शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पंचगंगा उशाला...पण दूषित पाणीच घशाला

By admin | Updated: September 22, 2015 00:12 IST

चंदूरचा पाणी प्रश्न गंभीर : मैलामिश्रित, प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया थेट प्यावे लागतेय, सांडपाण्याचीही समस्या भेडसावतेय

इचलकरंजी येथील वस्त्रोद्योग व शहराच्या विकासात परिसरातील गावांचेही महत्त्वाचे योगदान आहे. या गावांमधील समस्याही गेली कित्येक वर्षे तशाच आहेत. शासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या समस्या सोडवाव्यात, यासाठी परिसरातील गावांची समस्या मांडणारी मालिका आजपासून...अतुल आंबी -- इचलकरंजीचंदूर (ता. हातकणंगले) येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. देशभर प्रगतीचे वारे वाहत असले तरी आजतागायत चंदूर गावातील नागरिकांना पंचगंगा नदीचे मैलामिश्रित व प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया थेट प्यावे लागत आहे. पंचगंगा नदीवर पूल नसल्याने दळण-वळणाची समस्या, तसेच सांडपाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. शासन व लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.चंदूर गावासाठी चार वर्षांपूर्वी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची भारत निर्माण नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. चार वर्षांत या योजनेचे पाणी फक्त गावच्या वाढीव वसाहतीत पोहोचविण्यात यश आले आहे. या योजनेंतर्गत पंचगंगा नदीकाठावर बांधण्यात आलेले जॅकवेलही वीज पुरवठा न मिळाल्याने अद्याप सुरू झाले नाही. दोन वर्षांपासून सहा महिन्यांत संपूर्ण गावाला शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी घोषणा ग्रामपंचायतीच्यावतीने केली जात असली तरी आजही संपूर्ण गावाला शुद्ध पाणी मिळाले नाही. नागरिकांना पंचगंगेतील प्रदूषित पाणीच विनाप्रक्रिया थेट प्यावे लागत आहे.त्याचबरोबर गावाच्या पश्चिम-दक्षिण बाजूकडे असलेल्या पंचगंगा नदीवर वाहतुकीसाठी पूल नसल्याने चंदूर ‘डेड एंड’ मानला जातो. त्यामुळे एस.टी. महामंडळाचे नेहमीच गावाकडे दुर्लक्ष असते. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी निर्णय घेत दहा वर्षांपूर्वीच अवैध वाहतूक (वडाप) बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावातील नागरिकांसह पै-पाहुण्यांना ये-जा करण्यासाठी एस.टी.शिवाय पर्याय राहिला नाही. मात्र, इचलकरंजी आगाराकडून कर्मचाऱ्यांची व वाहनांची कमतरता असल्याचे कारण पुढे करून गावासाठी नियोजित केलेल्या अठरा फेऱ्याही वेळेवर पूर्ण केल्या जात नाहीत. त्यामुळे इचलकरंजी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस न मिळाल्याने अनेकवेळा शैक्षणिक नुकसान होते, तर अनेकांना बसस्थानकावर दोन-दोन तास बसून रहावे लागते. तसेच चंदूर-इंगळी पुलाचे प्रलंबित असलेले कामही पूर्ण झाल्यास दळण-वळणाचा मार्ग सोयीस्कर होऊन वाहतुकीची समस्या मिटण्याबरोबरच हुपरी, पट्टणकोडोली, कोल्हापूरकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग निर्माण होणार आहे.बसस्थानकच नाहीविशेष म्हणजे वडाप बंद असलेल्या चंदूर गावामध्ये बसस्थानकच नाही. त्यामुुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महिला व विद्यार्थिनींना बसस्थानक चौकातील दुकानांच्या दारात पायऱ्यांवर थांबावे लागते. पावसाळ्यात तर थांबायला जागा नसल्यामुळे जास्तच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने बसस्थानक बांधावे, अशी मागणी होत आहे.