शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
2
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
3
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
6
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
8
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
9
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
10
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
11
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
12
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
13
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
14
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
15
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
16
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
17
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
18
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
19
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
20
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा

बेकायदा वसुलीविरोधात सोमवारी याचिका दाखल

By admin | Updated: February 6, 2015 00:42 IST

पी. एन. पाटील : काँग्रेसला बदनाम करण्यासाठीच नोटिसा

कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माजी संचालकांवर जबाबदारी निश्चित करून कर्जाच्या वसुलीसाठी बजावलेल्या नोटिसीविरोधात उच्च न्यायालयात सोमवारी याचिका दाखल करणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व जिल्हा बँकेचे माजी संचालक पी. एन. पाटील यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितली. ज्यांनी बँकेची फसवणूक करून कर्जे घेतली, त्यांच्याकडून ती वसूल करण्याऐवजी काँग्रेस विचारांच्या संचालकांना केवळ अद्दल घडविण्यासाठी ही कारवाई केली असून, ती अन्यायकारक असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाने ११७ कोटींची कर्जे वाटली आहेत; परंतु बँकेने ही कर्जे देताना कोणा एका व्यक्तीला दिलेली नाहीत, तर ती सहकारी संस्थांना दिलेली आहेत. कर्जे घेताना संबंधित सहकारी संस्थांनी तसेच त्यांच्या संचालकांनी कर्जाची हमी घेतलेली आहे. तसे त्यांनी स्टॅम्पवरही लिहून दिले आहे. मग थकलेल्या कर्जाची वसुली संबंधित संस्थांकडून करण्याऐवजी जिल्हा बँकेच्या संचालकांकडून करून घेणे अन्यायकारक तर आहेच; शिवाय नियमाला अनुसरूनही नाही, असे पाटील यांनी सांगितले. सहकारमंत्र्यांनी कायद्याचाअभ्यास करावा‘केडीसीसी’ बँकेच्या संचालकांना अद्दल घडविण्याची भाषा सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील करत आहेत. याचा अर्थच असा होतो की, संचालकांना लागू करण्यात आलेल्या नोटिसा या अद्दल घडविण्याच्या हेतूने दिल्या आहेत. ज्या संस्थांनी बँकेला फसविले, त्यांच्या मालमत्ता जप्त करून त्याची वसुली करावी, असा सहकार कायदा सांगतो. असे असताना मात्र सहकारमंत्री जिल्हा बँकेच्या संचालकांकडून वसूल करणार, असे सांगत आहेत. त्यांनी एकदा कायद्याचा तरी अभ्यास करायला पाहिजे होता, असे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)४० कोटींची वसुली यापूर्वीचभाजप सरकारची कारवाई ही केवळ काँग्रेसला बदनाम करणारी आहे. बँकेने दिलेल्या ११७ कोटी कर्जापैकी ४० कोटी रुपयांची वसुली यापूर्वीच झाली आहे. आता जर संबंधितांकडून वसुली सुरू केली तर दिलेल्या कर्जापैकी १० ते १५ कोटींचा फरक राहील, असे पाटील म्हणाले. दिलेल्या कर्जापेक्षा त्याचे व्याजच जास्त झाल्यामुळे हा आकडा मोठा दिसतो. सहकार कायद्यातील तरतुदी पाहिल्या तर आम्ही या कर्जाला जबाबदार ठरत नाही, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले. कागल शाखेतील अपहाराला जबाबदार कोण?आम्ही कोणाला कर्जे दिली आहेत, त्यांची कर्जे किती आहेत हे आम्ही सांगितले तरी आहे; पण बँकेच्या कागल शाखेत २ कोटी ८७ लाखांचा अपहार झाला. तो कोणी केला याची चौकशी नाही की त्याची जबाबदारीही निश्चित केलेली नाही की, त्याच्या वसुलीसाठी प्रयत्न झालेले नाही. या शाखेत झालेल्या अपहाराला जबाबदार कोण आहे हे माहीत असूनही वसुलीची कारवाई का केली नाही? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. कोणत्याही शाखेत तीन टक्क्यांपेक्षा जादा रक्कम ठेवायची नाही, असा नियम असताना तेथे सात टक्के रक्कम ठेवली जात होती. ती का आणि कोणाच्या सांगण्यावरून ठेवली जात होती, असेही पाटील म्हणाले.