शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साखर उत्पादन कमी करण्याचे नियोजन

By admin | Updated: September 20, 2014 00:29 IST

साखर उत्पादन कमी करण्याचे नियोजन

विश्वास पाटील-कोल्हापूर -गतवर्षीचा साखरेचा साठा शिल्लक आहे व यंदाही सुमारे गरजेपेक्षा वीस लाख टनांहून जास्त साखर उत्पादन देशात होणार असल्याने कारखान्यांचे साखर उत्पादन कमी कसे करता येईल, यासंबंधीचे नियोजन करण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत आज, शुक्रवारी मुंबईत साखर संघाच्या कार्यालयात बैठक झाली. त्यासंबंधीचा तांत्रिक प्रस्ताव आठवड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट(व्हीएसआय)ने तयार करावा व तो राज्य साखर संघामार्फत राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णय झाला. हा प्रस्ताव राज्याकडून केंद्राकडे गेल्यावर आपण त्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन पवार यांनी दिले.देशात गेल्या हंगामातील सुमारे ८० लाख टन साखर शिल्लक आहे. यंदाही देशभर चांगला पाऊस झाल्यामुळे किमान २५० लाख टन साखर उपलब्ध होईल, असा प्राथमिक अंदाज इंडियन शुगर मिल असोसिएशनने(इस्मा)ने दोनच दिवसांपूर्वी व्यक्त केला आहे. देशाची साखरेची वार्षिक गरज २३० लाख टन आहे. त्यामुळे यंदाही त्याहून जास्त २० लाख टन साखर बाजारात आल्यास साखरेचे दर आणखी कोसळणार आहेत. आताच हे दर २८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. हंगाम सुरू होताच ते अडीच हजारांवर येतील, अशी भीती कारखानदारीतून व्यक्त होत आहे. त्यावरील उपाययोजना म्हणून काय करायचे, याचा विचार करण्यासाठी मुख्यत: ही बैठक झाली. त्यास पवार यांच्यासह सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, साखर संघाचे अध्यक्ष खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, उपाध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, अखिल भारतीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, व्यवस्थापकीय संचालक मनोहर जोशी, ‘व्हीएसआय’चे व्यवस्थापकीय संचालक शिवाजीराव देशमुख, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजीव बाबर, आदी उपस्थित होते. या बैठकीत ‘व्हीएसआय’च्या तज्ज्ञांनी प्रारंभी काही माहिती दिली.साखरेऐवजी दोन-तीन पर्यायउत्पादन कमी करायचे झाल्यास दोन-तीन पर्याय पुढे आले. साखरेऐवजी इथेनॉल करण्यास प्राधान्य दिले जावे. साखर तयार होण्याच्या अंतिम प्रक्रियेत जो सिरप होतो, तसा सिरप तयार करता येऊ शकेल का, अशी चर्चा झाली. जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदीनुसार साखर निर्यातीला आता अनुदान देता येत नाही आणि अनुदान मिळणार नसेल, तर साखर निर्यात करण्यास परवडत नाही. त्यामुळे इथेनॉलसाठीच केंद्राकडे लिटरला दहा रुपयांचे अनुदान मागण्यात यावे, अशी चर्चा झाली. त्यासंबंधीचा तांत्रिक प्रस्ताव ‘व्हीएसआय’ने आठ दिवसांत तयार करून साखर संघामार्फत राज्य शासनाला द्यावा, अशा सूचना पवार यांनी बैठकीत केल्या.