शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

पानटपरी सांभाळून अनिता महाविद्यालयात पहिली

By admin | Updated: May 28, 2015 00:57 IST

शिकवणीला फाटा : बारावीत ८३.६९ टक्के गुण

सांगली : येथील विश्रामबाग गणपती मंदिराजवळ असलेल्या गणराज पानटपरीमध्ये पान व्यवसाय करणाऱ्या वडिलांना मदत करीत अनिता फोंडे हिने बारावीच्या परीक्षेत कला विभागात ८३.६९ टक्के गुण मिळवले. समाज काय म्हणेल याकडे दुर्लक्ष करीत, घरकाम सांभाळून अनिताने मिळवलेले यश उल्लेखनीय ठरले आहे. राजमती नेमगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात तिने प्रथम क्रमांक मिळविला आहे. अनिताच्या घरी पहिल्यापासूनच एकत्र कुटुंबपध्दती असून तिचे वडील राजू फोंडे यांची पानटपरी आहे. अनिता ही त्यांची एकुलती एक मुलगी. नववीपासूनच ती वडिलांना पानटपरीत मदत करू लागली. वडिलांनी तिला अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. तिनेही वडिलांना, ‘अभ्यासात कोठेही कमी पडणार नाही’, असा शब्द दिला. अनिताला दहावीत ८१ टक्के गुण मिळाले आहेत. तिने जाणीवपूर्वक कला शाखा निवडली. बारावीत असताना तिने दिवसातील बहुतांश वेळ पानटपरीत वडिलांना मदत करण्यातच घालवला. अनेक मैत्रिणींनी शिकवणी लावली होती, पण शिकवणी लावायची नाही, असे तिने ठरविले होते. याकरिता तिने वर्षभरात एक दिवसही महाविद्यालय चुकविले नाही. प्रत्येक तासाला उपस्थित राहून, काही शंका आल्यास शिक्षकांना विचारून त्यांची सोडवणूक करण्यावर भर दिला. सकाळी सहा वाजता उठून घरकामात मदत करणे, त्यानंतर महाविद्यालय, दुपारी व सायंकाळी पानटपरीत वडिलांना मदत, रात्री अभ्यास, असा तिचा वर्षभराचा दिनक्रम होता. प्राचार्य एम. एस. वाझे आणि घाडगे सर यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे तिने सांगितले. (प्रतिनिधी)जिल्हाधिकारी होण्याचे ध्येयकला शाखा जाणीवपूर्वक निवडल्याचे सांगून अनिता म्हणाली की, कला शाखेमुळेच सर्वांगीण ज्ञान प्राप्त होते. दहावीपासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली असून भविष्यात जिल्हाधिकारी बनण्याचे ध्येय ठेवूनच अभ्यास करीत आहे. बारावीत असताना उगाचच अभ्यासाचा अतिरिक्त ताण न घेता दररोज नियमित लक्षपूर्वक अभ्यास केल्यानेच यश मिळाले. कला शाखेत कमी गुण मिळतात, असा समज अनिताने खोटा ठरवला. तिने किचकट वाटणाऱ्या इतिहास विषयात १०० पैकी ९२ गुण मिळविले आहेत, तर मराठीत ८६ गुण संपादन केले आहेत.