शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

पानसरे यांच्या हत्येचा तपास ठप्प

By admin | Updated: August 15, 2015 00:42 IST

सहा महिन्यांचा कालावधी : कार्यकर्त्यांत अस्वस्थता; आंदोलनासाठी बैठक

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हल्ल्यास येत्या गुरुवारी (दि. २० आॅगस्ट) सहा महिने पूर्ण होत असतानाच मारेकऱ्यांबाबत जराही मागमूस लागलेला नसल्याने कार्यकर्त्यांसह समाजातही अस्वस्थता आहे. सध्यातरी पोलीस तपास ठप्पच असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शासन व पोलीस यंत्रणेवर दबाव वाढविण्यासाठी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कृती कार्यक्रम निश्चित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे ठरत आहे.पानसरे यांच्यावर सकाळी फिरायला गेल्यावर १६ फेब्रुवारीला हल्ला झाला व त्यानंतर त्यांचे २० फेब्रुवारीस निधन झाले. त्यानंतर सातत्याने पोलीस आम्ही आरोपींच्या मागावर आहोत असे सांगत आले आहेत. दोन महिन्यांपूर्वी ‘एसआयटी’चे प्रमुख संजयकुमार यांनी कोल्हापुरात येऊन पत्रकार परिषद घेऊन संशयितांची छायाचित्रे प्रसिद्ध केली. सीसीटीव्ही फुटेजही माध्यमांना उपलब्ध करून दिले. हे फुटेज पुण्यातील फिल्म अर्कार्व्हईजमधून अधिक स्वच्छ करून घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते, परंतु त्याचे पुढे काय झाले हे समजलेले नाही. हा तपास आजच्या स्थितीत एकदमच ठप्प झाला असल्यासारखी स्थिती आहे. मध्यंतरी आमदार मुश्रीफ यांनी मारेकऱ्यांची नावे पोलिसांना माहीत आहेत; परंतु राज्य सरकारच्या दबावामुळे ती जाहीर होत नसल्याचा आरोप केला. त्यावरूनही गदारोळ झाला. पोलिसांनी मुश्रीफ यांच्याकडे अधिकारी पाठवून जबाब घेतला; परंतु त्यांना त्याबद्दल फारशी माहिती देता आली नाही. मुश्रीफ या आरोपाबद्दल विधानसभेतही बोलणार होते, परंतु ते देखील झालेले नाही. मुश्रीफ यांना दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी माहिती दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन संशयितांना पकडले होते. त्यांची चौकशी करण्यात आली; परंतु त्यातून हत्येबाबत खात्रीशीर सुगावा लागला नसल्याने त्यांना सोडून देण्यात आल्याचे समजते.प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला डाव्या चळवळीतील कार्यकर्ते ‘मॉर्निंग वॉक’ काढून हत्येचा निषेध करतात व पोलीस अधीक्षकांना भेटून तपासाबाबत आग्रह धरतात; परंतु आता तेवढ्याने हे प्रकरण तडीस लागणार नाही असे वाटू लागल्याने दबाव वाढविण्यासाठी आणखी काय करता येईल यासंबंधीची मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. पानसरे यांचे मारेकरी सापडत नाहीत हेच न पटणारे आहे. पोलीस आणि राजकारण्यांनी ठरविले तर या देशात एकही गुन्हा होणार नाही. आमदार हसन मुश्रीफ व जितेंद्र आव्हाड यांनी संशयितांच्या संदर्भात केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असून, राज्य सरकारला आरोपी माहीत असूनही त्यांना हात कुणी लावायचा, हा प्रश्न आहे; परंतु आता आम्ही फार काळ हाताची घडी घालून बसणार नाही.- बी. जी. कोळसे-पाटील, माजी न्यायमूर्ती माझ्या वडिलांचे निधन झाल्यामुळे मी सध्या रजेवर आहे. त्यामुळे तपासाबाबत काही सांगता येणार नाही. तुम्ही कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक यांना त्याबाबत विचारावे.- संजयकुमार विशेष तपास पथकाचे प्रमुखमी सध्या दोन दिवस बाहेरगावी आहे. कोल्हापुरात आल्यानंतर या तपासाबाबत माहिती देऊ.- डॉ. मनोजकुमार शर्मापोलीस अधीक्षक कोल्हापूर