शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
3
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
4
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
5
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
6
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
7
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
8
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
9
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
10
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
11
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
12
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
13
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
14
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
15
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
16
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
17
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
18
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
19
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
20
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी

दाखल्याअभावी थांबली पेन्शन

By admin | Updated: January 14, 2015 00:43 IST

निष्काळजीपणा : बँक व पेन्शनर्सच्या चालढकलपणामुळे कोषागार वेठीस

फुलेवाडी : दरवर्षी पेन्शनर्सनी पेन्शन सुरू राहण्यासाठी नोव्हेंबर महिन्यात आपल्या हयातीचा दाखला बॅँकेत देणे गरजेचे असते. त्याअगोदर दोन महिने कोषागार कार्यालयाकडून योग्य ते दाखले व सूचना बॅँकांना दिलेल्या असतात. तरी यावर्षी १६०० पेक्षा जास्त पेन्शनर्सचे हयातीचे दाखले जमा झाले नाहीत. कोषागार कार्यालय संपूर्ण संगणकीकृत असल्याने ज्यांचे दाखले मिळाले नाहीत त्यांची पेन्शन आपोआप थांबली गेली आहे.हयातीच्या दाखल्याबाबत वेळोवेळी आवाहन केले जाते. साधारणपणे १० डिसेंबरपर्यंत सर्वांचे दाखले कोषागार कार्यालयात बॅँकेमार्फत येणे अपेक्षित असते. वास्तविक बॅँकांची नैतिक जबाबदारी आहे की, त्यांनी नोव्हेंबरमध्ये प्रत्येक पेन्शनर्सकडून हयातीचा दाखला घ्यावा; पण बॅँक आॅफ महाराष्ट्र, लक्ष्मीपुरी शाखा, बॅँक आॅफ इंडिया यासारख्या अनेक बड्या बॅँकांनी आपल्याकडील एकाही पेन्शनर्सचा एकही दाखला कोषागार कार्यालयात जमा करण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यामुळे त्या शाखेतील सर्वांची पेन्शन थांबली. यावरून बॅँकांमधून पेन्शनर्सना मिळणारी सापत्नभावाची वागणूक पुन्हा अधोरेखित झाली आहे.पेन्शन थांबल्यामुळे गेले काही दिवस कोषागार कार्यालयात चौकशीसाठी व दाखले जमा करण्यासाठी पेन्शनर्सची गर्दी होत आहे. या कारणामुळे कोषागार कार्यालयातील कर्मचारी आॅफिस आदेशानुसार थांबलेल्या पेन्शनर्सची पेन्शन जमा करण्यात व्यस्त आहेत. तयार केलेले पेन्शनचे प्रस्ताव सही करून मंजूर करण्यासाठी अप्पर कोषागार अधिकारी (निवृत्ती वेतन) शनिवारी कार्यालयात उपलब्ध नव्हते.पेन्शनर्सनींही प्रत्येक नोव्हेंबरमध्ये न चुकता स्वत:च्या हयातीचा दाखला देणे गरजेचे आहे, अन्यथा आपली पेन्शन थांबून आपणास आर्थिक विवंचनेस सामोरे जावे लागण्याची जाणीव ठेवणे गरजेचे आहे. ज्यांनी अजूनही हयातीचे दाखले जमा केले नसतील त्यांनी ते बॅँकेच्या मॅनेजरच्या सहीने कोषागार कार्यालयात जमा करावेत. तद्नंतरच त्यांची पेन्शन जमा करता येईल, असे आवाहन कोषागार अधिकारी रमेश लिधडे यांनी केले आहे. ( प्रतिनिधी )कोल्हापुरात २८ हजारांपेक्षा जास्त पेन्शनर्स आहेत. त्यापैकी १६००हून अधिक पेन्शनर्सनी हयातीचे दाखले जमा केले नाहीत. त्यांची पेन्शन थांबली आहे. आतापर्यंत ज्यांनी दाखले जमा केले आहेत त्यांची आर्थिक कुचंबणा थांबविण्यासाठी पेन्शन वितरित करण्याची कार्यवाही करण्यास सांगितले आहे. अजूनही ज्यांनी दाखले दिले नाहीत त्यांनी ते त्वरित कार्यालयात जमा करावेत.- रमेश लिधडे(जिल्हा कोषागार अधिकारी)