शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पंचगंगा उशाला...पण दूषित पाणीच घशाला

By admin | Updated: September 22, 2015 00:12 IST

चंदूरचा पाणी प्रश्न गंभीर : मैलामिश्रित, प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया थेट प्यावे लागतेय, सांडपाण्याचीही समस्या भेडसावतेय

इचलकरंजी येथील वस्त्रोद्योग व शहराच्या विकासात परिसरातील गावांचेही महत्त्वाचे योगदान आहे. या गावांमधील समस्याही गेली कित्येक वर्षे तशाच आहेत. शासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या समस्या सोडवाव्यात, यासाठी परिसरातील गावांची समस्या मांडणारी मालिका आजपासून...अतुल आंबी -- इचलकरंजीचंदूर (ता. हातकणंगले) येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. देशभर प्रगतीचे वारे वाहत असले तरी आजतागायत चंदूर गावातील नागरिकांना पंचगंगा नदीचे मैलामिश्रित व प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया थेट प्यावे लागत आहे. पंचगंगा नदीवर पूल नसल्याने दळण-वळणाची समस्या, तसेच सांडपाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. शासन व लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.चंदूर गावासाठी चार वर्षांपूर्वी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची भारत निर्माण नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. चार वर्षांत या योजनेचे पाणी फक्त गावच्या वाढीव वसाहतीत पोहोचविण्यात यश आले आहे. या योजनेंतर्गत पंचगंगा नदीकाठावर बांधण्यात आलेले जॅकवेलही वीज पुरवठा न मिळाल्याने अद्याप सुरू झाले नाही. दोन वर्षांपासून सहा महिन्यांत संपूर्ण गावाला शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी घोषणा ग्रामपंचायतीच्यावतीने केली जात असली तरी आजही संपूर्ण गावाला शुद्ध पाणी मिळाले नाही. नागरिकांना पंचगंगेतील प्रदूषित पाणीच विनाप्रक्रिया थेट प्यावे लागत आहे.त्याचबरोबर गावाच्या पश्चिम-दक्षिण बाजूकडे असलेल्या पंचगंगा नदीवर वाहतुकीसाठी पूल नसल्याने चंदूर ‘डेड एंड’ मानला जातो. त्यामुळे एस.टी. महामंडळाचे नेहमीच गावाकडे दुर्लक्ष असते. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी निर्णय घेत दहा वर्षांपूर्वीच अवैध वाहतूक (वडाप) बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावातील नागरिकांसह पै-पाहुण्यांना ये-जा करण्यासाठी एस.टी.शिवाय पर्याय राहिला नाही. मात्र, इचलकरंजी आगाराकडून कर्मचाऱ्यांची व वाहनांची कमतरता असल्याचे कारण पुढे करून गावासाठी नियोजित केलेल्या अठरा फेऱ्याही वेळेवर पूर्ण केल्या जात नाहीत. त्यामुळे इचलकरंजी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस न मिळाल्याने अनेकवेळा शैक्षणिक नुकसान होते, तर अनेकांना बसस्थानकावर दोन-दोन तास बसून रहावे लागते. तसेच चंदूर-इंगळी पुलाचे प्रलंबित असलेले कामही पूर्ण झाल्यास दळण-वळणाचा मार्ग सोयीस्कर होऊन वाहतुकीची समस्या मिटण्याबरोबरच हुपरी, पट्टणकोडोली, कोल्हापूरकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग निर्माण होणार आहे.बसस्थानकच नाहीविशेष म्हणजे वडाप बंद असलेल्या चंदूर गावामध्ये बसस्थानकच नाही. त्यामुुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महिला व विद्यार्थिनींना बसस्थानक चौकातील दुकानांच्या दारात पायऱ्यांवर थांबावे लागते. पावसाळ्यात तर थांबायला जागा नसल्यामुळे जास्तच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने बसस्थानक बांधावे, अशी मागणी होत आहे.