशी नदीच्या दिशेने वाहून जाते.सांडपाणी थेट नदीत मिसळू नये, यासाठी नदीघाटानजीक नगरपालिकेने बंधारा बांधला आहे. बंधाऱ्याची साठवण क्षमता सुमारे १५ लाख लिटर असून, साठणाऱ्या सांडपाण्याचा दररोज उपसा करावा लागतो. त्यासाठी सांडपाणी उपसण्याचे काम ठेका पद्धतीने दिले जाते. उपसलेले सांडपाणी आजूबाजूच्या शेतीला वापरले जाते.२०१३ मध्ये सांडपाणी उपसण्याच्या कामाची फेरनिविदा काढण्यात आली. त्यावेळी लक्ष्मण बाबूराव शिंदे यांनी हा ठेका घेतला. मात्र, आठवड्यापूर्वीच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘या’ ठेक्यावर मोठा वादंग झाला. ठेकेदार शिंदे हे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेविका दीपा बरगे यांचे बंधू असल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे. सांडपाण्याची फेरनिविदा काढण्यात आली, त्यावेळी सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने कोणतीही कल्पना न देता चार-पाच कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या होत्या. आठवड्यापूर्वी ठेक्याच्या करारपत्रावर आपल्या सह्या करून घेण्यात आल्या आहेत; मात्र त्या ठेक्याशी आपला किंवा आपल्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध नाही, असा खुलासा खुद्द शिंदेंनी केला आहे. त्यामुळे हा ठेका नेमका कुणाकडे आहे? त्यासाठी कुणाला जबाबदार धरायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रदूषण मंडळाची पालिकेला नोटीस‘मे’मध्ये होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांडपाण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सांडपाणी नदीत मिसळल्यास गडहिंग्लजच्या पूर्वभागातील २० ते २५ खेड्यांतील लोकांच्या आरोग्यालाही धोका पोहोचणार आहे. त्यामुळे नियंत्रण मंडळाने पालिकेला नोटीस बजावून याप्रश्नी तातडीने उपाय योजण्याच्या सूचना दिल्या आहेत.सांडपाण्यावर प्रक्रियेची गरज सांडपाण्याला बांध घालून ते पाणी शेतीला देण्याची जुनी पद्धत कालबाह्य ठरली आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगरपालिकेने अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र व राज्याकडून खास निधीदेखील मिळतो. मात्र, त्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.‘बोली’ची चढाओढ ‘बंद’!चित्री प्रकल्प होण्यापूर्वी सांडपाणी उपसण्याच्या ठेक्याला मागणी होती. चढाओढीच्या बोलीत लाखो रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळत होते. मात्र, ‘चित्री’ प्रकल्प झाल्यानंतर गडहिंग्लज व परिसरातील शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे शेतीसाठी सांडपाण्याचा वापर कमी झाल्यामुळे या ठेक्याच्या बोलीतील चढाओढ बंद झाली आहे.