शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

ऐन उन्हाळ्यात पन्हाळकरांना पाणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:18 IST

पन्हाळा - पन्हाळगडाच्या कासारी नदीवरून येणाऱ्या पाणी समस्येत वाढ होत असून नव्या योजनेचे कासारी नदीत चुकीच्या जागी पाणी खेचणारी ...

पन्हाळा - पन्हाळगडाच्या कासारी नदीवरून येणाऱ्या पाणी समस्येत वाढ होत असून नव्या योजनेचे कासारी नदीत चुकीच्या जागी पाणी खेचणारी विहीर (इंटकवेल) बांधली गेल्याने ऐन उन्हाळ्यात पन्हाळकरांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

१९८० सालची नळ पाणी पुरवठा योजना जीर्ण झाली म्हणून पाच वर्षांपूर्वी सुमारे पाच कोटी रुपयांची नवी योजना मंजूर झाली. नगर परिषदेकडे जुन्या योजनेसह नवी योजना हस्तांतरीत झाली. नव्या योजनेचे काम रखडत चार वर्षाने पूर्ण झाले असले तरी नगर परिषदेने २४x७ पाणी देण्याचे आश्वासन फोल ठरत पुन्हा एक दिवसाआड केवळ २० मिनीटेच पाणी मिळू लागले म्हणजे नवी योजना पन्हाळकरांसाठी कुचकामी ठरल्याने पन्हाळगडाचा पाणी पुरवठा सुरळीत कधी होणार, याची सर्व पन्हाळावासीयांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

पन्हाळगडाला नव्या योजनेद्वारे पाणी पुरवठा करणारी सर्व तांत्रिक व जागेची ठिकाणे दाखवण्याची जबाबदारी जीवन प्राधिकरणच्या अभियंत्यांच्या सुचनेप्रमाणे केल्याचे नगराध्यक्ष रूपाली धडेल यांनी सांगितले असले तरी ते सुसंगत वाटत नाही. नगर परिषदच्या किरकोळ कामासाठी मोठ-मोठ्या बाहेरील अभियंत्यांकडून वारेमाप फी देत सल्ला घेतात, मग गावची पाणी पुरवठा करणारी ही योजना दीर्घ काळ चालणारी आहे. त्याला योग्य तंत्रज्ञान का घेतले नाही, असा सवाल उपस्थित होतो. जुन्या योजनेच्या पाइपलाइन, पाणी खेचणाऱ्या मोटारी वापरात आहेत, मग आसुर्लेमधून उत्रेमध्ये नव्या योजनेच्या इंटक व जाकवेल बांधली म्हणजे नवी योजना झाली का, आणि त्याला इतका खर्च होतो का, गावकऱ्यांना बरेच प्रश्न भेडसावत आहेत. कदाचित त्याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत दिले जाईल; पण पाणी प्रश्न सुटणार नाही. तो प्रत्येक उन्हाळ्यात भेडसावणार, हे निश्चित आहे.

मार्च महिन्यापासून सलग तीन वेळेस कासारी नदीवर पाणी नसल्याने पन्हाळा नगर परिषद पाणी पुरवठा सलग दोन-दोन दिवस करू शकली नाही. याबाबत कासारी धरणाचे अभियंता संभाजी काटे यांच्याकडे संपर्क साधला असता, ते म्हणतात.. धरणात पाणी साठा पुरेसा आहे. तथापि, धरणातून वीज निर्मिती करूनच पाणी सोडावे लागते. हे पाणी यवलुज बंधाऱ्यावर येण्यास तीन दिवसांचा कालावधी लागतो; पण चालू वर्षी पाणी उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याने पाणी सोडले की संपते, अशी परिस्थिती आहे. यवलुज बंधाऱ्याच्या हद्दीत पन्हाळा नगर परिषद पाणी योजना येते आणि हा बंधारा धरणावरील शेवटचा बंधारा आहे. येथे पाणी येण्यास बाकीच्या गावच्या प्रचंड उपशामुळे वेळ लागतोय, तरी आम्ही लक्ष ठेवून असतो व जास्तीत जास्त पाणी सोडण्याचा प्रयत्न करतो.

फोटो------- पन्हाळा शहराला पाणी पुरवठा होणारी आजची कासारी नदीची स्थिती अशी आहे.