शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

पन्हाळ्यात शिक्षक विद्यार्थ्यांच्या दारात

By admin | Updated: June 5, 2015 00:20 IST

शाळांच्या संख्येत वाढ : पटपडताळणीमुळे शिक्षक अडकले कात्रीत

किरण मस्कर - कोतोली -ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना शाळांचे निकाल मिळाल्यानंतर माध्यमिक शाळांच्या शिक्षकांनी आता आपल्या शाळांना विद्यार्थी मिळावेत, यासाठी विद्यार्थी शोधमोहीम सुरू केली आहे.विनाअनुदानित शाळांची संख्या ग्रामीण भागामध्ये दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे गावागावांत शाळांचे पेव फुटले आहे. यामुळे शिक्षकांवर पालकांचे उंबरठे झिजवून विद्यार्थी शोधण्याची वेळ आली आहे. आपल्या शाळेत विद्यार्थी आल्यानंतर त्यांना विविध सुविधा देणार आहे, अशी आमिषे शिक्षक पालकांना दाखवीत आहेत, तर जी शाळा पाल्याला जास्त सेवा-सुविधा देईल, अशा शाळेत मुलांना पाठविण्याची पालकांची मानसिकता आहे.गत वर्षात अनेक विनाअनुदानित शाळांना परवानग्या देण्यात आल्या. राजकारणातून एका-एका गावात दोन-दोन शाळा स्थापन करण्यात आल्या आणि प्रश्न निर्माण झाला विद्यार्थ्यांचा. याचा परिणाम म्हणून संस्थाचालकांनी शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत फिरविण्यास सुरुवात केली. यामुळे आपली नोकरी टिकून राहावी, यासाठी शिक्षकांनीसुद्धा विद्यार्थ्यांचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात केली. सरकारने सुरू केलेल्या पटपडताळणीमुळे तर शिक्षकवर्ग मोठ्या कात्रीत सापडला आहे. विद्यार्थीसंख्येवर घालण्यात आलेली बंधने, अतिरिक्त तुकड्यांचा प्रश्न, पटपडताळणी करून तुकड्या कमी कशा होतील यासाठी शिक्षण विभागाने चालविलेली धडपड, यामुळे तुकड्या कमीची टांगती तलवार असून, शिक्षकाची नोकरी म्हणजे तारेवरची कसरत बनली आहे. याचा परिणाम शिक्षकांना मिळालेली उन्हाळ्याची सुटी या शिक्षकांनी आता विद्यार्थी मिळविण्यासाठी खर्ची घालण्यास सुरुवात केली आहे. याचा परिणाम शाळा-शाळांमध्ये चुरस निर्माण झालेली पाहावयास मिळत आहे. एकदा विद्यार्थीसंख्या पूर्ण झाली की, पुढील तीन वर्षे तुकडीला कोणतीच अडचण येणार नाही. यासाठी शिक्षक साम, दाम, त्याचबरोबर राजकीय दबावतंत्र वापरत असल्याचे गावागावांत पाहावयास मिळत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना शाळेचा गणवेश, पुस्तके, वह्या, एस. टी. पास, फीमध्ये सवलत, छत्र्या, रेनकोट, आदींची आमिषे दाखविली जात आहेत. काही ठिकाणी पालकांना जेवणावळी लावून पाल्यांना आपल्या शाळेत पाठविण्याचा नवा फंडा ग्रामीण भागात तयार झाला आहे. काही पालकांनी या प्रकाराला नापसंती दाखविली आहे. तसेच शाळेची पात्रता तपासूनच आम्ही आमच्या पाल्यांना कोणत्या शाळेत पाठवायचे ते ठरविणार आहे.- शिवाजी आनंदा जाधव, पालक (कोलोली).