शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

पीएचसींचा झाला ‘कायापालट’

By admin | Updated: January 23, 2015 23:34 IST

कॉर्पोरेट लूक : चांगल्या सेवासुविधांमुळे प्रशंसा; जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा उपक्रम

कोल्हापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या कायापालट कार्यक्रमांतर्गत दोन वर्षांत जिल्ह्यातील ७३ पैकी ६८ प्राथमिक आरोग्य केंद्रांना (पीएचसी) कॉर्पोरेट लूक मिळाला. खासगी रुग्णालयाच्या तोडीस तोड अशी सेवा आणि तीही मोफत मिळत असल्याने रुग्णांच्या संख्येत पूर्वीपेक्षा तिप्पट वाढ झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार (सीईओ) व विविध माध्यम प्रतिनिधींच्या टीमने काही ‘पीएचसीं’ना भेट दिल्यानंतर हे निदर्शनास आले.सन २०११-१२ पासून ‘कायापालट’ कार्यक्रम राबविला. या कार्यक्रमांतर्गत लोकसहभागातून आरोग्य केंद्र स्वच्छ व सुंदर केले. आरोग्य केंद्रातील सेवेबद्दल समाजात विश्वासार्हता निर्माण केली. माता व अर्भक मृत्युदर कमी करण्याचा प्रयत्न सुरू असून, समाजातील सर्वच घटकांपर्यंत गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा पुरविण्याची धडपड सुरू आहे. तत्पर सेवा मिळत असल्याने खासगी रुग्णालयाकडे जाणारे रुग्ण प्राथमिक आरोग्य केेंद्राकडे वळत आहेत. केवळ ‘कायापालट’ कार्यक्रमामुळे कार्यक्षेत्रातील गरोदर मातांची प्रसूती वाढली आहे. गुणवत्तापूर्ण सेवा व सुरक्षिततेमुळे सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीय कुटुंबांतील महिलाही प्रसूतीसाठी ‘पीएचसी’ची निवड करीत आहेत. सीईओ सुभेदार, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. आर. एस. आडकेकर, शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर, आरोग्य सहायक संचालक डॉ. आर. बी. मुगडे, रुग्णकल्याण समितीचे जिल्हा समन्वयक पल्लवी नकाते, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे यांच्यासह माध्यमांचे प्रतिनिधी यांच्या पथकाने महागाव आरोग्य केंद्रातील कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. आरोग्य अधिकारी सुप्रिया खन्ना, गडहिंग्लजच्या गटविकास अधिकारी चंचल पाटील यांनी कामांची माहिती दिली. येथे देणगीदारांनी टी.व्ही., टेबल-खुर्च्या दिल्या आहेत. ऐनापुरातील उपकेंद्रातील आवारात औषधी वनस्पतींची लागवड केली आहे. गर्भवती महिलांनी तपासणी व आहार कसा घ्यावा, याची प्रबोधनपर लिहिलेली माहिती लक्षवेधी ठरली.मलिग्रे पीएचसीमध्ये रुग्णांच्या सेवेसाठी व्हीलचेअरही घेण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या सदस्य संजीवनी गुरव यांनी स्वागत केले. डॉ. आर. जी. गुरव यांनी माहिती दिली. दरम्यान, सर्वच पीएचसींना व्हीलचेअर घेण्याबाबत आदेश देणार असल्याचेही श्री. सुभेदार यांनी सांगितले. ( प्रतिनिधी )लोकसहभाग महत्त्वाचासमाजातील दानशूर व्यक्ती, अधिकारी, कर्मचारी यांच्या योगदानामुळे पीएचसींचा कायापालट झाला आहे. दर्जेदार, मोफत सेवा मिळत असल्याने रुग्णांची संख्या वाढते आहे. आता उपकेंद्राचाही कायापालट केला जाणार आहे. सकारात्मक आणि प्रभावी परिणाम दिसल्यामुळे संपूर्ण राज्यात कायापालट राबविण्याबाबत शासनाने नुकताच निर्णय घेतला असल्याची माहिती सीईओ सुभेदार यांनी दिली.