शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
2
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
4
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
5
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
6
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
7
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
8
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
9
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
10
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
11
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
12
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
13
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
14
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
15
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
16
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
17
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
18
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
19
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
20
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला

काम न करताही ठेकेदाराला साडेचार कोटींची बिले अदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:37 IST

पट्टणकोडोली हे २८ हजार लोकसंख्येचे हातकणंगले तालुक्यातील मोठे गाव आहे. हुपरी, रेंदाळ, तळंदगे, इंगळी, पट्टणकोडोली या पाच गावांसाठी म्हणून ...

पट्टणकोडोली हे २८ हजार लोकसंख्येचे हातकणंगले तालुक्यातील मोठे गाव आहे. हुपरी, रेंदाळ, तळंदगे, इंगळी, पट्टणकोडोली या पाच गावांसाठी म्हणून जुनी अडीच लाख लिटरची पेयजल याेजना आहे. पट्टणकोडोली वगळता उर्वरित चार गावांनी स्वतंत्र योजना केल्या आहेत. या योजनेचे दीड कोटीचे वीज बिल थकीत असल्याने महावितरणकडून वारंवार फ्यूज काढण्याची कारवाई केली जाते. या सर्वांना कंटाळून पट्टणकोडोली ग्रामपंचायतीने पेयजल योजनेतून सहा कोटी तीन लाख रकमेची पेयजल योजना राबविण्याचा निर्णय घेतला. २०१४ मध्ये मुख्य ठेकेदार नलवडे यांनी कामाचा नारळ फोडला; पण त्यांनी स्वत: न करता उपठेकेदार हर्षवर्धन माने यांच्याकडून काम करवून घेण्यास सुरुवात केली.

अडीच लाख लिटरची एक आणि ७० हजार लिटरच्या तीन अशा एकूण चार टाक्या बांधण्याचे नियोजन करून १८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याची कालमर्यादा घालून देण्यात आली. टाकीऐवजी गावांतर्गत लाईन टाकण्याचे काम प्रथम हाती घेण्यात आले. गावातील रस्त्यांची खुदाई झाली; पण कामाने गती घेतली नाही, म्हणून २०१८ मध्ये गावात जनआंदोलन उभारले गेले. तत्कालीन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासमोर ठेकेदाराने तीन महिन्यांत योजना पूर्ण करून देतो, असे लिहून दिले; पण प्रत्यक्षात काहीही झाले नाही. दरम्यान, अपूर्ण योजनेमुळे गळती आणि उकरलेले रस्ते, ग्रामपंचायतीला दुरुस्तीचा सोसावा लागलेला भुर्दंड आणि आठ दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने लोकांमध्ये असलेला राग वाढतच जाऊन अखेर त्याची परिणती तीव्र आंदोलनात झाली आहे.

चौकट ०१

...तरीही एमबीला मान्यता

या योजनेंतर्गत अजून पंपहाऊस, साठवणूक टाकी, फिल्टर हाऊस यापैकी कोणतेही काम झालेले नाही. आतापर्यंत या विषयावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सात वेळा आढावा बैठकी झाल्या, ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी करूनदेखील कारवाई करण्याऐवजी पाणीपुरवठा विभागाने दोनच महिन्यांपुर्वी एक कोटी २० लाखांची एमबी मान्यता दिली आहे. साडेतीन किलोमीटरचेही काम झालेले नसताना १२ किलोमीटर काम झाल्याचे दाखवून आतापर्यंत साडेचार कोटी रुपयांची बिले ठेकेदाराला देण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया

ठेकेदार बदलावा, गुन्हा दाखल करावा, राष्ट्रीय पेयजलऐवजी ती जलजीवन मिशनअंतर्गत पूर्ण करावी, अशी मागणी करूनदेखील जिल्हा परिषद प्रशासन दुर्लक्ष करत आहे. सर्वांचे लागेबांधे असल्यानेच ही वेळ आली आहे.

- अंबर बनगे, ग्रामपंचायत सदस्य, पट्टणकोडोली