त्या वेळी तुम्हाला तलवार लावून आणून शपथविधीस उभे केले होते का? असा सवाल पाटील यांनी पवारांना विचारला. तुम्हाला अठ्ठावीस आमदार सोबत ठेवता आले नाहीत. तुम्ही आमच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व महाविकासमध्ये उपमुख्यमंत्री, उद्या तिसऱ्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री व्हाल, मात्र तुम्ही सर्वत्र पाहिजेत, तुम्हाला तत्त्व, व्यवहार, सांगड नाही, तुमचे फक्त एकच तत्त्व आहे, ते म्हणजे ज्याचे सरकार त्यांच्यासोबत मी जाणार अशी टीकाही पाटील यांनी अजित पवार यांच्यावर केली.
महाविकास आघाडीने कर कमी करावेत-
इंधन दरवाढीवर बोलताना पाटील म्हणाले की, जागतिक स्तरावर भाव वाढले की, देशात पेट्रोलचे दर वाढतच राहतात. दर कमी करायचे असतील तर जागतिक स्तरावर प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र, ते शक्य नाही. राज्य व केंद्र सरकारने कर कमी केले पाहिजेत. महाविकास आघाडीने सरकारने देखील शेजारच्या राज्यातील इंधन दराचा विचार करून आपल्या राज्यातील इंधनावरील कर कमी करावेत.
महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाची जाणीव आणि गांभीर्य नाही. गायकवाड आयोग न्यायालयात व्यवस्थित मांडला नाही. आता मराठा आरक्षणप्रश्नी लोक त्याची परतफेड करतील. पंढरपूरमध्ये याची चुणूक दिसली. यापुढे जनता वाट पाहात आहे वेळ आली की तुम्हाला तुमची जागा ते दाखवतील, असा टोला पाटील यांनी लगवला आहे.
तर संभाजीराजेंची भूमिका मान्य नसेल-
मराठा आरक्षणाबाबत जे जे संघर्ष करतील, त्यांच्यासोबत भाजप असेल. त्यांचा शिलेदार म्हणून मी त्यांच्यासोबत असेन. पण कोरोनाचे नाव पुढे करून संघर्ष टाळला जात असेल तर हा प्रश्न सुटणार नाही. आणखी किती दिवस शांत बसायचे,' असा प्रश्नही त्यांनी केला. 'छत्रपती संभाजीराजे यांची भूमिका सरकारच्या बाजूची असेल तर ती आम्हाला मान्य नाही,' असंही त्यांनी स्पष्ट केलं.