शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

शेकापची उसाला साडेतीन हजारांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 14:51 IST

यंदाच्या हंगामासाठी उसाला प्रतिटन किमान ३५०० रुपये भाव मिळाला पाहिजे, असा ठराव करत राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकार फसवे असल्याची टीका माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी कोल्हापुरात केली.

ठळक मुद्देभारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात ठराव सत्ताधारी फसवे : संपतराव पवार यांची टीकाकर्जमाफी म्हणजे लबाडाघरचे आवतण कारखान्यांनी भागविकास निधी घेऊ नये, प्रसंगी रस्त्यावर उतरू

कोल्हापूर : यंदाच्या हंगामासाठी उसाला प्रतिटन किमान ३५०० रुपये भाव मिळाला पाहिजे, असा ठराव करत राज्यातील सत्ताधारी भाजप-शिवसेना सरकार फसवे असल्याची टीका माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांनी कोल्हापुरात केली.

ते भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात बोलत होते. टेंबे रोड येथील पक्षाच्या कार्यालयात हा मेळावा झाला. यावेळी माजी जि. प. सदस्य बाबासाहेब देवकर, भारत पाटील, केरबा पाटील, बाबूराव कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संपत पवार-पाटील म्हणाले, सत्तेवर येण्यापूर्वी भाजप सरकारने शंभर दिवसांत ‘अच्छे दिन’ आणण्याचे अभिवचन दिले होते. राज्यातील शेतकºयांना कर्जमाफी होईल की नाही हे सांगता येत नाही. शेतकरी, बेरोजगारांना हे सरकार नुसते आश्वासन देत आहे. त्यामुळे हे सरकार फसवे आहे.

शासनाने कर्जमाफीच्या अटी व निकषांमध्ये वारंवार बदल केल्याने शासकीय यंत्रणासुद्धा संभ्रमात आहे. त्यामुळे कर्जमाफी म्हणजे लबाडाघरचे आवतण होय. त्याचबरोबर कारखान्यांनी भागविकास निधी घेऊ नये, प्रसंगी रस्त्यावर उतरू.

मेळाव्यात अंबाजी पाटील, अजित देसाई, एकनाथ पाटील, डॉ. संपत पाटील, शामराव मुळीक, शामराव पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुशांत बोरगे यांनी आभार मानले.मेळाव्यातील ठराव...

 

  1.  दि. २० सप्टेंबर २०१७ च्या अध्यक्षतेखालील मंत्री समितीच्या बैठकीत ऊस दराच्या रकमेतून भागविकास निधी प्रतिटन तीन टक्के किंवा ५० रुपये व मुख्यमंत्री सहाय्य निधी चार रुपये होण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यास आमचा विरोध असून तशी कोणतीही कपात ऊस बिलातून करू नये.
  2.  एफआरपीची रक्कम कारखाने सुरू होण्यापूर्वी कारखानानिहाय शासनाने १५ आॅक्टोबरपूर्वी जाहीर करावी
  3. खरीप हंगामातील पिकांची आधारभूत किमतीने खरेदी करण्यासाठी आठवडी बाजाराच्या ठिकाणी शासनाने खरेदी केंद्रे सुरू करून त्याची शासनाच्यावतीने प्रसिद्धी करावी.
  4.  अनियमित पाऊस व अतिवृष्टीने झालेल्या पिकांच्या नुकसानीची तातडीने पाहणी करून शेतकºयांना भरपाई देण्याची कार्यवाही करावी.
  5.  शेती पंपाची प्रस्तावित वीज दरवाढ रद्द करून सध्याचेच दर तीन वर्षांसाठी कायम ठेवावेत
  6.  महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाने शेतीच्या पाणीपट्टीमध्ये सुचविलेली २० टक्के दरवाढ रद्द करावी
  7.  गॅस, डिझेल व पेट्रोलचे कमी करावेत.