शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

हवामानातील बदल रोखण्यासाठी वृक्षारोपणाचा आधार

By admin | Updated: March 23, 2015 00:43 IST

बी. एस. मोहिते : कार्बन सिंक, ग्रीन पॅच वाढविण्याची गरज

कोल्हापूर : पर्यावरणाचे संतुलन आणि हवामानातील बदल रोखण्यासाठी वृक्षारोपण चळवळीचा एकमेव आधार आहे. ही चळवळ व्यापक करण्यासाठी समाजातील सर्व घटकांशी तिला जोडण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक व शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. बी. एस. मोहिते यांनी व्यक्त केले. ‘जागतिक हवामान दिना’निमित्त डॉ. मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना हवामान बदलाची सद्य:स्थिती मांडली.डॉ. मोहिते म्हणाले, कोळसा, विजेचा वाढता वापर, वाहनांचे वाढते प्रमाण आणि झालेली औद्योगिक क्रांतीमुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढत आहे. गेल्यावर्षी जगात ७.५ बिलियन मेट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन झाले आहे. वातावरणातील उच्च सुरक्षित कार्बनचे प्रमाण (अप्पर सेफेश्ट लिमिट) हे ३५० पार्टस् पर मिलियन (पीपीएम) आहे. सुरक्षित स्वरूपातील हे पीपीएम जगाने गेल्या २५ वर्षांपूर्वीच ओलांडले आहे. आताच्या स्थिती पाहता दरवर्षी किमान तीन पीपीएम इतकी कार्बनची वाढ होत राहील. त्यामुळे वाढते प्रदूषण रोखले नाही तर आगामी २० ते २५ वर्षांत जगातील वातावरणातील कार्बनचे प्रमाण ४५० पीपीएमपर्यंत जाईल आणि ते सर्वांसाठी घातक ठरणारे आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी समुद्रातील रवाळ (कोरल्स्) टिकविणे, कार्बन सिंक, ग्रीन पॅच वाढविणे महत्त्वाचे ठरणारे आहे. हवामान बदलामुळे यंदाचे वर्षे आपत्तीचे आहे. त्याची सुरुवात अवकाळी पाऊस, गारपिटीने झाली आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढणार आहे. २०१५ मध्ये जुलैच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात मान्सून सुरू होईल, असा अंदाज आहे.हवामानातील बदल यामुळे होतो...ते म्हणाले, पृथ्वीच्या वातावरणाचा विचार करता पृष्ठभागाचे तापमान १७ डिग्री सेल्सियस इतके असते. या भागापासून १५ किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या भागाला ‘टोफ्रोस्फियर’, तर १५ ते ५० किलोमीटरपर्यंतच्या भागाला ‘स्ट्रोस्फियर’ म्हटले जाते. या दोन्हींच्या सीमारेषेला ‘ट्रोफोपॉज’ म्हणतात त्याचे तापमान मायनस ६० डिग्री सेल्सियस असते. सौरवारे ज्यावेळी ट्रोफोपॉजीशी इंटरअ‍ॅक्ट होतात. तापमानात बदल होऊन त्याचा परिणाम वातावरण, हवामान बदलावर होतो. त्यात अनेकदा गारा तयार होऊन गारपीट होते. वृक्षतोड, पाणीसाठे संपविणे अशा पद्धतीने पर्यावरणाचे संतुलन बिघडविण्याची प्रक्रिया वर्षागणिक वाढत आहे. त्याचा मान्सून आदी स्वरुपात हवामान बदलांतून फटका बसत आहे. तापमान वाढेलगेल्या पाच वर्षांपर्यंत जागतिक तापमान साधारणत: एक डिग्री सेल्सियसने वाढले आहे. त्याचा परिणाम थर्मोलाईन करंटवर होत आहे. प्रदूषण वाढत राहिल्यास या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमान सहा ते सात डिग्रीने वाढण्याची शक्यता डॉ. मोहिते यांनी व्यक्त केली.पर्यावरण संतुलनासाठी हे गरजेचेपर्यावरणपूरक औद्योगिक विकासहरितगृहांमधील वायूंचे उत्सर्जन रोखणेजंगलतोड रोखून, वृक्षारोपणाचे प्रमाण वाढविणे