शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

वात्रटिका करताना व्यक्तिद्वेष ठेवला नाही

By admin | Updated: May 18, 2016 00:45 IST

रामदास फुटाणे : मनोरंजन-प्रबोधन व्याख्यानमाला; राजकारणावरही भाष्य

इचलकरंजी : व्यंग शोधणे हे वात्रटिकेचे मर्म असते. ते शोधण्याचा स्वभाव असल्यामुळे अनेक राजकीय व्यक्ती व पक्ष यांच्यावर भाष्य करीत राहिलो. सत्तेत जे असतात, त्यांच्यावर टीका करताना अवघड असले तरी मी ते निखळपणे करू शकलो. त्यामागे व्यक्तिद्वेष नव्हता, असे प्रतिपादन प्रसिद्ध वात्रटिकाकार, कवी, चित्रपट निर्माते-दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी केले.येथील मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेमध्ये रामादास फुटाणे बोलत होते. ते म्हणाले, ‘सामना’ या चित्रपटाच्या निर्मितीवेळी आम्ही सर्वांनी चांगली निर्मिती करण्याचा ध्यास घेऊन चित्रपट तयार केला. आर्थिक पाठबळ अपुरे असताना आणि नवखेपणाची मर्यादा ओलांडून हा चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशंसा व पुरस्कारास पात्र ठरला. मात्र, सुरुवातीला न चाललेला हा चित्रपट दोन वर्षांनंतर अनेक चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल्ल झाला. चित्रपटाचा विषय आणि कलावंतांनी केलेला समर्थ अभिनय, तसेच चित्रपटाचे लेखन याच्या जाणीवेमुळेच प्रेक्षकांनी तो उचलून धरला आणि त्यामुळेच ‘सामना’ चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत इतिहास घडविला.राजकारणाविषयी ते म्हणाले, राजकारण हा वेगळाच विषय आहे. त्यामधील व्यूहरचना, शह-काटशह वेगळे असतात. त्याला कमालीची धार असते. कधी कुणाला विजयी करायचे आणि कुणाचा पराजय, हेही महत्त्वाचे होते. राजकारणाचा कोणताही लवलेश नसताना आणि विधानसभा सदस्य होण्याची अपेक्षा नसताना कॉँग्रेसचे विचार मला मनापासून आवडत असल्याने पक्षश्रेष्ठींनी विधानपरिषदेवर आपणाला कसे निवडून पाठविले, याचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला. श्यामसुंदर मर्दा यांनी स्वागत केले. प्रा. समीर गोवंडे यांनी प्रास्ताविक केले. या व्याख्यानासाठी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे व ज्येष्ठ अभिनेते विलास रकटे यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनीही आपल्या चित्रपटातील आठवणी सांगितल्या. संजय होगाडे यांनी आभार मानले. इचलकरंजी येथील मनोरंजन-प्रबोधन व्याख्यानमालेत बोलताना कवी रामदास फुटाणे. यावेळी विलास रकटे उपस्थित होते.