शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

चित्र आज स्पष्ट होणार

By admin | Updated: December 7, 2015 00:52 IST

विधान परिषदेचे रणांगण : भाजपची उडी; राष्ट्रवादी काँग्रेसचा दबाव

कोल्हापूर : विधान परिषदेसाठी काँग्रेसची उमेदवारी आज, सोमवारी दुपारपर्यंत जाहीर होणार आहे. उमेदवारीसाठी माजी गृहराज्य मंत्री सतेज पाटील व जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, भाजप-शिवसेना यांच्या राज्यातील जागावाटपामध्ये कोल्हापूरची जागा भाजपच्या पारड्यात पडल्याने ‘काँग्रेस विरुद्धभाजप’ अशीच सरळ-सरळ लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे, तर या निवडणुकीत सर्वाधिक मतदान असलेल्या राष्ट्रवादीनेही कॉँग्रेसवरील आपले दबावतंत्र कायम ठेवले असून, पक्षाचे नेते राजेंद्र पाटील-यड्रावकर हे देखील आज अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसच्या उमेदवारीवर सतेज पाटील, पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक व प्रकाश आवाडे यांनी दावा केला आहे. उमेदवारीसाठी चौघाही इच्छुकांनी आपली सर्व राजकीय ताकद पणाला लावल्याने पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील मतदारांचे संख्याबळ, दिल्लीपर्यंतचे वजन व राष्ट्रवादी काँग्रेसची अनुकूल भूमिका पाहता सतेज पाटील यांचे नाव सुरुवातीपासूनच आघाडीवर राहिले आहे. परंतु, पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक व प्रकाश आवाडे यांनी प्रदेशाध्यक्षांची भेट घेऊन सतेज पाटील सोडून कोणालाही उमेदवारी द्या, अशी मागणी केल्याने पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला आहे. कोणालाही उमेदवारी दिली तर बंडखोरी ठरली असल्याने पक्षश्रेष्ठींनी सावध भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून परवा चौघा इच्छुकांना मुंबईत बोलावून पक्ष देईल त्या उमेदवाराच्या मागे ठाम राहण्याचे आदेश प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिले आहेत. त्यामुळे उमेदवारी कोणाला, याबाबत उत्सुकता ताणली आहे. दरम्यान, रविवारी सायंकाळी सतेज पाटील यांनी प्रमुख कार्यकर्त्यांना ‘अजिंक्यतारा’ येथे बोलावून विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व नागपूर येथे होणाऱ्या कॉँग्रेसच्या मोर्चाच्या तयारीसाठी काही सूचना केल्याचे समजते. कॉँग्रेसची उमेदवारी आपल्याला जाहीर झाल्यानंतरच अर्ज दाखल करणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीमधील जागावाटपाचा पेच अजून सुटलेला नाही. त्यामुळे उमेदवारीची घोषणा होण्यास विलंब होत आहे. - सतेज पाटील, माजी गृहराज्य मंत्री.