शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : "धर्माच्या नावावर लोकांना आंधळं केलं की..."; राज ठाकरेंची खास पोस्ट, रंगली जोरदार चर्चा
2
"लोकसंख्या धोरण लवकरात लवकर लागू करणे आवश्यक, तरच..."; RSS ची सरकारकडे मागणी, होसबळे म्हणाले...
3
उद्धव ठाकरेंचा मराठवाड्यात ४ दिवस "दगाबाज रे" संवाद दौरा, शेतकऱ्यांशी साधणार संवाद
4
डोक्यात रॉड मारून मोठ्या भावाची हत्या, मग गर्भवती वहिनीवर बलात्कार, नंतर तिलाही संपवलं...
5
अग्नितांडव! मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण आग; लहान मुलांसह २३ जणांचा मृत्यू
6
५,८०० कोटींच्या २००० रुपयांच्या नोटा अजूनही लोकांकडे पडून! अजूनही बदलण्याची संधी
7
तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात होणार दर्शन मंडप; वारकऱ्यांना मिळणार कमी वेळेत विठ्ठलाचे दर्शन
8
King Title Reveal: वाढदिवशी शाहरुखचं चाहत्यांना सरप्राईज! 'किंग'चा पहिला प्रोमो रिलीज, व्हिडीओ बघाच
9
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
10
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: महादेव पूजनासह ‘या’ ७ गोष्टी आवर्जून करा; काही कमी पडणार नाही!
11
"ख्रिश्चनांचं हत्याकांड थांबवलं गेलं नाही तर...!"; डोनाल्ड ट्रम्प यांची आता ‘या’ देशाला थेट हल्ल्याची धमकी
12
"लेकाच्या कठीण प्रसंगी देश विरोधात असताना...", शाहरुखबद्दल हिमानी शिवपुरी काय म्हणाल्या?
13
सोमवारी प्रदोष व्रत २०२५: केवळ लाभ होईल, नशीब साथ देईल; प्रभावी शिव मंत्रांचा नक्की जप करा!
14
९ वर्षांच्या मुलीने मारली चौथ्या मजल्यावरून उडी, शाळेने पुरावे केले नष्ट; धक्कादायक Video
15
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
16
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
17
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
18
शिरोळमध्ये ऊस आंदोलनाचा भडका; ऊस वाहनांचे टायर पेटवले, हवा काढली
19
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
20
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल

पीएच.डी., एम.फिल. पदवी मिळविण्यात ‘रसायनशास्त्र, इंग्रजी’ आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गेल्या पाच वर्षात पीएच.डी. आणि एम.फिल. अभ्यासक्रमाच्या १८६५ संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रबंध शिवाजी विद्यापीठातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षात पीएच.डी. आणि एम.फिल. अभ्यासक्रमाच्या १८६५ संशोधक विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रबंध शिवाजी विद्यापीठातील शिक्षण आणि संशोधन मंडळाकडे (बीयूटीआर) सादर केले आहेत. त्यापैकी १७३१ विद्यार्थ्यांची तोंडी परीक्षा (व्हायवा) झाली असून, १३४ विद्यार्थ्यांना या परीक्षेची प्रतीक्षा लागली आहे. संशोधन करण्यासह प्रबंध सादर करून पीएच.डी., एम.फिल. पदवी मिळविण्यात रसायनशास्त्र, इंग्रजी अधिविभागाचे विद्यार्थी आघाडीवर आहेत.

गेल्या आठवड्यातील अधिसभेत एम.फिल., पीएच.डी.धारकांची संख्या, तोंडी परीक्षेला होणाऱ्या विलंबाबाबतचा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर याबाबतचा आढावा ‘लोकमत’ने घेतला. व्यावसायिक अर्थशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, अशा विविध ५३ विषयांमधील १८६५ विद्यार्थ्यांनी दि. १ जानेवारी २०२५ ते दि. ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत त्यांचे प्रबंध विद्यापीठाला सादर केले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १६७ प्रबंध रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे आहेत. त्यापाठोपाठ इंग्रजी विभागातील १४९, वनस्पतीशास्त्र विभागामधील १२४, अर्थशास्त्र विभागातील १२३, मराठीचे ११७, तर शारीरिक शिक्षण विभागातील १०२ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. बायोटेक्नॉलॉजी, प्राणिशास्त्र, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, राज्यशास्त्र अशा विविध ३८ विभागांतील एकूण १३४ विद्यार्थ्यांच्या तोंडी परीक्षा अद्याप झालेली नाही. त्यामध्ये सर्वाधिक १३ विद्यार्थी हे फार्मसीचे, रसायनशास्त्राचे ११, तर इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगच्या दहा विद्यार्थी आहेत. संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून, ते चांगले आहे. मात्र, प्रबंध सादर केल्यानंतर त्याची तोंडी परीक्षा होण्याचा कालावधी कमी करणे आवश्यक आहे.

चौकट

कालमर्यादा निश्चित करावी

एम.फिल., पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून, ते चांगले आहे. मात्र, प्रबंध सादर केल्यानंतर वेळेत तोंडी परीक्षा होत नसल्याची अडचण असल्याचे ‘सुटा’चे सांगली जिल्हा अध्यक्ष अशोककुमार पाटील यांनी सांगितले. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी अधिसभेत प्रश्न मांडला. यूजीसीच्या नियमानुसार प्रबंध सादर केल्यानंतर सहा महिन्यांत तोंडी परीक्षा होणे आवश्यक आहे. मात्र, एक ते दीड वर्ष लागत असल्याचे चित्र आहे. या परीक्षेसाठी अन्य विद्यापीठांमधील प्राध्यापक तज्ज्ञ म्हणून येतात. तोंडी परीक्षा घेण्यासाठी उपस्थित राहण्याबाबतचे स्वीकारपत्र त्यांच्याकडून लवकर येत नाही. त्यामुळे परीक्षेला विलंब होतो. स्वीकारपत्र देण्यासह परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाने कालमर्यादा निश्चित करावी. एखादे तज्ज्ञ वेळेत स्वीकारपत्र देत नसतील तर त्यांच्या जागी दुसऱ्या तज्ज्ञांची निवड करावी, असे पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

तोंडी परीक्षेला विलंब झाल्यास त्याचा फटका विद्यार्थ्याला बसतो. हे टाळण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नियमानुसार वेळेत तोंडी परीक्षा विद्यापीठाने घेणे आवश्यक आहे.

- प्रकाश कुंभार, सदस्य, व्यवस्थापन परिषद

विद्या शाखानिहाय गेल्या दहा वर्षांतील ‘पीएच.डी.’धारक

विज्ञान व तंत्रज्ञान : ७१६

मानव्यविद्या : ४६९

वाणिज्य व व्यवस्थापन : २२५

शिक्षणशास्त्र : १२६

लॉ (विधी) : ११