शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

गडहिंग्लजला सांडपाण्याचे कवित्व

By admin | Updated: April 17, 2015 00:15 IST

जबाबदार कोण : कायमस्वरूपी उपाययोजनेचे काय ?

राम मगदूम - गडहिंग्लज सांडपाणी बंधाऱ्यातील सांडपाणी उपसण्याच्या ठेक्याच्या मक्तेदाराने त्या कामाच्या ठेक्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा खुलासा केला आहे. त्यामुळे गडहिंग्लज शहरातील सांडपाण्याच्या विल्हेवाटीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नागरिकांची तक्रार झाली की, सांडपाण्याची वेळोवेळी चर्चा होते. मात्र, त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनेचे काय? असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे. गडहिंग्लज शहराची लोकवस्ती ३० हजारांच्या आसपास आहे. दररोज शहराला सुमारे ६० लाख लिटर पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यापैकी ४० लाख लिटर पाणी वाया जाते. वाया जाणाऱ्या पाण्यामुळेच सांडपाण्याचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या काही भागांतून एकत्र करण्यात आलेले सांडपाणी नदीवेशीकडे हिरण्यकेशी नदीच्या दिशेने वाहून जाते.सांडपाणी थेट नदीत मिसळू नये, यासाठी नदीघाटानजीक नगरपालिकेने बंधारा बांधला आहे. बंधाऱ्याची साठवण क्षमता सुमारे १५ लाख लिटर असून, साठणाऱ्या सांडपाण्याचा दररोज उपसा करावा लागतो. त्यासाठी सांडपाणी उपसण्याचे काम ठेका पद्धतीने दिले जाते. उपसलेले सांडपाणी आजूबाजूच्या शेतीला वापरले जाते.२०१३ मध्ये सांडपाणी उपसण्याच्या कामाची फेरनिविदा काढण्यात आली. त्यावेळी लक्ष्मण बाबूराव शिंदे यांनी हा ठेका घेतला. मात्र, आठवड्यापूर्वीच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘या’ ठेक्यावर मोठा वादंग झाला. ठेकेदार शिंदे हे सत्ताधारी राष्ट्रवादीच्या नगरसेविका दीपा बरगे यांचे बंधू असल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी विरोधी आघाडीच्या नगरसेवकांनी केली आहे. सांडपाण्याची फेरनिविदा काढण्यात आली, त्यावेळी सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने कोणतीही कल्पना न देता चार-पाच कोऱ्या कागदांवर सह्या घेतल्या होत्या. आठवड्यापूर्वी ठेक्याच्या करारपत्रावर आपल्या सह्या करून घेण्यात आल्या आहेत; मात्र त्या ठेक्याशी आपला किंवा आपल्या कुटुंबीयांचा कोणताही संबंध नाही, असा खुलासा खुद्द शिंदेंनी केला आहे. त्यामुळे हा ठेका नेमका कुणाकडे आहे? त्यासाठी कुणाला जबाबदार धरायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रदूषण मंडळाची पालिकेला नोटीस‘मे’मध्ये होणाऱ्या महालक्ष्मी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांडपाण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. सांडपाणी नदीत मिसळल्यास गडहिंग्लजच्या पूर्वभागातील २० ते २५ खेड्यांतील लोकांच्या आरोग्यालाही धोका पोहोचणार आहे. त्यामुळे नियंत्रण मंडळाने पालिकेला नोटीस बजावून याप्रश्नी तातडीने उपाय योजण्याच्या सूचना दिल्या आहेत.सांडपाण्यावर प्रक्रियेची गरज सांडपाण्याला बांध घालून ते पाणी शेतीला देण्याची जुनी पद्धत कालबाह्य ठरली आहे. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी नगरपालिकेने अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी केंद्र व राज्याकडून खास निधीदेखील मिळतो. मात्र, त्यासाठी पाठपुराव्याची गरज आहे.‘बोली’ची चढाओढ ‘बंद’!चित्री प्रकल्प होण्यापूर्वी सांडपाणी उपसण्याच्या ठेक्याला मागणी होती. चढाओढीच्या बोलीत लाखो रुपयांचे उत्पन्न पालिकेला मिळत होते. मात्र, ‘चित्री’ प्रकल्प झाल्यानंतर गडहिंग्लज व परिसरातील शेतीला मुबलक पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे शेतीसाठी सांडपाण्याचा वापर कमी झाल्यामुळे या ठेक्याच्या बोलीतील चढाओढ बंद झाली आहे.