शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

ऑक्टोबरअखेर ‘जलजीवन’चे आराखडे तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : अन्य जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये जलजीवनच्या योजनांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : अन्य जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये जलजीवनच्या योजनांच्या कामामध्ये कोल्हापूर जिल्हा मागे आहे. तेव्हा ऑक्टोबरअखेरपर्यंत सर्व योजनांचे आराखडे तयार करा, अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी दिल्या.

जलजीवन मिशनअंतर्गतच्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा आढावा घेण्यासाठी राजर्षी शाहू सभागृहात गुरुवारी बैठक झाली. पाणी पुरवठा करण्याच्या निकषांमध्ये केंद्र शासनाने बदल केले आहेत. त्यानुसार प्रति माणसी प्रतिदिन ४० लिटरऐवजी ५५ लिटर पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील १२३७ पाणी पुरवठा योजनांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होऊ नये म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या समसमान सहभागातून जलजीवन मिशन राबविण्यात येणार आहे. एकूण १२९१ पाणीपुरवठा योजनांवर बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये रेट्रोफिटिंगमधून जुन्या प्रकल्पांची क्षमता वाढविण्यासंदर्भात प्राधान्याने आवश्यक असणाऱ्या येाजनांची निवड करण्याबराेबरच नवीन योजनांबाबतही निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, दोन कोटीपर्यंतच्या योजनांना कार्यकारी अभियंता हे तांत्रिक मंजुरी देणार असून त्यापुढील ५ कोटीपर्यंतच्या योजनांना अधीक्षक अभियंत्यांची मंजुरी लागणार आहे. बैठकीला सभापती शिवानी भोसले, रसिका पाटील, जिल्ह्यातील सभापती, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रियदर्शिनी मोरे, कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, गटविकास अधिकारी, उपअभियंता, शाखा अभियंता उपस्थित होते.

चौकट

महसूलची अडचण असेल तर सांगा...

मुख्य कार्यकारी अधिकारी चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सांगितले की, ज्या योजनांच्या ठिकाणी महसूल विभागाची काही अडचण असेल, तर माझ्या निदर्शनास आणून द्या. गरज असेल तर मी संबंधितांशी बोलेन. पण जागेअभावी योजना राहिली, असे होऊ देऊ नका.

भुदरगडमध्ये सर्वाधिक मंजुरी

आतापर्यंत २८ योजनांना जलजीवनमधून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यातील भुदरगडमधील सर्वाधिक १८ योजनांचा यामध्ये समावेश असून पन्हाळा, आजरा, चंदगड, गगनबावडा, करवीर, कागल, हातकणंगलेतील गावांच्या योजनाही यामध्ये आहेत.