शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गावात घर बांधण्यासाठी आर्किटेक्टची परवानगी बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:31 IST

कोल्हापूर : १५०० ते ३२०० चौरस फुटांपर्यंतचे बांधकाम येथून पुढे परवानामुक्त असेल असा आदेश ग्रामविकासाने विभागाने काढला असला तरी ...

कोल्हापूर : १५०० ते ३२०० चौरस फुटांपर्यंतचे बांधकाम येथून पुढे परवानामुक्त असेल असा आदेश ग्रामविकासाने विभागाने काढला असला तरी त्याचा अर्थ कोणीही उठावे, कुठेही घर बांधावे असे होत नाही. गावात घर बांधायचे तर आर्किटेक्टची परवानगी बंधनकारकच असणार आहे. नगररचना विभागाऐवजी शाखा अभियंत्यांकडे भरलेले चलन हाच येथून पुढे बांधकाम परवाना म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे.

राज्याच्या ग्रामविकास विभागाने गुरुवारी काढलेल्या आदेशात १५०० ते ३२०० चौरस फुटांपर्यंतच्या बांधकामांना येथून पुढे नगररचना विभागाकडून बांधकाम परवाना काढण्याची गरज भासणार नाही असे म्हटले आहे, पण हे सांगताना नवीन बांधकाम नियमावलीनुसार टाऊन प्लॅनर म्हणून शाखा अभियंत्यांना अधिकार दिले जातील, असे म्हटले आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रात यावरून संभ्रमावस्था आहे. ग्रामीण जनतेच्या पातळीवर विनापरवाना बांधकाम करावा लागणार असल्याचा आनंद आहे, पण नवीन बांधकाम नियमावलीतील परिशिष्ट ‘क’मध्ये परवानगी घेण्याबाबतचे नवीन नियम सांगितल्याने त्यांचा हा आनंद क्षणिक ठरला आहे.

गावात घर बांधण्यासाठी पूर्वी ग्रामपंचायतीकडून परवाना घेतला जात होता, पण २०१५ पासून त्याचे हस्तांतरण शहरातील नगररचना विभागाकडे करण्यात आले. परिणामी, गावोगावची बांधकामे करताना परवान्यासाठी तिष्ठत बसण्याची वेळ आली. संपूर्ण जिल्ह्यातील परवान्याची प्रक्रिया शहरातील एकाच केंद्रातून चालत असल्याने तेथेही अर्जाचा ढीग साचत गेला. यातून बांधकामे रखडली. तसेच बांधकाम सुरू करायचे म्हटले तर परवाना असल्याशिवाय कोणतीही बॅंक गृह कर्ज देत नसल्याने ग्रामीण जनतेला प्रतीक्षा करत बसण्याशिवाय पर्याय राहिला नाही. परवान्याची कटकट नको म्हणून विनापरवाना बांधकाम करण्याचेही प्रमाण वाढले.

यासंदर्भात ग्रामीण जनतेची होत असलेली अडचण व खोळंबा दूर करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सत्तेवर येताच ग्रामीण भागातील परवान्याच्या प्रश्नाला हात घातला. डिसेंबरमध्ये यासंदर्भात आदेशही काढला, पण प्रत्यक्षात त्याचे अध्यादेशात रूपांतर झाले नसल्यामुळे या निर्णयाला काही अर्थ उरला नव्हता. यावरून पुन्हा तक्रारी सुरू झाल्यानंतर गुरुवारी मुश्रीफ यांनी याचा अध्यादेश काढून ग्रामीण जनतेचे घर बांधण्याचे स्वप्न आवाक्यात आणले.

तथापि, या प्रक्रियेचा बारकाईने अभ्यास केला तर परवाना लागणार नाही हे खरे असले तरी चलन हे भरावेच लागणार आहे. चलन हाच येथून पुढे बांधकाम परवाना म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. नगररचना विभागातील अधिकाऱ्यांऐवजी आर्किटेक्टकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

चौकट ०१

बॅंकांना वेगळे आदेश काढावे लागणार

परवाना असल्याखेरीज बॅंका गृह कर्ज देत नाहीत. आता येथून पुढे चलन हाच परवाना असल्याने तो ग्राह्य धरावा, असा नवीन आदेश शासनाकडून बॅंकांना काढावा लागणार आहे. हे केले तरच ते बांधकाम कायदेशीर होणार आहे.

चौकट ०२

दहा दिवसांत परवानगी देणे बंधनकारक

ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी आर्किटेक्टच्या नियुक्तीचे प्रमाण खूपच कमी आहे. स्थानिक गवंडीकडून बांधकाम केले जाते, पण आता नवीन नियमानुसार घर बांधायचे म्हटले तर आर्किटेक्टची मदत घ्यावीच लागणार आहे. त्याच्याकडे कागदपत्रे जमा केल्यानंतर त्यांनी १० दिवसांच्या आत परवानगी दिल्यानंतर चलन भरून रीतसर बांधकामाला सुरुवात करावी लागणार आहे.

प्रतिक्रिया

शासनाने घेतलेला निर्णय स्तुत्य आहे, पण यातील मेखही लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. परवानामुक्त बांधकाम करता येणार असे म्हणणे चुकीचे ठरणार आहे. परवाना घ्यावाच लागणार आहे, पण त्यासाठी वेगळी यंत्रणा उभी केली गेली एवढाच काय तो फरक.

विद्यानंद बेडेकर, अध्यक्ष, क्रिडाई