शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

हातकणंगले तालुक्यात पक्का गोठा बांधण्याची योजना अडगळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खोची : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

खोची : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे या उपक्रमास हातकणंगले तालुक्यात जबाबदारी झटकण्याच्या हेलकावा बसू लागला आहे. शासनाचा कृषी व पंचायत समितीचा कृषी विभाग हे एकमेकांवर जबाबदारी ढकलू लागले आहेत. त्यामुळे गेल्या दहा महिन्यांत गोठा बांधण्याचे प्रस्ताव अडगळीत पडले आहेत. लाभार्थी दूध उत्पादक शेतकरी मात्र प्रतीक्षा करून थकून गेले आहेत.

ग्रामविकासचे मुख्य व शासनाच्या कृषी विभागाचे प्रमुख अधिकारी याबाबतीत अधिक क्रियाशील व्हावेत, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.

शेतकरी समृद्ध व्हावा त्याची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी ही योजना प्रत्येक गावात राबविण्याचा हेतू शासनाचा आहे. ग्रामीण भागातील लोकांना कामे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून व्हावा, असा हा उपयोगी उपक्रम आहे.

ग्रामीण भागात गोठ्याची जागा सर्वसाधारणपणे ओबड धोबड खाचखळग्यांनी भरलेली असे चित्र पाहावयास मिळते. पावसाळ्यात शेण व मुत्राने दलदलीचे स्वरूप प्राप्त होते. त्याचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर होतो तसेच बऱ्याच ठिकाणी गव्हाणी बांधलेल्या नसतात. त्यामुळे चारा वाया जातो. हे सर्व टाळण्यासाठी सुसज्ज पक्का गोठा असणे गरजेचे आहे. या दृष्टिकोनातून ही योजना लोकप्रिय झाली.

गेल्या अनेक वर्षांपासून ही योजना कार्यान्वित आहे पण यात टप्प्याने बदल होत गेले. यासाठी दिल्या जाणाऱ्या अनुदानातही बदल झाले. शरद पवार ग्रामसमृद्धी योजना म्हणून यास राज्य शासनाने अलीकडेच मान्यता दिली आहे.

परंतु ही योजना मात्र लाभार्थी निवडीची जबाबदारी कोण घेणार, या चक्रात अडकली आहे. कारण या योजनेला फळबाग/वृक्ष लागवड संलग्न करण्यात आली आहे .कुशल व अकुशल रेशो साधण्यासाठी हा पर्याय पुढे आणला असल्याचे बोलले जाते. जशी ही संलग्नता आली आहे तेव्हापासून अडथळ्यांची नवी पद्धत समोर आली आहे.

मुळात ग्रामपंचायत मार्फत गावांतील इच्छुक लाभार्थ्यांचे प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविले जातात.पंचायत समितीचा कृषी विभाग त्यास तांत्रिक तर गटविकास अधिकारी प्रशाकीय मान्यता देतात परंतु लाभार्थ्यांने २० गुंठे शेतजमिनीत फळबाग लागवड करणे बंधनकारक असल्याने ही बाब शासनाच्या कृषी विभागाने हाताळली पाहिजे त्यांनी तांत्रिक मान्यतेचे काम केले पाहिजे अशी भूमिका पंचायत समितीच्या कृषी विभागाची आहे.

त्यातच मे महिन्यात शासनाने जबाबदारी निश्चित करण्यासाठी निर्णय घेतला. त्यानुसार फळबाग लागवडीसंदर्भात पंचायत समितीच्या कृषी विभागावर तांत्रिक मान्यता देण्यासाठी सूचित केले पण पूर्वी जेव्हा शासनाच्या कृषी विभागावर जबाबदारी होती तेव्हा का हा विभाग यामध्ये किती सक्रिय झाला होता हा संशोधनाचा विषय ठरला आहे.त्यामुळे हातकणंगले तालुक्यात या दोन विभागांतील संभ्रमामुळे प्रस्ताव अडगळीत पडले आहे. यावर तत्काळ ठोस निर्णय घेतला पाहिजे.