शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

हद्दवाढीच्या चळवळीत सहभागी व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:27 IST

दरम्यान, बैठकीत असोसिएशनचे काही प्रमुख पदाधिकारी आणि २० गावांतील काही सदस्यांनी महापालिकेच्या कारभारी नगरसेवकांच्या भानगडी आणि प्रशासनाच्या दिरंगाई कामकाजामुळे ...

दरम्यान, बैठकीत असोसिएशनचे काही प्रमुख पदाधिकारी आणि २० गावांतील काही सदस्यांनी महापालिकेच्या कारभारी नगरसेवकांच्या भानगडी आणि प्रशासनाच्या दिरंगाई कामकाजामुळे हद्दवाढीत येण्यास गावांचा विरोध असल्याचे सांगितले.

शहराच्या हद्दवाढीचे फायदे सांगताना कॉमन मॅन संस्थेचे प्रमुख ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले की, आताच्या सरकारमधील नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहराच्या हद्दवाढीचा नव्याने प्रस्ताव देण्याची सूचना महापालिकेस जानेवारीमध्ये दिली. त्यानंतर पुन्हा एकदा हद्दवाढीचा विषय ऐरणीवर आला आहे. सन २०१७ मध्ये हद्दवाढीचा विषय समोर आल्यानंतर ४२ गावांचे प्राधिकरण केले; पण प्राधिकरणास गावांचा विकास करण्यात अपयश आले आहे. शहरात शिक्षण, रस्ते, दळणवळणाच्या आणि मूलभूत सूुविधा चांगल्या आहेत. काही त्रुटी असल्या तरी प्राधिकरणातील ४२ गावांपेक्षा चांगल्या सुविधा महापालिकेतर्फे दिल्या जातात. ग्रामीणपेक्षा शहरातील घरफाळाही कमी आहे. घनकचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केले जाते. नियंत्रित विकास होत आहे; पण अनेक वर्षांपासून हद्दवाढ न झाल्याने शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. केंद्राकडून विकास निधी मिळण्यात मर्यादा येत आहेत. कमी जागेत जास्त लोकांना राहण्याची वेळ आली आहे. यातूनच शहरात ११ मजल्यापर्यंत इमारतींची उंची गेली आहे. म्हणून शहराची हद्दवाढ होणे गरजेची आहे. यासाठी विविध सामाजिक संस्था, असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांशी चर्चा करून झाल्यानंतर एक महाबैठक घेण्यात येईल.

प्रजासत्ताक संस्थेचे देसाई म्हणाले की, हद्दवाढ का गरजेची आहे, याची माहिती २० गावांतील सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. हद्दवाढीसंबंधीचे गैरसमज, शंकांचे निरसनही करण्यात येईल.

केमिस्ट असोसिएश संघटनेचे सचिव मदन पाटील यांनी महापालिकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. असोसिएशनचे प्रमुख पदाधिकारी, सदस्यांनी महापालिकेच्या कारभारी नगरसेवकांच्या भानगडी, महापालिका प्रशासनाच्या दिरंगाई कामकाजावर बोट ठेवले. शहरातील लोकांनाच महापालिका चांगल्या सेवा, सुविधा देऊ शकत नाही तर मग २० गावांच्या समावेशाचा हट्ट का, असाही प्रश्न उपस्थित केला.

बैठकीस असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजी ढेंगे, भरतेश कळंत्रे, अशोक बोरगांवे, सचिन पुरोहित, सुधीर खराडे, धवल भरवाडा, शिवाजी यादव आदी उपस्थित होते.

चौकट

माजी मंत्र्यांमुळे

असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रल्हाद खवरे यांनी महापालिकेपेक्षा सक्षम ग्रामपंचायती चांगल्या सेवा, सुविधा देत असल्याचे सांगितले. प्रल्हाद खवरे यांनी महापालिकेपेक्षा सक्षम ग्रामपंचायती चांगल्या सेवा, सुविधा देत असल्याचे सांगितले. माजी मंत्र्यांनी प्राधिकरणात गावांना ढकलून जबाबदारी झटकल्याचाही आरोप त्यांनी केला.

फोटो : २५०८२०२१-कोल- हद्दवाढ बैठक

कोल्हापुरातील स्टेशन रोडवरील केव्हीज प्लाझामध्ये बुधवारी जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्यांसोबत शहर हद्दवाढीसंबंधी बैठक झाली. बैठकीत ॲड. बाबा इंदूलकर यांनी मार्गदर्शन केले.