शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनी केली जि. प. शाळा आदर्शवत--शिरढोणमधील आदर्शवत उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:31 IST

कुरुंदवाड : खासगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना शिरढोण (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार शाळेत शिक्षक व पालकांनी ई-लर्निंग वर्ग सुरू

गणपती कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : खासगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना शिरढोण (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार शाळेत शिक्षक व पालकांनी ई-लर्निंग वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेऊन अद्ययावत व दर्जेदार शिक्षण पाल्यांना मिळावे, यासाठी पालकांनी घेतलेला निर्णय आदर्शवत आहे.

सध्या खासगी शिक्षण संस्थांना पेव फुटले असून, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळेच्या टोलेजंग इमारती, मैदान, विद्यार्थी-पालकांना भुरळ पाडणारी शैक्षणिक सुविधा, बससेवा यांमुळे अनेक ठिकाणी दर्जेदार शिक्षणापेक्षा पालकांना आकर्षित करणाºया शिक्षण संस्थांच्या योजनांमुळे पालक जिल्हा परिषदेच्या मोफत शिक्षणाला डावलून मोठ्या रकमेची शैक्षणिक फी भरून पाल्यांना खासगी शिक्षण संस्थेत प्रवेश घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जाही शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घसरला आहे. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थांचे फावत आहे. परिणामी, अनेक जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत. अशा स्पर्धांत्मक स्थितीतही शाळा टिकविण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेतला आहे. येथील कुमार विद्यामंदिर शाळेतील शिक्षकांचे शिक्षण दर्जेदार असले तरी त्याला अद्ययावत रूप देण्यासाठी पालक पुढे आले आहेत.खासगी शिक्षण संस्थेतील ई-लर्निंग वर्ग या शाळेत सुरू करण्यासाठी शिक्षण व पालकांनी सहभाग घेतला आहे. पन्नास हजार रुपये वर्गणी गोळा करून ई-लर्निंग वर्ग सुरू केला आहे. त्यामध्ये वर्गात डिजिटल फलकाद्वारे भिंती बोलक्या केल्या आहेत. संगणकांची माहिती, आपत्कालीन व्यवस्थापन, सणांची, किल्ल्यांची ओळख, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, राष्ट्रीय प्रतीके, सुविचार, आदींच्या माध्यमातून भिंती बोलक्या केल्या आहेत.प्रोजेक्टद्वारे पडद्यावर विद्यार्थ्यांना सर्वच विषयांचे शिक्षण दिले जात आहे. करमणूक करीत ज्ञानदान केल्याने विद्यार्थी सर्वच विषय आवडीने शिकत आहेत. एकीकडे जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत असताना या शाळा टिकविण्यासाठी पालकांनी घेतलेला पुढाकार आदर्शवत ठरत आहे.