शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
3
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले
4
Ceasefire Violation: पाकिस्तानच्या कुरघोडीनंतर PM मोदींच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक
5
India Pakistan Conflict : भारत-पाकिस्तान युद्धबंदी, एआयएमआयएमच्या वारिस पठाण यांचे सवाल, म्हणाले, 'धर्माबद्दल विचारून...'
6
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
7
रणवीर अलाहाबादिया पुन्हा फसला, मागितली पाकिस्तानी नागरिकांची माफी! भारतीय म्हणाले- 'तू तिकडेच जाऊन रहा'
8
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
9
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
10
UPI व्यवहारात अशी होते फसवणूक; आर्थिक नुकसान टाळण्यासाठी 'या' टीप्स फोलो करा
11
"मी तुझ्यासोबत काम करणार नाही", बॉलिवूड अभिनेत्याचा मोठा निर्णय! पाकिस्तानी अभिनेत्री दुखावली, म्हणाली-
12
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
13
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
14
IND W vs SL W Final : फायनलमध्ये स्मृती मानधनाचा तोरा! तिच्या भात्यातून आली सलग दुसरी फिफ्टी
15
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
16
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
17
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
20
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

समाजाच्या मानसिकतेवर अचूक बोट

By admin | Updated: December 17, 2015 01:39 IST

राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप : प्रेक्षकांची खचाखच गर्दी; ‘काही क्षण‘ने सूप वाजले

कोल्हापूर : बालनाट्य स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी चिमुरड्यांनी विविध बालनाट्यांतून सामाजिक संदेश दिले. शेवटच्या दिवशीही प्रेक्षकांनी गर्दी केली होती. दामले विद्यालय, रत्नागिरीतर्फे सादर झालेल्या ‘काही क्षण’ या नाटकाने १३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप करण्यात आला.‘झाडवाली झुंबी’ या नाटकाने बुधवारी, चौथ्या दिवसाची सुरुवात झाली. शिंदे अकॅडमी, कोल्हापूर यांनी सादर केलेल्या या नाटकामध्ये, निसर्गरक्षण व पर्यावरण रक्षण या विषयाची मांडणी करीत निसर्ग आणि मानव यांच्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकला. ‘प्लॉट नंबर शून्य कचराकुंडीजवळ,’ अक्षरसिंधू साहित्य कलामंच, कणकवली या संस्थेने नाटकाच्या माध्यमातून समाजातील अनाथ मुलांची परिस्थिती व समाजाचा दृष्टिकोन मुलांनी मांडला.‘रानपाखरं’ या अण्णा भाऊ इंग्लिश स्कूल, आजरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकाच्या माध्यमातून शिक्षणासोबतच मूल्यशिक्षणही आजच्या काळात किती गरजेचे आहे, ते पटवून देण्याचा प्रयत्न केला. आनंदसागर पब्लिक स्कू ल, तासगावने सादर केलेल्या ‘तिसरी घंटा’ या नाटकाच्या माध्यमातून, नाटकांकडे प्रेक्षकांचा ओढा कमी झाल्याने बंद पडलेल्या थिएटरच्या वाट्याला आलेल्या उपेक्षेचे आणि त्याला आलेल्या एकाकीपणावर भाष्य केले. आजरा हायस्कूल, आजराच्या मुलांनी सादर केलेल्या ‘मनू माझा भावला’ या नाटकातून ग्रामीण-शहरी मानसिकतेमधील फरकांमुळे खेड्यातील मुलांना होणारा त्रास मांडला आहे. आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव या शाळेच्या मुलांच्या ‘केल्याने होत आहे रे’ या वगनाटकाच्या माध्यमातून मुलांच्या मनात असलेली अभ्यासाची भीती कमी करून हसत-खेळत शिक्षणाचा मूलमंत्र दिला. दामले विद्यालय, रत्नागिरीच्या मुलांनी सादर केलेल्याा ‘काही क्षण’ या नाटकाच्या माध्यमातून अनाथ मुले परिस्थितीशी झगडत कशी उभी राहतात, दु:खाच्या क्षणांतही आनंदाचे ‘काही क्षण’ मिळवून जगण्याचा अविरत संघर्ष कशी करतात, याचे दर्शन घडते.