शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

समाजाच्या मानसिकतेवर अचूक बोट

By admin | Updated: December 17, 2015 01:39 IST

राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप : प्रेक्षकांची खचाखच गर्दी; ‘काही क्षण‘ने सूप वाजले

कोल्हापूर : बालनाट्य स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी चिमुरड्यांनी विविध बालनाट्यांतून सामाजिक संदेश दिले. शेवटच्या दिवशीही प्रेक्षकांनी गर्दी केली होती. दामले विद्यालय, रत्नागिरीतर्फे सादर झालेल्या ‘काही क्षण’ या नाटकाने १३ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेचा समारोप करण्यात आला.‘झाडवाली झुंबी’ या नाटकाने बुधवारी, चौथ्या दिवसाची सुरुवात झाली. शिंदे अकॅडमी, कोल्हापूर यांनी सादर केलेल्या या नाटकामध्ये, निसर्गरक्षण व पर्यावरण रक्षण या विषयाची मांडणी करीत निसर्ग आणि मानव यांच्या नातेसंबंधांवर प्रकाश टाकला. ‘प्लॉट नंबर शून्य कचराकुंडीजवळ,’ अक्षरसिंधू साहित्य कलामंच, कणकवली या संस्थेने नाटकाच्या माध्यमातून समाजातील अनाथ मुलांची परिस्थिती व समाजाचा दृष्टिकोन मुलांनी मांडला.‘रानपाखरं’ या अण्णा भाऊ इंग्लिश स्कूल, आजरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटकाच्या माध्यमातून शिक्षणासोबतच मूल्यशिक्षणही आजच्या काळात किती गरजेचे आहे, ते पटवून देण्याचा प्रयत्न केला. आनंदसागर पब्लिक स्कू ल, तासगावने सादर केलेल्या ‘तिसरी घंटा’ या नाटकाच्या माध्यमातून, नाटकांकडे प्रेक्षकांचा ओढा कमी झाल्याने बंद पडलेल्या थिएटरच्या वाट्याला आलेल्या उपेक्षेचे आणि त्याला आलेल्या एकाकीपणावर भाष्य केले. आजरा हायस्कूल, आजराच्या मुलांनी सादर केलेल्या ‘मनू माझा भावला’ या नाटकातून ग्रामीण-शहरी मानसिकतेमधील फरकांमुळे खेड्यातील मुलांना होणारा त्रास मांडला आहे. आदर्श गुरुकुल विद्यालय, पेठवडगाव या शाळेच्या मुलांच्या ‘केल्याने होत आहे रे’ या वगनाटकाच्या माध्यमातून मुलांच्या मनात असलेली अभ्यासाची भीती कमी करून हसत-खेळत शिक्षणाचा मूलमंत्र दिला. दामले विद्यालय, रत्नागिरीच्या मुलांनी सादर केलेल्याा ‘काही क्षण’ या नाटकाच्या माध्यमातून अनाथ मुले परिस्थितीशी झगडत कशी उभी राहतात, दु:खाच्या क्षणांतही आनंदाचे ‘काही क्षण’ मिळवून जगण्याचा अविरत संघर्ष कशी करतात, याचे दर्शन घडते.