शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

जो काम करतो, त्याला जनता निवडते

By admin | Updated: April 10, 2017 00:09 IST

विजय शिवतारे : शिरोळमधील भूमाता संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन

शिरोळ : शेतकऱ्यांच्या विवंचना काय आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मुख्यमंत्री देखील म्हणतात, मी शेतकरी आहे; पण जो शेतात काम करतो, ज्याचा सात-बारा आहे, त्यालाच शेतकरी म्हणतात. यापूर्वी ज्या राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मोठमोठी धरणे करून पाण्याची उपलब्धता करून दिली त्यांना विसरणे अवघड आहे. जो जनतेसाठी काम करतो, त्यालाच जनता मतदान करून निवडून आणते. काँग्रेसचे तिकीट मिळाले म्हणजे आमदार ही पद्धत आता बंद झाली आहे, अशी टीका राज्याचे जलसंपदामंत्री विजय शिवतारे यांनी केली.शिरोळ येथील भूमाता कार्यकारी सेवा संस्थेच्या नूतन कार्यालयाचा प्रारंभ शनिवारी मंत्री शिवतारे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. मंत्री शिवतारे म्हणाले की, शिरोळ भूमाता सहकारी संस्थेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी चांगले कार्य सुरू आहे. उल्हास पाटील यांच्या रूपाने पक्षविरहित भावनेतून जनतेसाठी काम करणारा आणि तळागाळातील जनतेच्या प्रश्नांशी एकरूप झालेला आमदार या तालुक्याला लाभला आहे. यावेळी आमदार उल्हास पाटील यांनी आपल्या संस्थांचा इतिहास, शेतकऱ्यांबद्दलचे योगदान, चळवळ याबाबतची माहिती आपल्या मनोगतातून व्यक्त केली. यावेळी श्री दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ. नीता माने, दिलीपराव पाटील, पंचायत समितीचे सभापती मल्लाप्पा चौगुले, उपसभापती कविता चौगुले, जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे, अशोकराव माने, स्वाती सासने, बंडा माने, संजय माने, धनाजीराव जगदाळे, भाजपचे तालुका अध्यक्ष धैर्यशील देसाई, शिवाजीराव माने-देशमुख, संतोष जाधव, रावसाहेब पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)