शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

कागलमधील जनतेने धाडसी निर्णय घ्यावा

By admin | Updated: January 22, 2017 00:36 IST

समरजितसिंह घाटगे : एक संधी द्या; विकास काय असतो ते दाखवितो

सेनापती कापशी : राजकारणातून कोणाला तरी संपविण्यासाठी नव्हे, तर राजे गटाला मोठे करण्यासाठी मी स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाच्या रूपाने मी कागल तालुक्यातील जनतेला सक्षम पर्याय देत आहे. या निवडणुकीत माझ्या घरचा कोणीही उमेदवार नाही. सर्वसामान्य कार्यकर्त्यांनाच उमेदवारी देणार असल्यामुळे जनतेने धाडसी निर्णय घ्यावा. फक्त मला एकदा संधी द्यावी; विकास काय असतो ते मी तालुक्यातील जनतेला दाखवितो, असे प्रतिपादन समरजितसिंह घाटगे यांनी केले.ते सेनापती कापशी (ता. कागल) येथे वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ व चिकोत्रा खोऱ्यातील कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश कार्यक्रमप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी उपसभापती उदयसिंह घोरपडे होते.घाटगे म्हणाले, येत्या पाच ते सहा दिवसांत तालुक्यातील सर्व १५ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली जाणार असून, गेली ३० ते ३५ वर्षे राजकारण करणाऱ्यांनी विकासाचे मुद्दे मांडावेत. जनतेनेही ठोस विकास आणि मुद्द्यावरच मते टाकावीत. चिकोत्रा खोऱ्यात आता ‘कमळ’ फुलविल्याशिवाय थांबायचे नाही.उदयसिंह घोरपडे म्हणाले, राजे गट हा तात्त्विक विचारधारा जोपासणारा गट आहे. ही विचारांची लढाई आहे. समरजित घाटगेंचे नेतृत्व व्यापक असून, त्यांनी कागल तालुक्याचे नेतृत्व करावे. यावेळी उमेश देसाई, राजाभाऊ माळी, संजय बरकाळे, बाळासो काटकर (चिखली), शुभांगी काटकर (चिखली), अनिल भोसले (चिखली), सुरेश मांगोरे, संतोष शेळके (जैन्याळ), आदींनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.राजाभाऊ माळी, सुजाताताई देसाई, संदीप जाधव यांनी मनोगत व्यक्त केले, तर शिबिराज शिवूडकर यांनी आभार मानले. वाढदिवसानिमित्त समरजित घाटगे यांचा सत्कार करण्यात आला. आनंदा मांगले, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, बॉबी माने, संदीप पाटील, केरुआबा कांबळे, राजेंद्र सरनाईक, तानाजी कुरणे उपस्थित होते. (वार्ताहर)पाणी समस्या सोडविण्यासाठीच भाजपमध्ये : देसाईचिकोत्रा खोऱ्याची भौगोलिक परिस्थिती चांगली आहे. चारही बाजूने डोंगर आहे. येथे पाऊसही मुबलक पडतो; पण गेली ३0 ते ३५ वर्षे राजकारण करणाऱ्या नेत्यांना पाण्याचे नियोजन का जमले नाही. चिकोत्रा खोऱ्याची पाणी समस्या मोठी आहे. समरजितसिंह घाटगेंनी पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा व विकासाचे राजकारण तालुक्यात सुरू केले. यामुळेच आम्ही कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे उमेश देसाई यावेळी म्हणाले.सेनापती कापाशी (ता. कागल) येथे चिकोत्रा खोऱ्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भाजप प्रवेशप्रसंगी आयोजित कार्यक्रमात समरजितसिंह घाटगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अमरसिंह घोरपडे, उदयबाबा घोरपडे, राजाभाऊ माळी, उमेश देसाई, केरुआबा कांबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.