शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

पंचगंगा उशाला...पण दूषित पाणीच घशाला

By admin | Updated: September 22, 2015 00:12 IST

चंदूरचा पाणी प्रश्न गंभीर : मैलामिश्रित, प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया थेट प्यावे लागतेय, सांडपाण्याचीही समस्या भेडसावतेय

इचलकरंजी येथील वस्त्रोद्योग व शहराच्या विकासात परिसरातील गावांचेही महत्त्वाचे योगदान आहे. या गावांमधील समस्याही गेली कित्येक वर्षे तशाच आहेत. शासनाने व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन या समस्या सोडवाव्यात, यासाठी परिसरातील गावांची समस्या मांडणारी मालिका आजपासून...अतुल आंबी -- इचलकरंजीचंदूर (ता. हातकणंगले) येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. देशभर प्रगतीचे वारे वाहत असले तरी आजतागायत चंदूर गावातील नागरिकांना पंचगंगा नदीचे मैलामिश्रित व प्रदूषित पाणी विनाप्रक्रिया थेट प्यावे लागत आहे. पंचगंगा नदीवर पूल नसल्याने दळण-वळणाची समस्या, तसेच सांडपाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. शासन व लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.चंदूर गावासाठी चार वर्षांपूर्वी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची भारत निर्माण नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली. त्याचे काम अतिशय संथगतीने सुरू आहे. चार वर्षांत या योजनेचे पाणी फक्त गावच्या वाढीव वसाहतीत पोहोचविण्यात यश आले आहे. या योजनेंतर्गत पंचगंगा नदीकाठावर बांधण्यात आलेले जॅकवेलही वीज पुरवठा न मिळाल्याने अद्याप सुरू झाले नाही. दोन वर्षांपासून सहा महिन्यांत संपूर्ण गावाला शुद्ध पाणीपुरवठा केला जाणार आहे, अशी घोषणा ग्रामपंचायतीच्यावतीने केली जात असली तरी आजही संपूर्ण गावाला शुद्ध पाणी मिळाले नाही. नागरिकांना पंचगंगेतील प्रदूषित पाणीच विनाप्रक्रिया थेट प्यावे लागत आहे.त्याचबरोबर गावाच्या पश्चिम-दक्षिण बाजूकडे असलेल्या पंचगंगा नदीवर वाहतुकीसाठी पूल नसल्याने चंदूर ‘डेड एंड’ मानला जातो. त्यामुळे एस.टी. महामंडळाचे नेहमीच गावाकडे दुर्लक्ष असते. ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी निर्णय घेत दहा वर्षांपूर्वीच अवैध वाहतूक (वडाप) बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गावातील नागरिकांसह पै-पाहुण्यांना ये-जा करण्यासाठी एस.टी.शिवाय पर्याय राहिला नाही. मात्र, इचलकरंजी आगाराकडून कर्मचाऱ्यांची व वाहनांची कमतरता असल्याचे कारण पुढे करून गावासाठी नियोजित केलेल्या अठरा फेऱ्याही वेळेवर पूर्ण केल्या जात नाहीत. त्यामुळे इचलकरंजी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेवर बस न मिळाल्याने अनेकवेळा शैक्षणिक नुकसान होते, तर अनेकांना बसस्थानकावर दोन-दोन तास बसून रहावे लागते. तसेच चंदूर-इंगळी पुलाचे प्रलंबित असलेले कामही पूर्ण झाल्यास दळण-वळणाचा मार्ग सोयीस्कर होऊन वाहतुकीची समस्या मिटण्याबरोबरच हुपरी, पट्टणकोडोली, कोल्हापूरकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग निर्माण होणार आहे.बसस्थानकच नाहीविशेष म्हणजे वडाप बंद असलेल्या चंदूर गावामध्ये बसस्थानकच नाही. त्यामुुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. महिला व विद्यार्थिनींना बसस्थानक चौकातील दुकानांच्या दारात पायऱ्यांवर थांबावे लागते. पावसाळ्यात तर थांबायला जागा नसल्यामुळे जास्तच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्यावतीने बसस्थानक बांधावे, अशी मागणी होत आहे.