शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
4
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
5
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
6
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
7
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
8
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
9
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
10
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
11
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
12
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
13
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
14
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
15
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
16
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
17
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
18
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
19
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
20
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!

रांगणा किल्ल्याच्या संवर्धनाचे नियोजन

By admin | Updated: May 25, 2016 01:11 IST

विलास वहाने : किल्ल्याच्या दुरवस्थेची कहाणी मांडणाऱ्या ‘लोकमत’च्या छायावृत्ताची दखल

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्णातील रांगणा किल्ल्याची राज्य शासनाच्या पुरातत्त्व खात्याच्या यादीत नोंद आहे. या किल्ल्याच्या डागडुजीसंदर्भात नियोजन करण्यात आले असून, त्याचे जतन व संवर्धन केले जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने यांनी दिली. कोल्हापुरातील पन्हाळगडाची जागतिक वारसास्थळात नोंद करता येईल का, याच्या पाहणीसाठी केंद्र सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लागार व जागतिक वारसास्थळ समितीच्या सदस्य डॉ. शिखा जैन तसेच भारत सरकारच्या स्मारक प्राधिकरणाच्या सदस्य व राजस्थानच्या इतिहासकार डॉ. रिमा हुजा यांच्यासह महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाने, अधिकारी जया गोळवे, सांस्कृतिक विभागाच्या सहायक संचालक अनिता तळेकर, दुर्ग अभ्यासक प्रमोद मांडे हे मंगळवारी कोल्हापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी शिखा जैन यांच्यासह वहाने यांनी ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘रांगणा किल्ला घेतोय अखेरचा श्वास’ या मथळ्याखाली किल्ल्याच्या दुरवस्थेची कहाणी मांडणाऱ्या छायावृत्ताची दखल घेत किल्ल्याचे जतन केले जाईल, अशी ग्वाही दिली. ते म्हणाले, पहिल्या टप्प्यात किल्ल्याची तटबंदी, दगडी बांधकामावरील झाडेझुडपे काढली जातील. त्यानंतर ढासळत चाललेल्या दगडी बांधकामाची पुनर्बांधणी केली जाईल आणि शेवटच्या टप्प्यात मूळ किल्ला कसा होता, याचा आराखडा तयार करून त्याप्रमाणे त्याची पुनर्बांधणी करण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झालेला रांगणा किल्ला स्वराज्याचा साक्षीदार आहे. त्याकाळी शिवाजी महाराजांनी या गडाच्या डागडुजीसाठी सहा हजार होन खर्च केल्याची नोंद आहे. पावसाळ्यात या किल्ल्यासह परिसराचे दृश्य विलोभनीय असते. ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद्ध झालेले रांगणा किल्ल्याचे छायावृत्त पाहताना सांस्कृतिक मंत्रालयाच्या सल्लागार व जागतिक वारसा स्थळ समितीच्या सदस्या शिखा जैन.