शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा वसुलीविरोधात सोमवारी याचिका दाखल

By admin | Updated: February 6, 2015 00:42 IST

पी. एन. पाटील : काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच नोटिसा

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माजी संचालकांवर जबाबदारी निश्चित करून कर्जाच्या वसुलीसाठी बजावलेल्या नोटिसीविरोधात उच्च न्यायालयात सोमवारी याचिका दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी संचालक पी. एन. पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितली. ज्यांनी बँकेची फसवणूक करून कर्जे घेतली, त्यांच्याकडून ती वसूल करण्याऐवजी काँग्रेस विचारांच्या संचालकांना केवळ अद्दल घडविण्यासाठी ही कारवाई केली असून, ती अन्यायकारक असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने ११७ कोटींची कर्जे वाटली आहेत; परंतु बँकेने ही कर्जे देताना कोणा एका व्यक्तीला दिलेली नाहीत, तर ती सहकारी संस्थांना दिलेली आहेत. कर्जे घेताना संबंधित सहकारी संस्थांनी तसेच त्यांच्या संचालकांनी कर्जाची हमी घेतलेली आहे. तसे त्यांनी स्टॅम्पवरही लिहून दिले आहे. मग थकलेल्या कर्जाची वसुली संबंधित संस्थांकडून करण्याऐवजी जिल्हा बँकेच्या संचालकांकडून करून घेणे अन्यायकारक तर आहेच; शिवाय नियमाला अनुसरूनही नाही, असे पाटील यांनी सांगितले. सहकारमंत्र्यांनी कायद्याचाअभ्यास करावा‘केडीसीसी’ बँकेच्या संचालकांना अद्दल घडविण्याची भाषा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील करत आहेत. याचा अर्थच असा होतो की, संचालकांना लागू करण्यात आलेल्या नोटिसा या अद्दल घडविण्याच्या हेतूने दिल्या आहेत. ज्या संस्थांनी बँकेला फसविले, त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्याची वसुली करावी, असा सहकार कायदा सांगतो. असे असताना मात्र सहकारमंत्री जिल्हा बँकेच्या संचालकांकडून वसूल करणार, असे सांगत आहेत. त्यांनी एकदा कायद्याचा तरी अभ्यास करायला पाहिजे होता, असे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)४० कोटींची वसुली यापूर्वीचभाजप सरकारची कारवाई ही केवळ काँग्रेसला बदनाम करणारी आहे. बँकेने दिलेल्या ११७ कोटी कर्जापैकी ४० कोटी रुपयांची वसुली यापूर्वीच झाली आहे. आता जर संबंधितांकडून वसुली सुरू केली तर दिलेल्या कर्जापैकी १० ते १५ कोटींचा फरक राहील, असे पाटील म्हणाले. दिलेल्या कर्जापेक्षा त्याचे व्याजच जास्त झाल्यामुळे हा आकडा मोठा दिसतो. सहकार कायद्यातील तरतुदी पाहिल्या तर आम्ही या कर्जाला जबाबदार ठरत नाही, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. कागल शाखेतील अपहाराला जबाबदार कोण?आम्ही कोणाला कर्जे दिली आहेत, त्यांची कर्जे किती आहेत हे आम्ही सांगितले तरी आहे; पण बँकेच्या कागल शाखेत २ कोटी ८७ लाखांचा अपहार झाला. तो कोणी केला याची चौकशी नाही की त्याची जबाबदारीही निश्चित केलेली नाही की, त्याच्या वसुलीसाठी प्रयत्न झालेले नाही. या शाखेत झालेल्या अपहाराला जबाबदार कोण आहे हे माहीत असूनही वसुलीची कारवाई का केली नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कोणत्याही शाखेत तीन टक्क्यांपेक्षा जादा रक्कम ठेवायची नाही, असा नियम असताना तेथे सात टक्के रक्कम ठेवली जात होती. ती का आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली जात होती, असेही पाटील म्हणाले.