शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
2
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
3
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
5
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
6
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
7
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
8
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
9
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
10
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
11
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
12
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
13
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
14
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
15
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
16
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
17
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
18
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
19
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
20
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”

हवामानातील बदल रोखण्यासाठी वृक्षारोपणाचा आधार

By admin | Updated: March 23, 2015 00:43 IST

बी. एस. मोहिते : कार्बन सिंक, ग्रीन पॅच वाढविण्याची गरज

कोल्हापूर : पर्यावरणाचे संतुलन आणि हवामानातील बदल रोखण्यासाठी वृक्षारोपण चळवळीचा एकमेव आधार आहे. ही चळवळ व्यापक करण्यासाठी समाजातील सर्व घटकांशी तिला जोडण्याची गरज असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक व शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. बी. एस. मोहिते यांनी व्यक्त केले. ‘जागतिक हवामान दिना’निमित्त डॉ. मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना हवामान बदलाची सद्य:स्थिती मांडली.डॉ. मोहिते म्हणाले, कोळसा, विजेचा वाढता वापर, वाहनांचे वाढते प्रमाण आणि झालेली औद्योगिक क्रांतीमुळे वातावरणातील कार्बनचे प्रमाण वाढत आहे. गेल्यावर्षी जगात ७.५ बिलियन मेट्रिक टन कार्बनचे उत्सर्जन झाले आहे. वातावरणातील उच्च सुरक्षित कार्बनचे प्रमाण (अप्पर सेफेश्ट लिमिट) हे ३५० पार्टस् पर मिलियन (पीपीएम) आहे. सुरक्षित स्वरूपातील हे पीपीएम जगाने गेल्या २५ वर्षांपूर्वीच ओलांडले आहे. आताच्या स्थिती पाहता दरवर्षी किमान तीन पीपीएम इतकी कार्बनची वाढ होत राहील. त्यामुळे वाढते प्रदूषण रोखले नाही तर आगामी २० ते २५ वर्षांत जगातील वातावरणातील कार्बनचे प्रमाण ४५० पीपीएमपर्यंत जाईल आणि ते सर्वांसाठी घातक ठरणारे आहे. हवामान बदलाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी समुद्रातील रवाळ (कोरल्स्) टिकविणे, कार्बन सिंक, ग्रीन पॅच वाढविणे महत्त्वाचे ठरणारे आहे. हवामान बदलामुळे यंदाचे वर्षे आपत्तीचे आहे. त्याची सुरुवात अवकाळी पाऊस, गारपिटीने झाली आहे. त्यामुळे रोगराईचे प्रमाण वाढणार आहे. २०१५ मध्ये जुलैच्या तिसऱ्या ते चौथ्या आठवड्यात मान्सून सुरू होईल, असा अंदाज आहे.हवामानातील बदल यामुळे होतो...ते म्हणाले, पृथ्वीच्या वातावरणाचा विचार करता पृष्ठभागाचे तापमान १७ डिग्री सेल्सियस इतके असते. या भागापासून १५ किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या भागाला ‘टोफ्रोस्फियर’, तर १५ ते ५० किलोमीटरपर्यंतच्या भागाला ‘स्ट्रोस्फियर’ म्हटले जाते. या दोन्हींच्या सीमारेषेला ‘ट्रोफोपॉज’ म्हणतात त्याचे तापमान मायनस ६० डिग्री सेल्सियस असते. सौरवारे ज्यावेळी ट्रोफोपॉजीशी इंटरअ‍ॅक्ट होतात. तापमानात बदल होऊन त्याचा परिणाम वातावरण, हवामान बदलावर होतो. त्यात अनेकदा गारा तयार होऊन गारपीट होते. वृक्षतोड, पाणीसाठे संपविणे अशा पद्धतीने पर्यावरणाचे संतुलन बिघडविण्याची प्रक्रिया वर्षागणिक वाढत आहे. त्याचा मान्सून आदी स्वरुपात हवामान बदलांतून फटका बसत आहे. तापमान वाढेलगेल्या पाच वर्षांपर्यंत जागतिक तापमान साधारणत: एक डिग्री सेल्सियसने वाढले आहे. त्याचा परिणाम थर्मोलाईन करंटवर होत आहे. प्रदूषण वाढत राहिल्यास या शतकाच्या अखेरीस जागतिक तापमान सहा ते सात डिग्रीने वाढण्याची शक्यता डॉ. मोहिते यांनी व्यक्त केली.पर्यावरण संतुलनासाठी हे गरजेचेपर्यावरणपूरक औद्योगिक विकासहरितगृहांमधील वायूंचे उत्सर्जन रोखणेजंगलतोड रोखून, वृक्षारोपणाचे प्रमाण वाढविणे