शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

पतंगरावांनी तळागाळातील लोकांना प्रगतीचा मार्ग दाखविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:18 IST

पाचगाव : पतंगराव कदम यांनी गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन करत अखंडपणे समाजासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी वाहून घेतले होते. त्यांनी ...

पाचगाव : पतंगराव कदम यांनी गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन करत अखंडपणे समाजासाठी आणि सर्वसामान्य जनतेसाठी वाहून घेतले होते. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांना विकासाच्या, प्रगतीच्या मार्गावर आणले. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते थोर राजकारणी होते, असे प्रतिपादन लोकमतचे संपादक वसंत भोसले यांनी केले. कोल्हापुरातील भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुलात शुक्रवारी भारती विद्यापीठाचे संस्थापक, माजी वन, महसूलमंत्री स्व. पतंगराव कदम यांची ७७ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमात भोसले बोलत होते.

भोसले म्हणाले की, लाख मरावे परी लाखांचा पोशिंदा जगावा या उक्तीप्रमाणे डॉ. पतंगराव कदम अनेकांचे आधार व प्रेरणा बनून राहिले. यावेळी त्यांनी पतंगरावांबरोबरच्या अनेक आठवणींना उजाळा देतानाच त्या आठवणी सदैव प्रेरणा देत राहतील, असे सांगितले. यावेळी भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे म्हणाले की. कोणत्याही क्षेत्रात उतरल्यावर हाती घेतलेले काम हे सर्वोच्च शिखरावर न्यायचे हा पतंगराव कदम यांचा ध्यास होता. त्यातूनच त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात भारती विद्यापीठाच्या माध्यमातून एक शैक्षणिक साम्राज्य उभे करून त्याचे वटवृक्षात रूपांतर केले.

यावेळी भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट संचालक डॉ. आर. ए. मराठे, भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. पी. बी. चवाटे, भारती विद्यापीठ प्रशालेचे मुख्याध्यापक जे. एस. तांदळे, भारती विद्यापीठ इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका ऊर्मिला शिंदे, बी. वाय. पाटील तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.