शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
4
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
5
हव्वा अन् धुव्वा...! महिंद्रा थार फेसलिफ्ट लाँच! हे दोन मुख्य बदल, ग्राहकांची मागणी ऐकली..., दोन नवे रंग...
6
Crime: 'मी तुमच्या मुलीची हत्या केलीये'; मित्रासोबत रुमवर गेली अन् निळ्यामध्ये ड्रममध्ये...; तरुणीची हत्या का केली?
7
Neena Kulkarni: जेष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना मानाचा विष्णुदास भावे गौरव पदक जाहीर!
8
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
9
वीटभट्टीवर जुळले प्रेमसंबंध! दोन नातवंडांची आजी सुनेच्या दागिन्यांसह प्रियकरासोबत पळाली
10
Video - कॉर्पोरेट शॉक! "हे कल्चर सगळीकडे करा... "; बरोबर ५ वाजता संपूर्ण ऑफिस रिकामं
11
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
12
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
13
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
14
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
15
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
16
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
17
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
18
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
19
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
20
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?

विश्वासात घेऊनच अंतिम आराखडा करा

By admin | Updated: April 3, 2015 23:56 IST

व्यापारी, रहिवाशांचा सूर : अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादरीकरण; सूक्ष्म सर्वेक्षणानंतर पुन्हा बैठक होणार

कोल्हापूर : अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा चांगला आहे; परंतु आम्हाला तुम्ही पर्यायी जागा कुठे देणार? जागेचा मोबदला किती मिळणार? याबाबत कोणतेच स्पष्टीकरण नसताना आराखड्याची घाई कशाला? असा सवाल व्यापारी व स्थानिक रहिवाशांनी महापालिका अधिकाऱ्यांना शुक्रवारी विचारला. आम्हाला विश्वासात घेऊनच याबाबतचा अंतिम आराखडा करा, अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. हा प्रारूप आराखडा असून तो अंतिम नाही. याबाबत सूक्ष्म सर्वेक्षणानंतर पुन्हा संबंधितांची बैठक घेऊ, असे आश्वासन महापालिका शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिले.महालक्ष्मी धर्मशाळेच्या हॉलमध्ये अंबाबाई मंदिराच्या परिसरातील व्यापारी व स्थानिक रहिवाशी यांच्यासाठी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे महापालिकेतर्फे सादरीकरण झाले. नेत्रदीप सरनोबत यांनी २५५ कोटी रुपयांच्या अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्याचे सादरीकरण केले. यावेळी त्यांनी अंबाबाई मंदिर परिसराबरोबरच रंकाळा विकास याबाबत आराखड्यामध्ये प्रस्तावित केलेली माहिती दिली. तसेच विकासाच्या दृष्टिकोनातून विद्यापीठ हायस्कूल व परिसरातील व्यापारी, रहिवाशांचे पुनर्वसन करावे, असे या प्रस्तावात आहे. आराखड्यामध्ये समाविष्ट होणाऱ्या मिळकतदारांचे पुनर्वसन होणार असल्याचे सांगून याबाबत व्यापारी व स्थानिक रहिवाशांनी सूचना मांडाव्यात, असे त्यांनी सांगितले.राजाभाऊ जोशी यांनी, आम्हाला कुठे जागा देणार हे स्पष्ट केलेले नाही. ते स्पष्ट झाल्यावरच या आराखड्यावर बोलणे योग्य होईल, असे सांगितले. जागेचा मोबदला किती व जागा कुठे देणार या गोष्टी स्पष्ट होणार नसतील तर आराखडा करून आमची कुचंबणा कशाला करता? अशी विचारणा त्यांनी अधिकाऱ्यांना केली.अजित ठाणेकर म्हणाले, या परिसरातील व्यापारी व रहिवाशांचा उदरनिर्वाह मंदिरावरच अवलंबून आहे. पुनर्वसनामध्ये याचा विचार होणे गरजेचे आहे. अशोक देसाई यांनी शहरात अकरा मजली इमारती उभ्या राहत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंदिराच्या पश्चिमेला इमारती उभारल्यास किरणोत्सवात अडसर निर्माण होऊ शकतो. याबाबत महापालिकेने काही विचार केला आहे का? अशी विचारणा केली.महेश जाधव म्हणाले, फेरफार करून सुधारित आराखडा करतेवेळी व्यापारी, रहिवाशी यांना एकत्रित करून सर्वसंमतीनेच आराखडा करावा, त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी आयुक्तांबरोबर चर्चा करून प्रशासनाने समिती नेमावी. यावेळी नगरसेवक आर. डी. पाटील, राजू मेवेकरी, विनायक रेवणकर, आदींनी सूचना मांडल्या. (प्रतिनिधी)