शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

पालकांनी केली जि. प. शाळा आदर्शवत--शिरढोणमधील आदर्शवत उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:31 IST

कुरुंदवाड : खासगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना शिरढोण (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार शाळेत शिक्षक व पालकांनी ई-लर्निंग वर्ग सुरू

गणपती कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : खासगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना शिरढोण (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार शाळेत शिक्षक व पालकांनी ई-लर्निंग वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेऊन अद्ययावत व दर्जेदार शिक्षण पाल्यांना मिळावे, यासाठी पालकांनी घेतलेला निर्णय आदर्शवत आहे.

सध्या खासगी शिक्षण संस्थांना पेव फुटले असून, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळेच्या टोलेजंग इमारती, मैदान, विद्यार्थी-पालकांना भुरळ पाडणारी शैक्षणिक सुविधा, बससेवा यांमुळे अनेक ठिकाणी दर्जेदार शिक्षणापेक्षा पालकांना आकर्षित करणाºया शिक्षण संस्थांच्या योजनांमुळे पालक जिल्हा परिषदेच्या मोफत शिक्षणाला डावलून मोठ्या रकमेची शैक्षणिक फी भरून पाल्यांना खासगी शिक्षण संस्थेत प्रवेश घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जाही शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घसरला आहे. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थांचे फावत आहे. परिणामी, अनेक जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत. अशा स्पर्धांत्मक स्थितीतही शाळा टिकविण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेतला आहे. येथील कुमार विद्यामंदिर शाळेतील शिक्षकांचे शिक्षण दर्जेदार असले तरी त्याला अद्ययावत रूप देण्यासाठी पालक पुढे आले आहेत.खासगी शिक्षण संस्थेतील ई-लर्निंग वर्ग या शाळेत सुरू करण्यासाठी शिक्षण व पालकांनी सहभाग घेतला आहे. पन्नास हजार रुपये वर्गणी गोळा करून ई-लर्निंग वर्ग सुरू केला आहे. त्यामध्ये वर्गात डिजिटल फलकाद्वारे भिंती बोलक्या केल्या आहेत. संगणकांची माहिती, आपत्कालीन व्यवस्थापन, सणांची, किल्ल्यांची ओळख, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, राष्ट्रीय प्रतीके, सुविचार, आदींच्या माध्यमातून भिंती बोलक्या केल्या आहेत.प्रोजेक्टद्वारे पडद्यावर विद्यार्थ्यांना सर्वच विषयांचे शिक्षण दिले जात आहे. करमणूक करीत ज्ञानदान केल्याने विद्यार्थी सर्वच विषय आवडीने शिकत आहेत. एकीकडे जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत असताना या शाळा टिकविण्यासाठी पालकांनी घेतलेला पुढाकार आदर्शवत ठरत आहे.