शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कर्जमाफीचे पैसे शासन फेडणार हप्त्याने : सतेज पाटील

By admin | Updated: July 2, 2017 19:33 IST

परतफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपये द्या

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0२ : कर्जमाफीचे ३४ हजार कोटी रुपये बँकांना अदा करण्यासाठी शासन हप्ते पाडून घेणार आहे, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे आणखी काही हजार कोटी रुपये वाढले तरी चालतील परंतु प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. रविवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पाटील म्हणाले, शासनाने ३४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. मात्र, शासनाची एकूण आर्थिक अवस्था पाहता शासन बँकांना हप्ते पाडूनच निधी देणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. आता मंत्रिमंडळाच्या बैठकीचा एक ठराव केला जाईल आणि येत्या पाच वर्षांत टप्प्या-टप्प्याने आम्ही हे पैसे बँकांना अदा करू, अशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल, अशी माझी माहिती आहे. जर पाच वर्षांचे हप्ते पाडणारच असाल तर आणखी काही कोटी रुपये वाढले म्हणून शासनाने वाईट वाटून घेण्याची गरज नाही; परंतु प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाधिक रकमेवर किमान ५० हजार रुपयांची कर्जमाफी देण्यात यावी, अशी आमची मागणी आहे. सध्या कर्जफेडीच्या २५ टक्के अनुदान अशा परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे; परंतु ही रक्कम अतिशय तुटपुंजी आहे म्हणूनच ही रक्कम वाढवून ती ५० हजार करावी, अशी आमची मागणी आहे. एकूणच कर्जमाफीमध्ये सरकार गोंधळलेले असल्याने अनेक त्रुटी राहिल्या आहेत. शासनाने या कर्जमाफीमुळे विविध विकास प्रकल्पांच्या निधींना कात्री लावण्याचा एकीकडे निर्णय घेतला असताना खरोखरंच शासन जर हप्ते पाडून बँकांना रक्कम देणार असेल तर बँकाही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

२०१९ च्या पुढचे हप्ते आम्ही फेडू

आता जरी शासनाने हप्ते पाडले तरी २०१९ नंतर आमचेच सरकार येणार असल्याने आम्ही पुढचे हप्ते फेडू, असा आशावादही यावेळी सतेज पाटील यांनी व्यक्त केला.