शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

पालकांनी केली जि. प. शाळा आदर्शवत--शिरढोणमधील आदर्शवत उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 00:31 IST

कुरुंदवाड : खासगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना शिरढोण (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार शाळेत शिक्षक व पालकांनी ई-लर्निंग वर्ग सुरू

गणपती कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदवाड : खासगी शिक्षण संस्थांच्या स्पर्धेत अनेक ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडत असताना शिरढोण (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या कुमार शाळेत शिक्षक व पालकांनी ई-लर्निंग वर्ग सुरू केले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद शाळा वाचविण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेऊन अद्ययावत व दर्जेदार शिक्षण पाल्यांना मिळावे, यासाठी पालकांनी घेतलेला निर्णय आदर्शवत आहे.

सध्या खासगी शिक्षण संस्थांना पेव फुटले असून, या स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शाळेच्या टोलेजंग इमारती, मैदान, विद्यार्थी-पालकांना भुरळ पाडणारी शैक्षणिक सुविधा, बससेवा यांमुळे अनेक ठिकाणी दर्जेदार शिक्षणापेक्षा पालकांना आकर्षित करणाºया शिक्षण संस्थांच्या योजनांमुळे पालक जिल्हा परिषदेच्या मोफत शिक्षणाला डावलून मोठ्या रकमेची शैक्षणिक फी भरून पाल्यांना खासगी शिक्षण संस्थेत प्रवेश घेत आहेत. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जाही शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे घसरला आहे. त्यामुळे खासगी शिक्षण संस्थांचे फावत आहे. परिणामी, अनेक जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत. अशा स्पर्धांत्मक स्थितीतही शाळा टिकविण्यासाठी पालकांनीच पुढाकार घेतला आहे. येथील कुमार विद्यामंदिर शाळेतील शिक्षकांचे शिक्षण दर्जेदार असले तरी त्याला अद्ययावत रूप देण्यासाठी पालक पुढे आले आहेत.खासगी शिक्षण संस्थेतील ई-लर्निंग वर्ग या शाळेत सुरू करण्यासाठी शिक्षण व पालकांनी सहभाग घेतला आहे. पन्नास हजार रुपये वर्गणी गोळा करून ई-लर्निंग वर्ग सुरू केला आहे. त्यामध्ये वर्गात डिजिटल फलकाद्वारे भिंती बोलक्या केल्या आहेत. संगणकांची माहिती, आपत्कालीन व्यवस्थापन, सणांची, किल्ल्यांची ओळख, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, राष्ट्रीय प्रतीके, सुविचार, आदींच्या माध्यमातून भिंती बोलक्या केल्या आहेत.प्रोजेक्टद्वारे पडद्यावर विद्यार्थ्यांना सर्वच विषयांचे शिक्षण दिले जात आहे. करमणूक करीत ज्ञानदान केल्याने विद्यार्थी सर्वच विषय आवडीने शिकत आहेत. एकीकडे जिल्हा परिषद शाळा विद्यार्थ्यांअभावी ओस पडत असताना या शाळा टिकविण्यासाठी पालकांनी घेतलेला पुढाकार आदर्शवत ठरत आहे.