शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

खड्ड्यांचे लग्न महापालिका प्रशासनाशी--शिवसेनेचे शिवाजी पेठेत अनोख्या पद्धतीने आंदोलन महापालिका प्रशासनाचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 20:51 IST

दीपक गौड म्हणाले, ‘खराब रस्त्यामुळे नागरिक शहर सोडून जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत; मात्र प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. तातडीचा पर्याय म्हणून महापालिका पॅचवर्क करत आहे; मात्र पुन्हा रस्ते खराब होत आहेत; त्यामुळे नव्यानेच रस्ते करणे योग्य होणार आहे.

ठळक मुद्देमहापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी अशा प्रकारे अभिनव आंदोलन करत आहे.

कोल्हापूर : शहरामध्ये खड्ड्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. नागरिक हैरान झाले आहेत. महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याने शिवसेनेच्या वतीने रविवारी अनोखे आंदोलन केले. शिवाजी पेठेतील सरदार तालीम ते शिवाजी मंदिर या मार्गावरील खड्ड्याला रांगोळी काढून महापालिका प्रशासन, सत्ताधारी यांच्याशी प्रतिकात्मक लग्न लावण्यात आले.

शहराध्यक्ष रविकिरण इंगवले म्हणाले, ‘शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या परिस्थितीला महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी जबाबदार आहेत. त्यांना जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर त्यांनी खुर्ची सोडावी. शिवसेना स्टंट करत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे; मात्र नागरिकांच्या हितासाठी स्टंटबाजी सुरूच राहील. महापालिका प्रशासनाला जाग आणण्यासाठी अशा प्रकारे अभिनव आंदोलन करत आहे.

दीपक गौड म्हणाले, ‘खराब रस्त्यामुळे नागरिक शहर सोडून जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत; मात्र प्रशासनाकडून कोणतीच कार्यवाही होत नाही. तातडीचा पर्याय म्हणून महापालिका पॅचवर्क करत आहे; मात्र पुन्हा रस्ते खराब होत आहेत; त्यामुळे नव्यानेच रस्ते करणे योग्य होणार आहे. यावेळी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, स्नेहा इंगवले, सविता चौगुले, निकिता इंगवले, मंगल चौगुले, नयना माने, उमा कारेकर, तात्या साळोखे, सागर शिपेकर, बाळासाहेब भोसले, उमेश जाधव, संतोष यादव, आबाजी जगदाळे, राहुल इंगवले, विक्रम पाटील, सुशांत गायकवाड, प्रकाश सरनाईक, राकेश माने, आदी उपस्थित होते.रस्ते शोधण्याची वेळखराब रस्त्यामध्ये मुरूम टाकल्याने नागरिकांना श्वसनाचे आणि मणक्याचे आजार वाढले आहेत. शहरामध्ये एकही असा रस्ता नाही तेथे खड्डे नाहीत; त्यामुळे नागरिकांना रस्ते शोधण्याची वेळ आली आहे. असे असतानाही महापालिका प्रशासनाचे डोळे उघडत नाहीत. याउलट तुटपुंजे एक कोटी ६२ लाख रुपये मंजूर करून जनतेची चेष्टा सुरू केली आहे. तातडीने रस्ते केले नाही, तर उग्र आंदोलन करू, असा इशारा यशवंत पोवार यांनी दिला.-जनतेने निष्क्रिय आमदार दिलामाजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी १0 वर्षांत शहराचा विकास केला; मात्र जनतेचे रक्षण करण्याचे काम करणाऱ्याला घरी बसविले. काही लोकांमुळे त्यांचा पराभव झाला. त्यांच्यामुळे कोल्हापूर उत्तरला निष्क्रिय आमदार मिळाला आहे. पुढील पाच वर्षांत जनतेला नक्कीच याचा पश्चाताप होईल, असे रविकिरण इंगवले यांनी सांगितले, तसेच राज्याचा विकास भाजप-शिवसेनाच करू शकते, असेही ते म्हणाले. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाroad safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग