शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

जलव्यवस्थापनात लोकांचा दबावगट हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:01 IST

गडहिंग्लज : जलसंपदेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शासनाचीच आहे; परंतु नियोजन आणि अंमलबजावणी यंत्रणेच्या अभावामुळे ८० टक्के पाणी वाया जात आहे. लोकसहभागाच्या नावाखाली ही जबाबदारी लोकांवरच टाकली जात आहे. मग यंत्रणा काय करणार? असा सवाल करतानाच यासंदर्भात जनजागृतीबरोबरच लोकांनी दबावगट म्हणून काम करावे आणि शासकीय यंत्रणा कामाला लावावी, असा सल्ला जलतज्ज्ञ प्रदीप ...

गडहिंग्लज : जलसंपदेच्या व्यवस्थापनाची जबाबदारी शासनाचीच आहे; परंतु नियोजन आणि अंमलबजावणी यंत्रणेच्या अभावामुळे ८० टक्के पाणी वाया जात आहे. लोकसहभागाच्या नावाखाली ही जबाबदारी लोकांवरच टाकली जात आहे. मग यंत्रणा काय करणार? असा सवाल करतानाच यासंदर्भात जनजागृतीबरोबरच लोकांनी दबावगट म्हणून काम करावे आणि शासकीय यंत्रणा कामाला लावावी, असा सल्ला जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी दिला.गडहिंग्लज येथील केदारी रेडेकर फौंडेशनतर्फे कै. केदारी रेडेकर जीवन गौरव पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. याप्रसंगी ‘जलव्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फौंडेशनच्या अध्यक्षा अंजना रेडेकर होत्या. पावसाचे पाणी जमिनीत मुरविणे आणि नद्या-नाले वाहते ठेवून निसर्गाचे जलचक्र अबाधित राहण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.पुरंदरे म्हणाले, २००५ मध्ये जलनियमनाचा कायदा होऊनदेखील १३ वर्षांत अजूनही जलआराखड्याचे काम पूर्ण झालेले नाही. राज्यातील बांधकामाधिन सुमारे ४०० प्रकल्प रखडलेले आहेत. त्यांच्या पूर्ततेसाठी सुमारे ७५ हजार कोटींची गरज आहे. तरीदेखील १९१ नव्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली. सुधारित प्रशासकीय मंजुरीनुसार त्यासाठी ६८ हजार कोटी लागणार आहेत. मग, हे प्रकल्प कधी आणि कसे पूर्ण होणार? हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळेच जलव्यवस्थापन आणि कायद्याच्या अंमलबजावणीचा आग्रह धरणे गरजेचे आहे. यावेळी उपाध्यक्ष अनिरुद्ध रेडेकर, प्राचार्या डॉ. वीणा कंठी, श्रद्धा शिंत्रे, कॉ. दत्ता अत्याळकर, विष्णुपंत केसरकर, अरुण देसाई, सतीश पाटील, नागेश चौगुले, आदी उपस्थित होते. रेडेकर यांचे अध्यक्षीय भाषण झाले.सुभाष धुमे यांनी स्वागत केले. फौंडेशनचे सचिव प्रा. सुनील शिंत्रे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. एस. डी. पाटील यांनी अतिथी परिचय करून दिला. अ‍ॅड. सयाजी पाटील यांनी मानपत्र वाचन केले. किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले. अनंत पाटील यांनी आभार मानले.पुरस्काराची रक्कम ‘चळवळी’लापुरंदरे यांनी २१ हजारांच्या पुरस्कारात स्वत:चे चार हजार घालून २५ हजार रुपयांची मदत रेडेकर फौंडेशनने हाती घेतलेल्या पाण्याच्या चळवळीसाठी दिली. रोख २१ हजार, मानपत्र, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.