शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

तीन लाख ९९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

By admin | Updated: April 25, 2016 01:00 IST

एक लाख १० हजार क्षेत्र भात : सोयाबीन, भुईमुगाखाली १ लाख पाच हजार हेक्टर जमीन

प्रकाश पाटील - कोपार्डे --यावर्षी हवामान विभागाने चांगल्या मान्सूनचा अंदाज वर्तविला असून, जिल्ह्यात खरीप हंगामातील विविध पिकांखालील क्षेत्रासाठी जिल्हा कृषी विभागाकडून योग्य नियोजन करण्यात आले आहे. खरिपासाठी विविध पिकांखाली तीन लाख ९९ हजार ३० हेक्टरवर नियोजन केले आहे. यात भात, भुईमूग व सोयाबीन पिकासाठी मोठे क्षेत्र आहे.सर्वसाधारण जून ते नोव्हेंबर हा खरिपाचा हंगाम समजला जातो. खरिपामध्ये सिंचन क्षेत्राखाली असणाऱ्या क्षेत्राबरोबर असिंचित क्षेत्राचाही समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने शेतकरी नगदी पीक म्हणून ऊस पिकाला सर्वांत जास्त महत्त्व देतात. यावर्षी पावसाच्या कमतरतेमुळे उसाच्या क्षेत्रात चार हजार ३०० हेक्टरनी घट झाली आहे. यावर्षी उसाचे क्षेत्र एक लाख ३७ हजार ३०० हेक्टरवर आले आहे. या खरीप हंगामात भात पिकाखाली एक लाख १० हजार ८०० हेक्टरवर नियोजन आहे. भुईमूग ५२ हजार १०० व सोयाबीन ५३,७०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन आहे. खरिपासाठी कृषी विभागाने ३४ हजार ८४३ क्विंटल बियाणांची मागणी केली असून, या हंगामात सोयाबीनचे बियाणे बाजारातून करण्यापेक्षा घरच्याघरी उगवण शक्ती तपासून त्याची पेरणी शेतकऱ्यांनी केल्यास फायद्याचे ठरेल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. सर्वांत जास्त भात पिकाचे बियाणे उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यात भात पिकाखालील क्षेत्रात धुळवाफ पेरणी मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे मेच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असते. शाहूवाडी, राधानगरी, पन्हाळा, गगनबावडा या तालुक्यांत रोप लावणीवर जोर असतो. यावर्षी मान्सून चांगला होणार आहे. बियाणासाठी शेतकऱ्यांनी स्वावलंबीपणे घरच्याघरी बियाणे उगवण शक्ती परीक्षण करून वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल. विशेषत: सोयाबीन, भुईमूग पिकांसाठी बियाणे घरचेच वापरण्याचा सल्ला दिला. -चंद्रकांत सूर्यवंशी जि. प. कृषी अधिकारी