शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

साखर उत्पादन कमी करण्याचे नियोजन

By admin | Updated: September 20, 2014 00:29 IST

साखर उत्पादन कमी करण्याचे नियोजन

विश्वास पाटील-कोल्हापूर -गतवर्षीचा साखरेचा साठा शिल्लक आहे व यंदाही सुमारे गरजेपेक्षा वीस लाख टनांहून जास्त साखर उत्पादन देशात होणार असल्याने कारखान्यांचे साखर उत्पादन कमी कसे करता येईल, यासंबंधीचे नियोजन करण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवारी मुंबईत साखर संघाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यासंबंधीचा तांत्रिक प्रस्ताव आठवड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट(व्हीएसआय)ने तयार करावा व तो राज्य साखर संघामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय झाला. हा प्रस्ताव राज्याकडून केंद्राकडे गेल्यावर आपण त्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन पवार यांनी दिले.देशात गेल्या हंगामातील सुमारे ८० लाख टन साखर शिल्लक आहे. यंदाही देशभर चांगला पाऊस झाल्यामुळे किमान २५० लाख टन साखर उपलब्ध होईल, असा प्राथमिक अंदाज इंडियन शुगर मिल असोसिएशनने(इस्मा)ने दोनच दिवसांपूर्वी व्यक्त केला आहे. देशाची साखरेची वार्षिक गरज २३० लाख टन आहे. त्यामुळे यंदाही त्याहून जास्त २० लाख टन साखर बाजारात आल्यास साखरेचे दर आणखी कोसळणार आहेत. आताच हे दर २८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. हंगाम सुरू होताच ते अडीच हजारांवर येतील, अशी भीती कारखानदारीतून व्यक्त होत आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून काय करायचे, याचा विचार करण्यासाठी मुख्यत: ही बैठक झाली. त्यास पवार यांच्यासह सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, अखिल भारतीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, व्यवस्थापकीय संचालक मनोहर जोशी, ‘व्हीएसआय’चे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव देशमुख, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर, आदी उपस्थित होते. या बैठकीत ‘व्हीएसआय’च्या तज्ज्ञांनी प्रारंभी काही माहिती दिली.साखरेऐवजी दोन-तीन पर्यायउत्पादन कमी करायचे झाल्यास दोन-तीन पर्याय पुढे आले. साखरेऐवजी इथेनॉल करण्यास प्राधान्य दिले जावे. साखर तयार होण्याच्या अंतिम प्रक्रियेत जो सिरप होतो, तसा सिरप तयार करता येऊ शकेल का, अशी चर्चा झाली. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदीनुसार साखर निर्यातीला आता अनुदान देता येत नाही आणि अनुदान मिळणार नसेल, तर साखर निर्यात करण्यास परवडत नाही. त्यामुळे इथेनॉलसाठीच केंद्राकडे लिटरला दहा रुपयांचे अनुदान मागण्यात यावे, अशी चर्चा झाली. त्यासंबंधीचा तांत्रिक प्रस्ताव ‘व्हीएसआय’ने आठ दिवसांत तयार करून साखर संघामार्फत राज्य शासनाला द्यावा, अशा सूचना पवार यांनी बैठकीत केल्या.