शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
3
'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
4
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
5
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
6
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
7
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
8
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
9
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
10
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
11
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
12
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
13
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
14
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
15
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
16
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
17
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
18
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
19
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
20
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम

जलव्यवस्थापनात लोकांचा दबावगट हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:01 IST

गडहिंग्लज : जलसंपदेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शासनाचीच आहे; परंतु नियोजन आणि अंमलबजावणी यंत्रणेच्या अभावामुळे ८० टक्के पाणी वाया जात आहे. लोकसहभागाच्या नावाखाली ही जबाबदारी लोकांवरच टाकली जात आहे. मग यंत्रणा काय करणार? असा सवाल करतानाच यासंदर्भात जनजागृतीबरोबरच लोकांनी दबावगट म्हणून काम करावे आणि शासकीय यंत्रणा कामाला लावावी, असा सल्ला जलतज्ज्ञ प्रदीप ...

गडहिंग्लज : जलसंपदेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शासनाचीच आहे; परंतु नियोजन आणि अंमलबजावणी यंत्रणेच्या अभावामुळे ८० टक्के पाणी वाया जात आहे. लोकसहभागाच्या नावाखाली ही जबाबदारी लोकांवरच टाकली जात आहे. मग यंत्रणा काय करणार? असा सवाल करतानाच यासंदर्भात जनजागृतीबरोबरच लोकांनी दबावगट म्हणून काम करावे आणि शासकीय यंत्रणा कामाला लावावी, असा सल्ला जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी दिला.गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर फौंडेशनतर्फे कै. केदारी रेडेकर जीवन गौरव पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. याप्रसंगी ‘जलव्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फौंडेशनच्या अध्यक्षा अंजना रेडेकर होत्या. पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे आणि नद्या-नाले वाहते ठेवून निसर्गाचे जलचक्र अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.पुरंदरे म्हणाले, २००५ मध्ये जलनियमनाचा कायदा होऊनदेखील १३ वर्षांत अजूनही जलआराखड्याचे काम पूर्ण झालेले नाही. राज्यातील बांधकामाधिन सुमारे ४०० प्रकल्प रखडलेले आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी सुमारे ७५ हजार कोटींची गरज आहे. तरीदेखील १९१ नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. सुधारित प्रशासकीय मंजुरीनुसार त्यासाठी ६८ हजार कोटी लागणार आहेत. मग, हे प्रकल्प कधी आणि कसे पूर्ण होणार? हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळेच जलव्यवस्थापन आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणे गरजेचे आहे. यावेळी उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, प्राचार्या डॉ. वीणा कंठी, श्रद्धा शिंत्रे, कॉ. दत्ता अत्याळकर, विष्णुपंत केसरकर, अरुण देसाई, सतीश पाटील, नागेश चौगुले, आदी उपस्थित होते. रेडेकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.सुभाष धुमे यांनी स्वागत केले. फौंडेशनचे सचिव प्रा. सुनील शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. एस. डी. पाटील यांनी अतिथी परिचय करून दिला. अ‍ॅड. सयाजी पाटील यांनी मानपत्र वाचन केले. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनंत पाटील यांनी आभार मानले.पुरस्काराची रक्कम ‘चळवळी’लापुरंदरे यांनी २१ हजारांच्या पुरस्कारात स्वत:चे चार हजार घालून २५ हजार रुपयांची मदत रेडेकर फौंडेशनने हाती घेतलेल्या पाण्याच्या चळवळीसाठी दिली. रोख २१ हजार, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.