शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', ऑपरेशन सिंदूरवरुन PM मोदींची बोचरी टीका
2
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
3
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
4
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
5
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
6
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
7
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
8
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
9
चक्क २० वर्षीय युवकानं बनवला स्वत:चा देश, ४०० जणांना दिलं नागरिकत्व; युरोपियन देश अवाक् झाले
10
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
11
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
12
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं
13
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
14
"कोणी तुम्हाला इच्छेविरोधात हात...", तसल्या सीनबद्दलच्या दृष्टिकोनावर काय म्हणाली मराठी अभिनेत्री?
15
मध्यमवर्गीयांची धाव SIP पर्यंत; पण, देशातील सर्वात श्रीमंत १% लोक करतात 'या' २ गोष्टीत सर्वाधिक गुंतवणूक
16
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
17
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
18
चातुर्मासातील पहिला बुध प्रदोष: कसे करावे व्रत? ‘या’ मंत्रांचा जप करा, महादेव शुभच करतील!
19
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रालयाने केला खुलासा...
20
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?

पतंगरावांनी तळागाळातील लोकांना प्रगतीचा मार्ग दाखविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:18 IST

पाचगाव : पतंगराव कदम यांनी गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन करत अखंडपणे समाजासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी वाहून घेतले होते. त्यांनी ...

पाचगाव : पतंगराव कदम यांनी गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन करत अखंडपणे समाजासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी वाहून घेतले होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना विकासाच्या, प्रगतीच्या मार्गावर आणले. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते थोर राजकारणी होते, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी केले. कोल्हापुरातील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात शुक्रवारी भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी वन, महसूलमंत्री स्व. पतंगराव कदम यांची ७७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात भोसले बोलत होते.

भोसले म्हणाले की, लाख मरावे परी लाखांचा पोशिंदा जगावा या उक्तीप्रमाणे डॉ. पतंगराव कदम अनेकांचे आधार व प्रेरणा बनून राहिले. यावेळी त्यांनी पतंगरावांबरोबरच्या अनेक आठवणींना उजाळा देतानाच त्या आठवणी सदैव प्रेरणा देत राहतील, असे सांगितले. यावेळी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे म्हणाले की. कोणत्याही क्षेत्रात उतरल्यावर हाती घेतलेले काम हे सर्वोच्च शिखरावर न्यायचे हा पतंगराव कदम यांचा ध्यास होता. त्यातूनच त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात भारती विद्यापीठाच्या माध्यमातून एक शैक्षणिक साम्राज्य उभे करून त्याचे वटवृक्षात रूपांतर केले.

यावेळी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संचालक डॉ. आर. ए. मराठे, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. बी. चवाटे, भारती विद्यापीठ प्रशालेचे मुख्याध्यापक जे. एस. तांदळे, भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका ऊर्मिला शिंदे, बी. वाय. पाटील तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.