शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

विजयसिंह यादवांमुळे पेठवडगाव सुफलाम्

By admin | Updated: July 25, 2016 00:33 IST

पृथ्वीराज चव्हाण : यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पेठवडगावात अनावरण

पेठवडगाव : सध्या राज्याला प्रामुख्याने पाणी आणि नागरीकरण हे दोन प्रश्न भेडसावत आहेत. नागरीकरणाच्या बाबतीत बोलायचे म्हटले तर स्वर्गीय विजयसिंह यादव यांचे वडगावातील कार्य कौतुकास्पद असून, महाराष्ट्रात त्यांच्यासारखे चांगले काम अन्य कोणी केलेले नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही, असे गौरवोद्गार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी येथे काढले. स्वर्गीय विजयसिंह यादव पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. एसटी स्टँडजवळ विजयसिंह यादव यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण चव्हाण यांच्या हस्ते झाले. या चौकाला विजयसिंह यादव चौक असे नाव देण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील होते. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार पतंगराव कदम, सुजित मिणचेकर, सतेज पाटील, उल्हास पाटील, आनंदराव पाटील, माजी मंत्री विनय कोरे, माजी पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ, नगराध्यक्षा विद्या पोळ, विजयादेवी यादव, आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रात कोल्हापूर सोडले तर इतर जिल्ह्यांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे, अन्यथा भविष्यात पाण्याचा प्रश्न भेडसावणार आहे. तसेच नागरीकरणाच्या बाबतीत काँग्रेस सरकारने सत्तेत असताना १३४ ग्रामपंचायतींना नगरपालिकेचा दर्जा दिला. खेड्यांचा विकास व्हावा म्हणून आम्ही नगरपालिकांना मंजुरी दिली. वडगावचे भाग्यविधाते स्वर्गीय विजयसिंह यादव यांनी ३२ वर्षे नगराध्यक्ष पद भूषविले. या काळात वडगाव सुजलाम् सुफलाम् केले आहे. ते काँग्रेसचे निष्ठावंत नेते होते. त्यांना वडगावच्या जनतेनेही भरभरून प्रेम दिले. विकासाच्या अनेक योजना त्यांनी राबविल्या आहेत. त्यांच्या समाजकार्याचा वारसा त्यांच्या कन्या विद्या पोळ यांनी जपला आहे. आगामी नगरपालिका निवडणुकीत विद्या पोळ यांच्या हाती सत्ता द्या, असे आवाहन चव्हाण यांनी केले. यावेळी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील म्हणाले, विजयसिंह यादव यांच्यासारखा माणूस होणे नाही. ३२ वर्षे नगराध्यक्ष असताना त्यांनी सर्वसामान्य माणसांशी नाळ जोडली आहे. विधान परिषदेला यादवसाहेब काँगे्रसच्या तिकिटावर उभारले होते; पण काँग्रेसने त्यांना मदत केली नाही; मात्र वारणा समूहाने प्रामाणिकपणे मदत केली. काँगे्रस पाठीशी राहिला असता तर यादवसाहेब आमदार झाले असते, असेही विनय कोरे आपल्या भाषणात म्हणाले. यावेळी नगराध्यक्षा विद्या पोळ म्हणाल्या, यादवसाहेबांना वडगावच्या जनतेने मोठी ताकत दिली. साहेबांनीही प्रत्येकाचा आदर राखला. येणारे प्रत्येक आव्हान हसतमुखाने पेलले. त्यांचे हे कार्य पुढे चालविण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे. कार्यक्रमाचे स्वागत विद्या पोळ यांनी केले. आमदार सुजित मिणचेकर यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक सुनील हुकेरी यांनी आभार मानले. यावेळी माजी आमदार यशवंत पाटील, उपनगराध्यक्ष मोहनलाल माळी, राजन शेटे, मुख्याधिकारी अतुल पाटील, संपत नायकवडी, आदींसह आजी-माजी नगरसेवक, नागरिक उपस्थित होते.