शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

नातवांमुळे पवार आजोबांची पंचाईत : दिवाकर रावते यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 16:54 IST

राजकारणातील दोस्तीच्या इतके आहारी आपण गेलेलो असतो की ती सोडवत नाही. आई वडीलांनी हाक मारली तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण या दोस्तीत गुंतलेलो असतो. परंतु या दोस्तीमुळे राजकीय अडचणी निर्माण होतात. हे पक्षासाठी हानिकारक आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी जनतेचा विश्वास संपादन करावा यश आपोआप तुमच्या मागे येर्ईल, असे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी येथे केले.

ठळक मुद्देदोस्तीच्या आहारी जाऊ नका;अडचण होईल: दिवाकर रावतेशिवसेना गटप्रमुखांचा मेळावा : जनतेचा विश्वास संपादन केल्यावर यश मागे येईल

कोल्हापूर : राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एका नातवासाठी माढ्यातून माघार घेतली. परंतु आता दुसरा नातू उठून बसला असुन आजोबा माझे काय? असे म्हणत आहे. त्यामुळे या नातवांमुळे पवार आजोबांची चांगलीच पंचाईत झाल्याचा टोला राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी येथे लगावला.शाहू मार्केट यार्ड परिसरातील रामकृष्ण हॉल येथे शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्क प्रमुख प्रा. संजय मंडलिक, मुंबईच्या माजी महापौर श्रध्दा जाधव, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार संजय घाटगे, महिला जिल्हाध्यक्षा शुभांगी पोवार आदींची होती.

कोल्हापूरातील शाहू मार्केट यार्ड येथील रामकृष्ण हॉल येथे मंगळवारी आयोजित शिवसेनेच्या गटप्रमुख मेळाव्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पदाधिकारी, गटप्रमुख उपस्थित होते.(छाया : दीपक जाधव)मंत्री रावते म्हणाले, राजकारणातील दोस्तीच्या इतके आहारी आपण गेलेलो असतो की ती सोडवत नाही. आई वडीलांनी हाक मारली तरी आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण या दोस्तीत गुंतलेलो असतो. परंतु या दोस्तीमुळे राजकीय अडचणी निर्माण होतात. हे पक्षासाठी हानिकारक आहे. त्यामुळे शिवसैनिकांनी जनतेचा विश्वास संपादन करावा यश आपोआप तुमच्या मागे येर्ईल, असे आवाहन रावते यांनी येथे केले.

येणारा काळ हा पुन्हा शिवसेना-भाजपचा असेल अशी स्थिती सद्या आहे. प्रत्येक शिवसैनिकाने दहा घरात प्रचार केल्यास उमेदवार निवडून येण्यास काहीच अडचण नाही. प्रा. संजय मंडलिक यांच्या विजयाची पताका फडकविण्यासाठी शिवसैनिकांनो सज्ज व्हा.

यावेळी दुधवडकर, संजय पवार, आ. नरके , आ. आबिटकर, संजय घाटगे यांची भाषणे झाली,  ते म्हणाले, उच्चांकी मतदान देऊन संजय मंडलिकांना निवडून आणून ‘मातोश्री’वर नेऊ. एक शिवसैनिक म्हणून पक्षाच्या आदेशाने काम करु. यावेळी रवी चौगुले, मनजित माने, वीरेंद्र मंडलिक, संग्राम कुपेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, कमलाकर जगदाळे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.क्षीरसागर, इंगवले अनुपस्थितशिवसेनेच्या गटप्रमुखांच्या मेळाव्याला कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर व शहरप्रमुख रविकिरण इंगवले हे अनुपस्थित होते. या दोघांच्या अनुपस्थितीबाबत मेळाव्याच्या ठिकाणी शिवसैनिकांमध्ये दबक्या आवाजात कुजबूज सुरु होती. हे दोघे जाणीवपूर्वक आले नाहीत की अन्य कामात व्यस्त असल्याने ते येऊ शकले नाहीत. हे न कळाल्याने उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.साटेलोटे करणाऱ्यांचा शोध घ्यागेल्या निवडणुकीत शिवसेनेची मते कुणामुळे व कुठे गेली याचा शोध घेऊन साटेलोटे करणाऱ्यांची माहिती घेण्याची गरज आहे. दोषींना शिक्षा व्हायलाच पाहीजे, तरच संघटना टिकेल, असे संजय पवार यांनी सांगितले.

कोल्हापूर म्हणजे ‘मंडलिक’कोल्हापर म्हणजे मंडलिक अशी ओळख स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला  होती. सत्ताधारी पक्षाचे मंत्री व खासदार असतानाही एखादी गोष्ट अयोग्य असली तर प्रसंगी स्वपक्षियांशीच संघर्षाची भूमिका त्यांनी घेतल्याचे रावते यांनी सांगितले. यावर टाळ्यांचा कडकडाट झाला.

 

 

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर