शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

तीन लाख ९९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

By admin | Updated: April 25, 2016 01:00 IST

एक लाख १० हजार क्षेत्र भात : सोयाबीन, भुईमुगाखाली १ लाख पाच हजार हेक्टर जमीन

प्रकाश पाटील - कोपार्डे --यावर्षी हवामान विभागाने चांगल्या मान्सूनचा अंदाज वर्तविला असून, जिल्ह्यात खरीप हंगामातील विविध पिकांखालील क्षेत्रासाठी जिल्हा कृषी विभागाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. खरिपासाठी विविध पिकांखाली तीन लाख ९९ हजार ३० हेक्टरवर नियोजन केले आहे. यात भात, भुईमूग व सोयाबीन पिकासाठी मोठे क्षेत्र आहे.सर्वसाधारण जून ते नोव्हेंबर हा खरिपाचा हंगाम समजला जातो. खरिपामध्ये सिंचन क्षेत्राखाली असणाऱ्या क्षेत्राबरोबर असिंचित क्षेत्राचाही समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने शेतकरी नगदी पीक म्हणून ऊस पिकाला सर्वांत जास्त महत्त्व देतात. यावर्षी पावसाच्या कमतरतेमुळे उसाच्या क्षेत्रात चार हजार ३०० हेक्टरनी घट झाली आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र एक लाख ३७ हजार ३०० हेक्टरवर आले आहे. या खरीप हंगामात भात पिकाखाली एक लाख १० हजार ८०० हेक्टरवर नियोजन आहे. भुईमूग ५२ हजार १०० व सोयाबीन ५३,७०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. खरिपासाठी कृषी विभागाने ३४ हजार ८४३ क्विंटल बियाणांची मागणी केली असून, या हंगामात सोयाबीनचे बियाणे बाजारातून करण्यापेक्षा घरच्याघरी उगवण शक्ती तपासून त्याची पेरणी शेतकऱ्यांनी केल्यास फायद्याचे ठरेल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. सर्वांत जास्त भात पिकाचे बियाणे उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात भात पिकाखालील क्षेत्रात धुळवाफ पेरणी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असते. शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यांत रोप लावणीवर जोर असतो. यावर्षी मान्सून चांगला होणार आहे. बियाणासाठी शेतकऱ्यांनी स्वावलंबीपणे घरच्याघरी बियाणे उगवण शक्ती परीक्षण करून वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. विशेषत: सोयाबीन, भुईमूग पिकांसाठी बियाणे घरचेच वापरण्याचा सल्ला दिला. -चंद्रकांत सूर्यवंशी जि. प. कृषी अधिकारी