शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

पंत अमात्यांची आज्ञापत्रे आजही दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:28 IST

कोल्हापूर : हुकुमतपनाह रामचंदरपंत अमात्य यांनी लिहिलेली आज्ञापत्रे आजही दिशादर्शक आहेत. शालेय पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे ...

कोल्हापूर : हुकुमतपनाह रामचंदरपंत अमात्य यांनी लिहिलेली आज्ञापत्रे आजही दिशादर्शक आहेत. शालेय पाठ्यपुस्तकांच्या माध्यमातून ती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे, असे मत दुर्ग अभ्यासक डॉ. अमर अडके यांनी व्यक्त केले.

पंत अमात्य बावडेकर यांच्या ३०५ व्या स्मृतिदिनी सोमवारी आयोजित व्याख्यानावेळी ते बोलत होते. हुकुमतपनाह रामचंदरपंत अमात्य बावडेकर चॅरिेटेबल ट्रस्टच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ॲड. सौरभ देशपांडे लिखित अमात्यांच्या चरित्राचे प्रकाशन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी सीआयडीचे पोलीस अधीक्षक डॉ. दिनेश बारी होते.

अडके म्हणाले, पंत अमात्य हे शूरवीर, अभ्यासू आणि प्रजाहितदक्ष असे हुकुमतपनाह होते. त्यांनी जनतेची सेवा करत असतानाच स्वराज्याच्याही रक्षणाची महत्त्वपूर्ण कामगिरी केली. पाच छत्रपतींच्या काळात त्यांनी स्वराज्याची सोबत केली. त्यांच्या आज्ञापत्रांची अंमलबजावणी आजही करणे आवश्यक आहे.

माजी आमदार मालोजीराजे, डॉ. दिनेश बारी, अँड. सौरभ देशपांडे यांनीही यावेळी अमात्य यांच्या गौरवशाली कामगिरीचा आढावा घेतला.

यावेळी ट्रस्टचे विश्वस्त शाहीर राजू राऊत, विश्वनाथ कोरी, नीतुदेवी बावडेकर, ॲड. देवव्रत बावडेकर, ॲड. केदार मुनिश्वर, हेमंत साळोखे उपस्थित होते.

ट्रस्टचे सचिव नील पंडित बावडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

०८०२२०२१ कोल पंत अमात्य

पंत अमात्य बावडेकर यांच्या स्मृ़तिदिनी आयोजित कार्यक्रमामध्ये हुकुमतपनाह रामचंदर अमात्य चरित्राचे प्रकाशन माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी डावीकडून ॲड. केदार मुनिश्वर, नीतुदेवी बावडेकर, ॲड. सौरभ देशपांडे, नील बावडेकर, डॉ. दिनेश बारी, विश्वनाथ कोरी, हेमंत साळोखे, राजू राऊत उपस्थित होते.

छाया : नसीर अत्तार