शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

विजयसिंह यादवांमुळे पेठवडगाव सुफलाम्

By admin | Updated: July 25, 2016 00:33 IST

पृथ्वीराज चव्हाण : यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पेठवडगावात अनावरण

पेठवडगाव : सध्या राज्याला प्रामुख्याने पाणी आणि नागरीकरण हे दोन प्रश्न भेडसावत आहेत. नागरीकरणाच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर स्वर्गीय विजयसिंह यादव यांचे वडगावातील कार्य कौतुकास्पद असून, महाराष्ट्रात त्यांच्यासारखे चांगले काम अन्य कोणी केलेले नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे काढले. स्वर्गीय विजयसिंह यादव पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. एसटी स्टँडजवळ विजयसिंह यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण चव्हाण यांच्या हस्ते झाले. या चौकाला विजयसिंह यादव चौक असे नाव देण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार पतंगराव कदम, सुजित मिणचेकर, सतेज पाटील, उल्हास पाटील, आनंदराव पाटील, माजी मंत्री विनय कोरे, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, नगराध्यक्षा विद्या पोळ, विजयादेवी यादव, आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात कोल्हापूर सोडले तर इतर जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. तसेच नागरीकरणाच्या बाबतीत काँग्रेस सरकारने सत्तेत असताना १३४ ग्रामपंचायतींना नगरपालिकेचा दर्जा दिला. खेड्यांचा विकास व्हावा म्हणून आम्ही नगरपालिकांना मंजुरी दिली. वडगावचे भाग्यविधाते स्वर्गीय विजयसिंह यादव यांनी ३२ वर्षे नगराध्यक्ष पद भूषविले. या काळात वडगाव सुजलाम् सुफलाम् केले आहे. ते काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. त्यांना वडगावच्या जनतेनेही भरभरून प्रेम दिले. विकासाच्या अनेक योजना त्यांनी राबविल्या आहेत. त्यांच्या समाजकार्याचा वारसा त्यांच्या कन्या विद्या पोळ यांनी जपला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत विद्या पोळ यांच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन चव्हाण यांनी केले. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, विजयसिंह यादव यांच्यासारखा माणूस होणे नाही. ३२ वर्षे नगराध्यक्ष असताना त्यांनी सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडली आहे. विधान परिषदेला यादवसाहेब काँगे्रसच्या तिकिटावर उभारले होते; पण काँग्रेसने त्यांना मदत केली नाही; मात्र वारणा समूहाने प्रामाणिकपणे मदत केली. काँगे्रस पाठीशी राहिला असता तर यादवसाहेब आमदार झाले असते, असेही विनय कोरे आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा विद्या पोळ म्हणाल्या, यादवसाहेबांना वडगावच्या जनतेने मोठी ताकत दिली. साहेबांनीही प्रत्येकाचा आदर राखला. येणारे प्रत्येक आव्हान हसतमुखाने पेलले. त्यांचे हे कार्य पुढे चालविण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. कार्यक्रमाचे स्वागत विद्या पोळ यांनी केले. आमदार सुजित मिणचेकर यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक सुनील हुकेरी यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार यशवंत पाटील, उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी, राजन शेटे, मुख्याधिकारी अतुल पाटील, संपत नायकवडी, आदींसह आजी-माजी नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.