शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

जलव्यवस्थापनात लोकांचा दबावगट हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:01 IST

गडहिंग्लज : जलसंपदेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शासनाचीच आहे; परंतु नियोजन आणि अंमलबजावणी यंत्रणेच्या अभावामुळे ८० टक्के पाणी वाया जात आहे. लोकसहभागाच्या नावाखाली ही जबाबदारी लोकांवरच टाकली जात आहे. मग यंत्रणा काय करणार? असा सवाल करतानाच यासंदर्भात जनजागृतीबरोबरच लोकांनी दबावगट म्हणून काम करावे आणि शासकीय यंत्रणा कामाला लावावी, असा सल्ला जलतज्ज्ञ प्रदीप ...

गडहिंग्लज : जलसंपदेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शासनाचीच आहे; परंतु नियोजन आणि अंमलबजावणी यंत्रणेच्या अभावामुळे ८० टक्के पाणी वाया जात आहे. लोकसहभागाच्या नावाखाली ही जबाबदारी लोकांवरच टाकली जात आहे. मग यंत्रणा काय करणार? असा सवाल करतानाच यासंदर्भात जनजागृतीबरोबरच लोकांनी दबावगट म्हणून काम करावे आणि शासकीय यंत्रणा कामाला लावावी, असा सल्ला जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी दिला.गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर फौंडेशनतर्फे कै. केदारी रेडेकर जीवन गौरव पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. याप्रसंगी ‘जलव्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फौंडेशनच्या अध्यक्षा अंजना रेडेकर होत्या. पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे आणि नद्या-नाले वाहते ठेवून निसर्गाचे जलचक्र अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.पुरंदरे म्हणाले, २००५ मध्ये जलनियमनाचा कायदा होऊनदेखील १३ वर्षांत अजूनही जलआराखड्याचे काम पूर्ण झालेले नाही. राज्यातील बांधकामाधिन सुमारे ४०० प्रकल्प रखडलेले आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी सुमारे ७५ हजार कोटींची गरज आहे. तरीदेखील १९१ नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. सुधारित प्रशासकीय मंजुरीनुसार त्यासाठी ६८ हजार कोटी लागणार आहेत. मग, हे प्रकल्प कधी आणि कसे पूर्ण होणार? हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळेच जलव्यवस्थापन आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणे गरजेचे आहे. यावेळी उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, प्राचार्या डॉ. वीणा कंठी, श्रद्धा शिंत्रे, कॉ. दत्ता अत्याळकर, विष्णुपंत केसरकर, अरुण देसाई, सतीश पाटील, नागेश चौगुले, आदी उपस्थित होते. रेडेकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.सुभाष धुमे यांनी स्वागत केले. फौंडेशनचे सचिव प्रा. सुनील शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. एस. डी. पाटील यांनी अतिथी परिचय करून दिला. अ‍ॅड. सयाजी पाटील यांनी मानपत्र वाचन केले. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनंत पाटील यांनी आभार मानले.पुरस्काराची रक्कम ‘चळवळी’लापुरंदरे यांनी २१ हजारांच्या पुरस्कारात स्वत:चे चार हजार घालून २५ हजार रुपयांची मदत रेडेकर फौंडेशनने हाती घेतलेल्या पाण्याच्या चळवळीसाठी दिली. रोख २१ हजार, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.