शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा करा

By admin | Updated: April 3, 2015 23:56 IST

व्यापारी, रहिवाशांचा सूर : अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण; सूक्ष्म सर्वेक्षणानंतर पुन्हा बैठक होणार

कोल्हापूर : अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा चांगला आहे; परंतु आम्हाला तुम्ही पर्यायी जागा कुठे देणार? जागेचा मोबदला किती मिळणार? याबाबत कोणतेच स्पष्टीकरण नसताना आराखड्याची घाई कशाला? असा सवाल व्यापारी व स्थानिक रहिवाशांनी महापालिका अधिकाऱ्यांना शुक्रवारी विचारला. आम्हाला विश्वासात घेऊनच याबाबतचा अंतिम आराखडा करा, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. हा प्रारूप आराखडा असून तो अंतिम नाही. याबाबत सूक्ष्म सर्वेक्षणानंतर पुन्हा संबंधितांची बैठक घेऊ, असे आश्वासन महापालिका शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिले.महालक्ष्मी धर्मशाळेच्या हॉलमध्ये अंबाबाई मंदिराच्या परिसरातील व्यापारी व स्थानिक रहिवाशी यांच्यासाठी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे महापालिकेतर्फे सादरीकरण झाले. नेत्रदीप सरनोबत यांनी २५५ कोटी रुपयांच्या अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी अंबाबाई मंदिर परिसराबरोबरच रंकाळा विकास याबाबत आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेली माहिती दिली. तसेच विकासाच्या दृष्टिकोनातून विद्यापीठ हायस्कूल व परिसरातील व्यापारी, रहिवाशांचे पुनर्वसन करावे, असे या प्रस्तावात आहे. आराखड्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या मिळकतदारांचे पुनर्वसन होणार असल्याचे सांगून याबाबत व्यापारी व स्थानिक रहिवाशांनी सूचना मांडाव्यात, असे त्यांनी सांगितले.राजाभाऊ जोशी यांनी, आम्हाला कुठे जागा देणार हे स्पष्ट केलेले नाही. ते स्पष्ट झाल्यावरच या आराखड्यावर बोलणे योग्य होईल, असे सांगितले. जागेचा मोबदला किती व जागा कुठे देणार या गोष्टी स्पष्ट होणार नसतील तर आराखडा करून आमची कुचंबणा कशाला करता? अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांना केली.अजित ठाणेकर म्हणाले, या परिसरातील व्यापारी व रहिवाशांचा उदरनिर्वाह मंदिरावरच अवलंबून आहे. पुनर्वसनामध्ये याचा विचार होणे गरजेचे आहे. अशोक देसाई यांनी शहरात अकरा मजली इमारती उभ्या राहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या पश्चिमेला इमारती उभारल्यास किरणोत्सवात अडसर निर्माण होऊ शकतो. याबाबत महापालिकेने काही विचार केला आहे का? अशी विचारणा केली.महेश जाधव म्हणाले, फेरफार करून सुधारित आराखडा करतेवेळी व्यापारी, रहिवाशी यांना एकत्रित करून सर्वसंमतीनेच आराखडा करावा, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी आयुक्तांबरोबर चर्चा करून प्रशासनाने समिती नेमावी. यावेळी नगरसेवक आर. डी. पाटील, राजू मेवेकरी, विनायक रेवणकर, आदींनी सूचना मांडल्या. (प्रतिनिधी)