शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

खड्ड्यांचे लग्न महापालिका प्रशासनाशी--शिवसेनेचे शिवाजी पेठेत अनोख्या पद्धतीने आंदोलन महापालिका प्रशासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 20:51 IST

दीपक गौड म्हणाले, ‘खराब रस्त्यामुळे नागरिक शहर सोडून जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत; मात्र प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. तातडीचा पर्याय म्हणून महापालिका पॅचवर्क करत आहे; मात्र पुन्हा रस्ते खराब होत आहेत; त्यामुळे नव्यानेच रस्ते करणे योग्य होणार आहे.

ठळक मुद्देमहापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी अशा प्रकारे अभिनव आंदोलन करत आहे.

कोल्हापूर : शहरामध्ये खड्ड्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नागरिक हैरान झाले आहेत. महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेनेच्या वतीने रविवारी अनोखे आंदोलन केले. शिवाजी पेठेतील सरदार तालीम ते शिवाजी मंदिर या मार्गावरील खड्ड्याला रांगोळी काढून महापालिका प्रशासन, सत्ताधारी यांच्याशी प्रतिकात्मक लग्न लावण्यात आले.

शहराध्यक्ष रविकिरण इंगवले म्हणाले, ‘शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या परिस्थितीला महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार आहेत. त्यांना जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर त्यांनी खुर्ची सोडावी. शिवसेना स्टंट करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे; मात्र नागरिकांच्या हितासाठी स्टंटबाजी सुरूच राहील. महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी अशा प्रकारे अभिनव आंदोलन करत आहे.

दीपक गौड म्हणाले, ‘खराब रस्त्यामुळे नागरिक शहर सोडून जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत; मात्र प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. तातडीचा पर्याय म्हणून महापालिका पॅचवर्क करत आहे; मात्र पुन्हा रस्ते खराब होत आहेत; त्यामुळे नव्यानेच रस्ते करणे योग्य होणार आहे. यावेळी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, स्नेहा इंगवले, सविता चौगुले, निकिता इंगवले, मंगल चौगुले, नयना माने, उमा कारेकर, तात्या साळोखे, सागर शिपेकर, बाळासाहेब भोसले, उमेश जाधव, संतोष यादव, आबाजी जगदाळे, राहुल इंगवले, विक्रम पाटील, सुशांत गायकवाड, प्रकाश सरनाईक, राकेश माने, आदी उपस्थित होते.रस्ते शोधण्याची वेळखराब रस्त्यामध्ये मुरूम टाकल्याने नागरिकांना श्वसनाचे आणि मणक्याचे आजार वाढले आहेत. शहरामध्ये एकही असा रस्ता नाही तेथे खड्डे नाहीत; त्यामुळे नागरिकांना रस्ते शोधण्याची वेळ आली आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत. याउलट तुटपुंजे एक कोटी ६२ लाख रुपये मंजूर करून जनतेची चेष्टा सुरू केली आहे. तातडीने रस्ते केले नाही, तर उग्र आंदोलन करू, असा इशारा यशवंत पोवार यांनी दिला.-जनतेने निष्क्रिय आमदार दिलामाजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी १0 वर्षांत शहराचा विकास केला; मात्र जनतेचे रक्षण करण्याचे काम करणाऱ्याला घरी बसविले. काही लोकांमुळे त्यांचा पराभव झाला. त्यांच्यामुळे कोल्हापूर उत्तरला निष्क्रिय आमदार मिळाला आहे. पुढील पाच वर्षांत जनतेला नक्कीच याचा पश्चाताप होईल, असे रविकिरण इंगवले यांनी सांगितले, तसेच राज्याचा विकास भाजप-शिवसेनाच करू शकते, असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग