शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

पर्रीकर यांचे कोल्हापूर, आजऱ्याशी ऋणानुबंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:29 IST

कोल्हापूर : दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे कोल्हापूर आणि आजरा शहरांशी ऋणानुबंध होते. पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींचा उजाळा मिळत ...

कोल्हापूर : दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे कोल्हापूर आणि आजरा शहरांशी ऋणानुबंध होते. पर्रीकर यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींचा उजाळा मिळत आहे. कोल्हापुरातील अनेक कार्यक्रमांना त्यांनी उपस्थिती लावली होती.भाजपचे संघटनमंत्री बाबा देसाई यांचे आणि पर्रीकर यांचे जवळचे संबंध होते. त्यामुळे प्रत्येक कोल्हापूर दौऱ्यामध्ये त्यांची भेट ठरलेली असे. रविवार पेठेतील ‘अभाविप’चे कार्यकर्ते शशांक देशपांडे यांचे त्यांच्याशी घनिष्ठ संबंध होते. देशपांडे हे गोव्यामध्ये ‘अभाविप’चे पूर्णवेळ प्रचारक म्हणून दोन वर्षे होते. तेव्हापासून पर्रीकरांचे त्यांच्याशी संंबंध आले. त्यामुळे त्यांनी देशपांडे यांच्या व्यवसायातही सहकार्य केले. त्यांच्या घरी तीन वेळा ते आले होते.महालक्ष्मी बॅँकेच्या कार्यक्रमात पर्रीकर आले होते. पंचगंगा बॅँकेच्या देवकर पाणंद शाखेचे उद्घाटन पर्रीकर यांच्या हस्ते झाले; तर कृष्णराव सोळंकी यांच्या अमृतमहोत्सवासाठीही पर्रीकर यांनी उपस्थिती लावली होती. गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी मुस्कान लॉनवर त्यांनी कोल्हापुरातील उद्योजक, व्यापाऱ्यांशी संवाद साधला होता.कोल्हापूरला ते येताना नेहमी आजरामार्गे येत असत. आजºयाचे दिवंगत भाजप नेते बाबूराव कुंभार यांच्याशी त्यांचे जवळचे संंबंध. गोव्यातील मंडळींच्या गाडीला आजºयाजवळ अपघात झाल्यानंतर बाबूराव कुंभार यांनी जी मदत केली होती, तिचा ते नेहमी आवर्जून उल्लेख करीत असत. अरुण देसाई हे आजºयाचे सरपंच असताना १९९९ साली हनुमान व्यापारी संकुलाच्या उद्घाटनासाठी आणि जॉन अ‍ॅलेक्स फर्नांडिस यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभाला ते आवर्जून आजºयात आले होते. राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी २०१४ साली पर्रीकर यांनी इचलकरंजी येथे सभा घेतल्याचीही आठवण यानिमित्ताने जागविण्यात आली.अर्थमूव्हर्सवाले प्रभावितकोल्हापुरातील अर्थमूव्हिंग कंत्राटदारांची यंत्रसामग्री अनेक वर्षे मायनिंगच्या कामासाठी गोव्यात होती. त्यांच्या काही अडचणी होत्या. शशांक देशपांडे यांच्या पुढाकाराने त्यावेळी भैया घोरपडे, अभय देशपांडे, रवी पाटील यांचे शिष्टमंडळ पर्रीकरना भेटले. पाऊण तास त्यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतले. एक मुख्यमंत्री इतका वेळ आपल्यासाठी देतो, यावर या सर्वांचा विश्वासच बसला नाही.बर्फाचा गोळा...एका कार्यक्रमानंतर पर्रीकर आणि शशांक देशपांडे सबजेलसमोरून येत होते. त्यांना बर्फाचे गोळे विकणारा दिसला. ‘असले गोळे गोव्यात मिळत नाहीत,’ असे म्हणत गाडीतून उतरून त्यांनी गोळा खाल्ल्याची आठवण सांगण्यात आली.