शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पंचगंगा प्रदूषण....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST

लढा पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा.. विश्वास पाटील लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषित करण्यात सर्वात जास्त कारणीभूत असलेल्या कोल्हापूर ...

लढा पंचगंगा प्रदूषणमुक्तीचा..

विश्वास पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : पंचगंगा नदी प्रदूषित करण्यात सर्वात जास्त कारणीभूत असलेल्या कोल्हापूर महापालिकेने गेल्या दहा वर्षात केलेल्या विविध उपाययोजनांना आता चांगले यश आले आहे. आजच्या घडीला शहरातील ९५ टक्के सांडपाणी अडविण्यात व त्यावर प्रक्रिया करण्यात महापालिका यशस्वी झाली आहे. शहरातील प्रतिदिन तयार होणारे ९६ दशलक्ष घनमीटर (एमएलडी) पाण्यापैकी सध्या महापालिका ९१ टक्के पाण्यावर प्रक्रिया करत आहे. राज्यात एवढे चांगले काम अन्य कोणत्या महापालिकेकडून झालेले नाही. अजून काही प्रस्तावित कामे गांभीर्याने मार्गी लावली तर कोल्हापूर महापालिकेच्या प्रदूषणमुक्तीच्या कामाची देशपातळीवर दखल घेतली जाईल, असा दावा महापालिका यंत्रणेकडून केला जात आहे.

अमृत योजनेतून भुयारी गटर योजनेसाठी ७१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यातून ११३ किलोमीटर वाहिन्या टाकण्यात येणार आहेत. त्यातील ५७ किलोमीटरचे (५५ टक्के) काम झाले आहे. यापैकी अजून एकही वाहिनी मुख्य वाहिनीला जोडलेली नाही. शहरात प्रतिदिन ९६ एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यावर दोन ठिकाणी प्रक्रिया केली जात आहे. ७६ एमएलडीचा प्रकल्प कसबा बावडा येथे आहे. त्यास लाइन बझार, बापट कॅम्प, जयंती, जुना बुधवार, सीपीआर आणि जामदार क्लब हे सहा नाले जोडले आहेत. अजूनही लक्षतीर्थ, राजहंस, रमणमळा, वीटभट्टी नाला असे चार नाले जोडण्याचे काम सुरू आहे. दुधाळी या १७ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या प्रकल्पाला रंकाळ्यात मिसळणारे चार नाले वळविण्यात आले आहेत. या प्रकल्पामध्ये प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी वापरले जात आहे किंवा ते नदीत सोडण्याइतके स्वच्छ आहे. ज्या पाण्यातील जैविक प्राणवायूचे प्रमाण ३० बीओडीपर्यंत आहे ते पाणी हानिकारक नाही, असे मानले जाते. महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पातून प्रक्रिया होऊन बाहेर पडणारे पाणी ७.५ बीओडीचे आहे. शहरातील वाढीव सांडपाणी विचारात घेऊन आणखी सहा एमएलडीचा प्रकल्प दुधाळी येथे करण्यात येत असून, त्याचे बांधकाम सुरू झाले आहे. बावडा प्रकल्पाची क्षमता आणखी चार एमएलडीने वाढवण्यात येणार आहे. थेट काळम्मावाडी योजना पूर्ण झाल्यानंतर आणखी १० एमएलडी सांडपाणी वाढू शकते. त्यासाठी लोणार वसाहत परिसरात तेवढ्याच क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यासाठी १५ कोटी खर्च अपेक्षित असून, त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल करण्याचे काम सुरू आहे.

चढत्या श्रेणीने बिल आकारणी

पाण्याचे बिल चढत्या श्रेणीने आकारणी करणारे कोल्हापूर ही देशातील एकमेव महापालिका आहे. ज्याचा पाण्याचा जास्त वापर त्याने जास्त बिल भरावे असे त्यामागचे तत्त्व आहे. त्याशिवाय महापालिका सांडपाणी अधिभारही वसूल करते. सांडपाणी कमी करणे आणि त्यावर प्रक्रिया करून पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करणे असा दुहेरी हेतू त्यामागे आहे.

नागरी सांडपाणी

सर्वात जास्त : कोल्हापूर महापालिका, इचलकरंजी नगरपालिका त्यानंतर ग्रामपंचायती.

औद्योगिक सांडपाणी

सर्वात जास्त : इचलकरंजी, पंचतारांकित औद्योगिक वसाहत, इतर औद्योगिक क्षेत्रे व त्यानंतर साखर कारखाने.