शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

१ मे पासून टोलवसुली करणार,, ‘सुप्रीम’ला रोज दीड लाखाचा दंड

By admin | Updated: March 16, 2016 08:36 IST

कामात दिरंगाई तरीही टोलची घाई,, काम अपूर्ण असल्याने पीडब्ल्यूडीची कारवाई

सतीश पाटील -- शिरोलीकोल्हापूर-सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम ९५ टक्के पूर्ण होत आले आहे. त्यामुळे एक मेपासून हा रस्ता वाहतुकीस खुला होऊन टोल सुरू होणार असल्याची माहिती सुप्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर इंडिया लि. कंपनीकडून कोल्हापूर-सांगली या ५२ कि.मी. रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम ‘बांधा वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्त्वावर २0 आॅक्टोबर २0१२ मध्ये सुरू झाले. आम्हाला सन २0१४ पर्यंत हे काम पूर्ण करून रस्ता वाहतुकीस खुला करायचा होता; पण अजूनही अतिग्रे येथील एक किलोमीटरमधील घरे निघालेली नाहीत. हातकणंगले येथील ८00 मीटरच्या उड्डाणपुलाला अजून सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरी दिलेली नाही. या पुलासाठी ३२ कोटी रुपये जादा खर्च आहे त्यामुळे ते काम अपूर्ण आहे. तमदलगे येथील भूसंपादनाचे पैसे सहा महिन्यांपूर्वीच कंपनीने प्रांत कार्यालयाकडे जमा केले आहेत; पण अद्याप तेथील लोकांना पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे दोन किलोमीटरमधील ४0 घरांचा आणि मंदिराचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. निमशिरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यायी जागा दली आहे; पण शाळेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. सांगली, अंकली येथील भूसंपादनाचे त्रांगडे चार वर्षे झाले तरी सुटलेले नाही; पण शिरोली, हालोंडी, हेर्ले, चोकाक, मजले, जयसिंगपूर, जैनापूर, उदगाव याठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. एकूण ९५ टक्के रस्त्याचे काम पूर्ण झाले असून, येत्या दोन महिन्यांत कोल्हापूर-सांगली रस्त्याचे सर्व कामे पूर्ण होईल, अशी माहिती या अधिकाऱ्यांनी दिली.रस्त्याचे काम पूर्ण होत आल्यामुळे शिरोली येथील आणि अंकली येथे टोल वसुलीसाठी टोलनाके उभारण्याचे काम सुरू केले आहे. एक मे रोजी कोल्हापूर-सांगली रस्ता वाहतुकीस खुला होईल आणि त्याचवेळी टोल सुरू होणार आहे. या टोलमधून हलकी चारचाकी वाहने, एस. टी. महामंडळ, केएमटी बस, स्कूल बस वगळण्यात आली आहेत. फक्त मोठ्या वाहनांना टोल आकारण्यात येणार आहे, असे सुप्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सुप्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांची माहितीभीमगोंडा देसाई -- कोल्हापूरकोल्हापूर-सांगली महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मुदतवाढ देऊनही पूर्ण न केल्याने कंत्राटदार सुप्रीम कन्स्ट्रक्शन कंपनीस सार्वजनिक बांधकाम विभागाने ३१ जानेवारी २०१६ पासून रोज दीड लाख रुपयांचा दंड केला आहे. त्यामुळे कंपनीला कामातील दिरंगाई महागात पडली आहे. काम पूर्ण न करताच कंपनीने टोलवसुलीच्या हालचाली सुरू केल्या आहेत, परंतु ९८ टक्के काम पूर्ण झाल्यानंतर कंपनीने टोल वसूल करावा, अशी अट करारावेळी घातली आहे. ही अट डावलून टोलवसुली सुरू झाल्यास प्रचंड विरोध होणार आहे. नियमानुसार २० आॅक्टोबर २०१४ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत होती, परंतु कंपनीने निर्धारित वेळेत ते काम पूर्ण केले नाही. परिणामी वाहनधारकांसह सर्वच स्तरांतून संताप व्यक्त होत राहिला. गुंतागुंती वाढत गेल्या.दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार जाऊन सेना-भाजप सरकार सत्तेवर आले. सार्वजनिक बांधकाम आणि पालकमंत्री म्हणून कोल्हापूरचे चंद्रकांतदादा पाटील यांना संधी मिळाली. काम पूर्ण करण्यासाठी दबाव वाढल्याने मंत्री पाटील यांनी कंपनीचे प्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे संंबंधित अधिकारी यांच्यासोबत बैठक घेतली. आढावा घेतला. त्यावेळी भूसंपादनासह अन्य तक्रारींचा पाढा कंपनीने बैठकीत वाचला. त्यामुळे मंत्री पाटील यांनी काम पूर्ण करण्यासाठी ७५ दिवसांची मुदत वाढवून दिली. वाढवून दिलेली मुदतही ३१ जानेवारी २०१५ रोजी संपली. तरीही काम अर्धवटच राहिले आहे. कोल्हापूरकडून रस्त्याचे काम काही प्रमाणात झाले आहे. सांगली जिल्ह्यातील सात किलोमीटरचे काम ठप्प आहे. यामुळे सुप्रीम कंपनीच्या विरोधात लोकप्रतिनिधींसह वाहनधारकांत प्रचंड नाराजी आहे. यातूनच लोकप्रनिधींनी सुरू असलेल्या विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. त्याची दखल घेऊन मंत्री पाटील यांनी ‘सुप्रीम’ला काळ्या यादीत टाकणार असल्याचे जाहीर केले आहे. अर्धवट काम करण्यास अन्य कोणतीही कंपनी पुढे येणार नाही. पुन्हा काम रेंगाळणार म्हणून काळ्या यादीत टाकले तरी उर्वरित काम ‘सुप्रीम’कडूनच करून घेण्यात येणार आहे.